शहरं
Join us  
Trending Stories
1
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
2
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
3
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
4
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
5
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
6
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
7
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
8
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
9
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
10
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
11
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
12
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
13
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
14
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
15
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू
16
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
18
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
19
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
20
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक

हवेचा दाब वाढल्याने खान्देशात आठवडाभर थंडीची लाट

By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Updated: December 18, 2018 12:36 IST

खान्देशची स्थिती : जळगाव व धुळे 10 तर नंदुरबार 13 अंशावर स्थिर

संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : उत्तरेकडून येत असलेल्या शितलहरींमुळे राज्यात सध्या हवेचा दाब 1 हजार 14 हेक्टापास्कल इतका निर्माण झाला आह़े तसेच जास्त दाबाकडून कमी दाबाकडे हवेचा ओघ असल्याने आठवडाभर खान्देशसह उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज ‘आयएमडी’तर्फे वर्तविण्यात आला आह़े गेल्या पंधरा दिवसांपासून जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्याच्या किमान तापमानात वेगाने घट होताना दिसून येत आह़े उत्तरेकडील जम्मू-काश्मिर, शिमला आदी ठिकाणी होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे हवेचा दाब वाढला आह़े त्यामुळे उत्तरेकडून  शितलहरींचा प्रभाव वाढला आह़े काश्मिरमध्ये 1 हजार 18 हेक्टापास्कल तर शिमला येथे 1 हजार 17 हेक्टापास्कल इतका हवेचा दाब आह़े सध्या वारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहत असल्याने उत्तर महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव आह़े हवेचा दाब जास्त राहिल्यास थंडीचा प्रभाव वाढत असतो़ तर हवेचा दाब कमी राहिल्यास कमाल तापमानात वाढ होत असत़े हवेच्या दाबाच्या या व्यस्त प्रमाणामुळे राज्यातील थंडीचा जोर पुढील आठवडाभर कायम राहणार आह़े दरम्यान सोमवारी जळगावात कमाल तापमान 26.6 अंश तर किमान तापमान 10.5 अंश सेल्शिअस, धुळ्याचे कमाल तापमान 27 अंश तर किमान तापमान 10 अंश सेल्शिअस इतके नोंदविण्यात आल़े नंदुरबारात मात्र कमाल तापमान 28.1 तर किमान तापमान 13.2 अंश सेल्शिअस इतके नोंदविण्यात आल़े नाशिक येथे किमान तापमानाचा पारा घसरुन 9.4 अंशावर स्थिरावला तर कमाल तापमान 25.1 इतके नोंदविण्यात आल़े आतार्पयचे सर्वात कमी किमान तापमान निफाड येथे नोंदविण्यात आले असून शुक्रवारी तेथे 7 अंश सेल्शिअस इतके किमान तर 28 अंश इतके कमाल तापमान नोंदविण्यात आले आह़े यंदा राज्यात झालेल्या कमी पजर्न्यामुळे गेल्या काही वर्षाच्या तुलनेत राज्यात थंडीची तीव्रता जाणवत नसल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात येत आह़ेबंगालच्या उपसागरात ‘फेथाई’ या चक्रीवादळाची निर्मिती झालेली आह़े या चक्रीवादळामुळे गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्र राज्यातील काही भागात तुरळक पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात येत होती़ परंतु आता हे वादळ ओरिसाच्या दिशेने जात असल्याचे दिसून येत आह़े त्यामुळे राज्यात आता अवकाळी पावसाची शक्यता मावळली असल्याचे मत हवामानतज्ज्ञ डॉ़ रामचंद्र साबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल़े

हवेचा ओघ जास्त दाबाकडून कमी दाबाकडे असल्याने उत्तर महाराष्ट्रात आठवडाभर थंडी कायम असेल़ उत्तरेकडील प्रदेशांमध्ये बर्फवृष्टी होत असल्याने शितलहरींचा प्रभाव वाढणार आह़े महाराष्ट्रात 1 हजार 14 हेक्टापास्कल इतका हवेचा दाब आह़े     -डॉ़ रामचंद्र साबळे,    हवामानतज्ज्ञ, पुण़े