शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

हवामानातील बदलांमुळे रब्बी पेरण्यांवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 12:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अतीवृष्टी आणि अवकाळी पाऊस यातून झालेल्या नुकसानीच्या गर्तेतून शेतकरी बाहेर आले आले असले तरीही ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अतीवृष्टी आणि अवकाळी पाऊस यातून झालेल्या नुकसानीच्या गर्तेतून शेतकरी बाहेर आले आले असले तरीही हवामानात वारंवार होणाऱ्या बदलांमुळे जिल्ह्यातील रब्बी पेरण्यांची गती संथ झाली आहे़ परिणामी डिसेंबर उजाडूनही जिल्ह्यात केवळ १० हजार हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे़यंदाच्या रब्बी हंगामात सरासरी ६४ हजार हेक्टरवर गहू, हरभरासह इतर रब्बी पिके पेरणी करण्याचे निर्धारित करण्यात आले होते़ यात हरभरा पेरणी जागोजागी सुरु असली तरी गहू, ज्वारी, मका या पिकांच्या पेरण्या अद्यापही शिल्लक असल्याचे दिसून आले आहे़ शेतकऱ्यांना यंदा बियाणे व खते विनासायस उपलब्ध झाले असले तरी अतीवृष्टीमुळे हंगाम लांबल्याने रब्बीच्या पेरण्या होऊ शकलेले नाहीत़ बºयाच ठिकाणी कापूस अद्यापही शेतात असल्याने शेतकºयांना इतर पिकांची पेरणी करता आलेली नाही़ किमान १ महिना कापूस शेतात राहणार असल्याने रब्बी हंगामही यंदा लांबवणीवर पडण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे़ जिल्ह्यात सर्वाधिक रब्बी पेरणी क्षेत्र निर्धारित असलेल्या शहादा तालुक्यात अद्याप २६ टक्के पिकांची पेरणी झाली असून यात गहू आणि हरभरा या दोन पिकांना शेतकºयांनी पसंती दिली आहे़जिल्ह्यात आजअखेरीस १० हजार ६३० हेक्टर क्षेत्रात रब्बी पेरण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत़ यात नंदुरबार तालुक्यात १ हजार ५०२, नवापुर तालुक्यात १ हजार ८६३, अक्कलकुवा ५५७, तळोदा ९५२, धडगाव ४३१ तर सर्वाधिक ६ हजार ३२६ हेक्टर शहादा तालुक्यात पेरण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत़ कापूस वेचणी आणि विक्री यात बराच वेळ जात असल्याने शेतकºयांना रब्बी पेरण्यांसाठी वेळच मिळालेला नसल्याने या पेरण्या लांबल्याचे सांगण्यात येत आहे़ यातही नंदुरबार तालुक्यात ७७१ हेक्टर, नवापुर १७६, अक्कलकुवा २०१, शहादा १ हजार १७०, तळोदा १२७ तर धडगाव तालुक्यात १२४ हेक्टरवर गहू पेरा उरकण्यात आला आहे़ अतीवृष्टीचा समावेश असला तरी जिल्ह्यात पाऊस हा सरासरीच्या ११९ टक्के कोसळल्याने २१ हजार १२३ हेक्टरवर गहू पेरणी करण्यात येण्याचे निर्धारण होते़ त्यापैकी अद्याप केवळ २ हजार ५७५ हेक्टरवरच गहू पेरणी पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली आहे़ यातून यंदा किमान ९० टक्क्यांपर्यंत गहू पेरणी होणार असल्याचा अंदाज शेतकºयांचा आहे़ पाण्याची उपलब्ध असली तरी हंगामादरम्यान हवामानात बदल होऊन नुकसानीची भिती असल्याने अनेक शेतकरी इतर पिकांचा आधार घेत आहेत़जिल्ह्यात गहू पाठोपाठ हरभरा पिकावर शेतकºयांचा सर्वाधिक भरवसा आहे़ यंदाच्या हंगामात २० हजार ४०४ हेक्टरवर हरभरा पेरणी होण्याचा अंदाज आहे़ यातही शेतकºयांनी नोव्हेंबरपासून पेरण्यांना वेग दिल्याने जिल्ह्यात ३ हजार ८८७ हेक्टरपर्यंत हरभरा पेरणी पूर्ण झाली आहे़ सर्वाधिक १ हजार ७३६ हेक्टर हरभरा शहादा तालुक्यात आहे़ पाण्याच्या उपलब्धतेमुळे आगामी दिवसात हरभरा पेरण्यांना वेग येणार आहे़ यातून १०० टक्क्यांपेक्षा अधिक हरभरा पेरणी पूर्ण करण्यात येणार आहे़ एकीकडे रब्बी कडधान्य आणि धान्य पिकांना महत्त्व असताना करडई, जवस, तीळ, सूर्यफूल ही तेलबिया पिके जवळपास हद्दपार झाल्याचे चित्र शेतीक्षेत्रात आहे़ जिल्ह्यात फक्त १८ हेक्टरवर मोहरीची पेरणी करण्यात आली आहे़