शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
2
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
3
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
4
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
5
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
6
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
7
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
8
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
9
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
10
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
11
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
12
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
13
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
14
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
15
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
16
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
17
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
18
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
19
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
20
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!

बँक व्यवहार बंदचा शेतीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:29 IST

शेतीकामे ठप्प होण्याला सर्वस्वी लॉकडाऊन कारणीभूत असून हे असेच ३० तारखेपर्यंत चालले तर पेरणी तोंडावर येऊन शेती पडीक तर ...

शेतीकामे ठप्प होण्याला सर्वस्वी लॉकडाऊन कारणीभूत असून हे असेच ३० तारखेपर्यंत चालले तर पेरणी तोंडावर येऊन शेती पडीक तर पडणार नाही ना? अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. यासाठी शासनाने शेतीसंबंधीची दुकाने दिवसभर उघडण्याची मुभा दिली; परंतु बँकांचे आर्थिक व्यवहार सुरळीत सुरू ठेवण्याची मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे.

गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचे संकट हे पूर्ण व्यवसाय ठप्प करण्यासाठी कारणीभूत ठरत असून, याचा सर्वाधिक फटका हा शेती व्यवसायाला बसत आला आहे. त्याचबरोबर खतांच्या भावातही मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने बळिराजाचे आर्थिक नियोजन कोलमडताना दिसत आहे. शेतकरी अशा कठीण काळातही पोशिंदा बनून सर्वांची भूक भागवत असताना खर्चाच्या मानाने उत्पन्नाबाबत कमी पडत असताना भावाचे समीकरण जुळत नसतानाही या व्यवसायात टिकून आहे. सध्या खरीप पिकाची पेरणी तोंडावर येऊन ठेपली असून कडक लॉकडाऊनमुळे बँका व इतर सर्व शेतीसंबंधी दुकाने बंद असल्याने शेती व्यवसाय संकटात सापडला आहे. त्यातच बँका या ठरावीक वेळेत सुरू आहेत आणि या महिन्यात बँकांना शासकीय सुट्ट्या जास्त असल्यामुळे पीककर्जाविषयी कामे तसेच किरकोळ व्यवहार करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. याबाबत उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी आहे. शेतकऱ्यांचे बँकेत पैसे असताना आर्थिक व्यवहार सध्या बंद असल्याने ट्रॅक्टर व मजूर पैशांअभावी कामाला येणे टाळत आहेत. मे महिन्याचा दुसरा आठवडा उजाडला असून, बँकेची कर्जप्रकरणेही लॉकडाऊनच्या नावाखाली बंद झाली असल्याने पेरणी कशी करावी? या चिंतेत सध्या शेतकरी असून, पेरणीलाच यावर्षी मुकावे लागते की काय? अशी परिस्थिती सध्या झाली आहे.

अनेक शेतकऱ्यांची बागायतीला मूठमाती

आज अनेक शेतकऱ्यांनी भाजीपालावर्गीय पिकांची शेतात लागवड केली असताना अचानक १० दिवसांचा कडक लॉकडाऊन लागल्याने माल विकावा तरी कसा? या चिंतेने शेतकऱ्यांनी उभ्या पिकांत ट्रॅक्टर फिरविला आहे. अगोदरच लागलेला खर्चही निघाला नसताना ही परिस्थिती ओढवल्याने पुन्हा बागायती नकोच म्हणून त्यांनी घरातच बसणे पसंत केले आहे.

बँक व्यवहार बंदचा सर्वाधिक फटका

शेतकरी वर्ग हा जवळपास रोखीने सर्व व्यवहार करीत असल्याने व हा वर्ग अजूनही ऑनलाइन जमान्यात खूप मागे असल्याने बँका बंद राहणे त्यांच्यासाठी उपाशी राहण्यासारखे ठरते. सर्वाधिक बँक बंदचा फटका या शेतकऱ्यांना बसत आहे. बँकांचे व्यवहार बंद असल्याने ट्रॅक्टरच काय, मजूरही कामाला येत नसल्याने शेतीकामे ठप्प झाली आहेत.