शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

नवीन सरकार येताच ७९ कामांना मिळाली स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 12:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवीन सरकार येताच जिल्ह्यातील तिर्थक्षेत्र, यात्रास्थळ विकास आणि गावांमध्ये मुलभूत सुविधा पुरविण्याच्या जवळपास ७९ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नवीन सरकार येताच जिल्ह्यातील तिर्थक्षेत्र, यात्रास्थळ विकास आणि गावांमध्ये मुलभूत सुविधा पुरविण्याच्या जवळपास ७९ कामांना स्थगिती मिळणार आहे. आधीच्या लोकप्रतिनिधींनी ही कामे सुचविली असल्याने त्यावर आता गडांतर आले आहे.ग्रामविकास व पंचायत राज विभागाने ४ डिसेंबर रोजी तातडीने अध्यादेश काढून सर्व जिल्हा परिषदांना कार्यारंभ देण्यात न आलेल्या विकास कामांना स्थगिती देण्याचे निर्देश दिले होते. त्यात लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामिण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधा पुरविणे, यात्रास्थळांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम, ग्रामिण भागातील तिर्थक्षेत्राच्या विकासाकरीता असलेल्या कामांचा समावेश आहे. या कामांसाठी किमान दोन कोटी तर जास्तीत जास्त २५ कोटी रुपयांचे अनुदान दिले जाते.नंदुरबार जिल्ह्यात अशा प्रकारची एकुण २३० कामे होती. या पैकी १५१ कामांची वर्कआॅर्डर आतापर्यंत काढण्यात आलेली आहे. ही कामे वगळून ७९ कामांना स्थगिती मिळणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यात गावाअंतर्गत मुलभूत सुविधा पुरवणे, तिर्थस्थळ विकास या कामांचा सवांधिक समावेश आहे. शिवाय यात्रास्थळ विकासाची देखील काही कामे असल्याचे जिल्हा परिषद बांधकाम विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले.विभागनिहाय कामांची वर्गवारी करण्याचे काम सायंकाळी उशीरापर्यंत सुरू होते.