समारोप सत्राला विद्या विकास मंडळाचे सचिव सुरेश रामराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.बी.पाटील तर प्रमुख पाहुणे एस.एन.डी.टी. विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.शशिकला वंजारी, डब्ल्यूएचओचे डॉ.मानस पनिग्रही उपस्थित होते. शशिकला वंजारी व मानस पाणीग्रही यांनी महाविद्यालयाचे कौतुक करत एवढ्या दुर्गम भागात असून,ही अशा शिबिराचे आयोजन करणे म्हणजे मोठी बाब असल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणात डॉ.पाटील यांनी एचआरडीसी पुणे यांच्यामुळे महाविद्यालयाला खूप मोठे काम करण्याची ऊर्जा निर्माण केल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रीय स्तरावरील १०० जणांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी सात सहभागींनी मनोगत व्यक्त केले. अहवाल वाचन प्रा.डॉ.जे.बी. बागुल यांनी केले. टेक्निकल बाबीची पूर्तता डॉ.साहेबराव ईशी यांनी सांभाळली. यशस्वीतेसाठी प्रा.आर.एस. पाटील, डॉ.आर.सी. बेडसे, डॉ.आर.जी. काकुस्ते, डॉ.अरूण पाटील, प्रा.एम.एल. सावंत, डॉ.ए.व्ही बाविस्कर प्रा.पी.एन. नाईक, प्रा.एमजी. वसावे, प्रा.एस.एस. पवार, डॉ.दिनेश खरात व जी.वाय. पाटील यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन डॉ.मनोज मुधोळकर तर आभार डॉ.महेश गांगुर्डे यांनी मानले.
अक्कलकुवा महाविद्यालयात सात दिवसीय शाखा विस्तारीकरण प्रकल्प शिबिराचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:29 IST