शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

कोरोनामुक्त क्षेत्रात आठवी ते बारावीचे वर्ग शाळेत भरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:37 IST

मागील वर्षी शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत ऑनलाइन शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ...

मागील वर्षी शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत ऑनलाइन शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी करावयाच्या उपाययोजना व शिक्षकांच्या उपस्थितीबाबतही मार्गदर्शन परिपत्रकात केले आहे. शाळा बंद असल्यामुळे मुले एक वर्षापासून घरी बसली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर शारीरिक व मानसिक दुष्परिणाम होत आहे. शिवाय त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळा बंद व मुले घरी राहण्याचे दुष्परिणाम लक्षात घेता सामाजिक कौशल्याचे नुकसान, मोबाईल इंटरनेटचा गैरवापर, गेम खेळणे यामुळे ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे मानसिक तणाव, डोमेस्टिक व्हायलोन्सचे वाढते प्रमाण, मुलींचे ड्रॉप आऊट, शेतीकामात लावणे आदींमुळे मोठ्या प्रमाणावर सामाजिक नुकसान लक्षात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणाचा लाभ

शासनाने शाळा सुरू करण्यापूर्वी व शाळा सुरू झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यात शाळेत स्वच्छता व निर्जंतुकीकरणविषयक सुविधा सुनिश्चित करणे, शिक्षकांची कोरोनाबाबत चाचणी करणे, वर्गखोली तसेच स्टॉप रूममधील बैठक व्यवस्था, शारीरिक अंतराच्या नियमानुसार करणे, शाळेतील कार्यक्रम परिपाठ, स्नेहसंमेलन, क्रीडा यावर निर्बंध असावेत, आजारी असलेल्या मुलांना पालकांनी शाळेत पाठवू नये, विद्यार्थी, पालक, शिक्षक व समाजातील सदस्यांना कोरोनासंदर्भातील आव्हाने व त्यामागची भूमिका याबाबत जागृत करणे, शाळेत व शाळेच्या परिसरात स्वच्छता आरोग्यदायी परिस्थिती सतत राखणे, शाळेत विद्यार्थ्यांना सुरक्षित ठेवणे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाची सोय करणे, कर्मचारी व विद्यार्थी यांचा सुरक्षित प्रवेश व गमन याची व्यवस्था करणे, वर्गखोल्या व इतर ठिकाणी सुरक्षिततेच्या मानकांची खात्री करणे, तसेच कोरोना संशयित रुग्ण आढळल्यास करावयाची कार्यवाही याबाबत सर्वांना माहिती असावी, हे शासनाने नमूद केले आहे.

ग्रामपंचायतींनी ठराव करावा, यासाठी कोरोनामुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्याचे धोरण शासनाने जाहीर केले आहे.

शाळा सुरू करण्यासाठी शासनाने अटी जाहीर केल्या आहेत. त्यात ग्रामीण भागात कोरोनामुक्त गावात ग्रामपंचायतीने आठवी ते बारावी वर्ग सुरू करण्यासाठी पालकांशी चर्चा करून ठराव करावा, शाळेत मुलांना टप्प्याटप्प्याने बोलवावे, संबंधित सर्व सूचनांचे काटेकोर पालन करावे, एका बाकावर एक विद्यार्थी बसविणे, दोन बाकात सहा फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त १५ ते २० विद्यार्थी बसविणे, सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठवणे व लगेच कोरोना चाचणी करणे आदींचा समावेश आहे.