शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
6
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
7
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
8
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
9
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
11
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
12
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
13
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
14
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
15
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
16
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
17
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
18
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
19
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
20
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...

ढगाळ वातावरण : शेतकऱ्यांनो गहू, हरभरा या पिकांना जपा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 13:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  रब्बीच्या सरासरी क्षेत्राइतके यंदाही क्षेत्र असले तरी यंदा ढगाळ वातावरण, पाऊस यामुळे पिकांना फटका ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  रब्बीच्या सरासरी क्षेत्राइतके यंदाही क्षेत्र असले तरी यंदा ढगाळ वातावरण, पाऊस यामुळे पिकांना फटका बसणार आहे. यामुळे पिकांची उत्पादकता देखील कमी होण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, ढगाळ वातावरणामुळे पिकांवर भूरी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते.त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी नियोजन करावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.                 यंदा हिवाळ्यात अर्थात येत्या काही महिन्यात अधूनमधून ढगाळ वातावरण व पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्याचा प्रत्यय डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच आला आहे. सलग तीन दिवस पाऊस झाला तर पाच दिवस ढगाळ वातावरण राहिले. यामुळे पेरणी झालेला गहू, हरभरा, मका, करडई या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यापुढील काळात देखील काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. हलका पावसाचाही अंदाज आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी पिकांचे आणि त्यावरील विविध किड, रोग यांचा प्रादुर्भाव यापासून पिकांचे संरक्षण या दृष्टीने नियोजन करावे असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. 

जिल्ह्यात ६२४ हेक्टर...जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र ६२४.६८ हेक्टर इतके आहे. जवळपास सर्वच क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. गेल्या वर्षी ५९०.५२ हेक्टर क्षेत्रात रब्बीचा पीकपेरा होता. यंदा नेहमीप्रमाणे गहू पिकाने सर्वाधीक क्षेत्र व्यापले आहे. त्याखालोखाल हरभरा आहे. 

असे आहे जिल्ह्यातील रबीचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)गहू    २११.२३ज्वारी    १६०.३३हरभरा    २०४.०४मका    ३३.८२करडई    १.५७

पाऊस झाल्यास कुठल्या पिकांना बसणार फटकायापुढील काळात पाऊस झाल्यास हरभरा, गहू या पिकांना सर्वाधिक फटका बसणार आहे. याशिवाय पपई, आंबा या फळपिकांवरही परिणाम होणार आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे पिकांचे फारसे नुकसान झाले नाही. परंतु यापुढे पक्व अवस्थेतील पिकांना धोका आहे. 

शेतकऱ्यांनी काय काय काळजी घ्यावीढगाच्छादित वातावरणात भुरी रोगाची वाढ कित्येक पटीने वाढते. रब्बी हंगामात ढगाळ हवामान असल्यास अधिक खबरदारी घ्यावी. मात्र, हलकासा  पाऊस झाल्यास भुरी रोगाचे बीजाणू फुटून मृत होतात. पाऊस संपताच भुरी रोगाच्या डागांमधून बीजाणूंची वाढ वेगाने होते. 

शेतकऱ्यांनी काय काय काळजी घ्यावीढगाच्छादित वातावरणात भुरी रोगाची वाढ कित्येक पटीने वाढते. रब्बी हंगामात ढगाळ हवामान असल्यास अधिक खबरदारी घ्यावी. मात्र, हलकासा  पाऊस झाल्यास भुरी रोगाचे बीजाणू फुटून मृत होतात. पाऊस संपताच भुरी रोगाच्या डागांमधून बीजाणूंची वाढ वेगाने होते.