शहरं
Join us  
Trending Stories
1
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
3
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
4
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
5
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
6
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
7
एकीकडे 'घरवाली' दुसरीकडे 'बाहेरवाली'; दोघींसोबत आनंदाने जगत होता तरुण अन् एक दिवस असं काही झालं... 
8
पितृपक्ष इंदिरा एकादशी २०२५: १० राशींवर श्रीहरी प्रसन्न, शिव-गौरी-लक्ष्मी कृपा; शुभ-लाभ-पैसा!
9
'क्रिस्टल ब्लॅक पर्ल' रंगात होंडा अमेझ भारतात लॉन्च; नव्या लूकमध्ये दिसते आणखी धासू!
10
बीचवर फिरायला गेलेल्या तरुणीवर बॉयफ्रेंडसमोरच सामूहिक बलात्कार; पोलिसांनी आरोपी कसे शोधले?
11
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
12
आयटी इंजिनिअरने १० टक्के पगारवाढ मागितली, नोकरी गमावली; मग त्याला काढणाऱ्याचीही गेली...
13
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
14
'ओझेम्पिक टीथ' म्हणजे काय? वजन कमी करण्याच्या औषधाचा होतोय 'असा' दुष्परिणाम
15
Nupur Bora: नुपूर बोरा आहे तरी कोण? सहा वर्षात अनेक गैरव्यवहार, घरातही सापडलं मोठं घबाड!
16
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
17
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
18
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
19
बंगल्याचा हव्यास, गोविंद बरगेंचा छळ; पूजा गायकवाडचा तुरुंगातील मुक्काम वाढला
20
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स

कोरोनामुक्त क्षेत्रात आठवी ते बारावीचे वर्ग शाळेत भरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:37 IST

मागील वर्षी शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत ऑनलाइन शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ...

मागील वर्षी शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत ऑनलाइन शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी करावयाच्या उपाययोजना व शिक्षकांच्या उपस्थितीबाबतही मार्गदर्शन परिपत्रकात केले आहे. शाळा बंद असल्यामुळे मुले एक वर्षापासून घरी बसली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर शारीरिक व मानसिक दुष्परिणाम होत आहे. शिवाय त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळा बंद व मुले घरी राहण्याचे दुष्परिणाम लक्षात घेता सामाजिक कौशल्याचे नुकसान, मोबाईल इंटरनेटचा गैरवापर, गेम खेळणे यामुळे ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे मानसिक तणाव, डोमेस्टिक व्हायलोन्सचे वाढते प्रमाण, मुलींचे ड्रॉप आऊट, शेतीकामात लावणे आदींमुळे मोठ्या प्रमाणावर सामाजिक नुकसान लक्षात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणाचा लाभ

शासनाने शाळा सुरू करण्यापूर्वी व शाळा सुरू झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यात शाळेत स्वच्छता व निर्जंतुकीकरणविषयक सुविधा सुनिश्चित करणे, शिक्षकांची कोरोनाबाबत चाचणी करणे, वर्गखोली तसेच स्टॉप रूममधील बैठक व्यवस्था, शारीरिक अंतराच्या नियमानुसार करणे, शाळेतील कार्यक्रम परिपाठ, स्नेहसंमेलन, क्रीडा यावर निर्बंध असावेत, आजारी असलेल्या मुलांना पालकांनी शाळेत पाठवू नये, विद्यार्थी, पालक, शिक्षक व समाजातील सदस्यांना कोरोनासंदर्भातील आव्हाने व त्यामागची भूमिका याबाबत जागृत करणे, शाळेत व शाळेच्या परिसरात स्वच्छता आरोग्यदायी परिस्थिती सतत राखणे, शाळेत विद्यार्थ्यांना सुरक्षित ठेवणे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाची सोय करणे, कर्मचारी व विद्यार्थी यांचा सुरक्षित प्रवेश व गमन याची व्यवस्था करणे, वर्गखोल्या व इतर ठिकाणी सुरक्षिततेच्या मानकांची खात्री करणे, तसेच कोरोना संशयित रुग्ण आढळल्यास करावयाची कार्यवाही याबाबत सर्वांना माहिती असावी, हे शासनाने नमूद केले आहे.

ग्रामपंचायतींनी ठराव करावा, यासाठी कोरोनामुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्याचे धोरण शासनाने जाहीर केले आहे.

शाळा सुरू करण्यासाठी शासनाने अटी जाहीर केल्या आहेत. त्यात ग्रामीण भागात कोरोनामुक्त गावात ग्रामपंचायतीने आठवी ते बारावी वर्ग सुरू करण्यासाठी पालकांशी चर्चा करून ठराव करावा, शाळेत मुलांना टप्प्याटप्प्याने बोलवावे, संबंधित सर्व सूचनांचे काटेकोर पालन करावे, एका बाकावर एक विद्यार्थी बसविणे, दोन बाकात सहा फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त १५ ते २० विद्यार्थी बसविणे, सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठवणे व लगेच कोरोना चाचणी करणे आदींचा समावेश आहे.