शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
3
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
4
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
5
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
6
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
7
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
8
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
9
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
10
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
11
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
12
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
13
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
14
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
15
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
16
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
17
इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
18
ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
20
वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना

आठवी ते १२ वीचे वर्ग १५ जुलैपासून सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:20 IST

खांडबारा : राज्य शासनाने इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासंबंधीचे सोमवारी काढलेल्या शालेय विभागाच्या परिपत्रकात नव्याने सुधारणा करून ...

खांडबारा : राज्य शासनाने इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासंबंधीचे सोमवारी काढलेल्या शालेय विभागाच्या परिपत्रकात नव्याने सुधारणा करून १५ जुलैपासून राज्यात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे.

मात्र, वर्ग सुरू करण्यापूर्वी गावात एक महिना अगोदर तरी कोरोना रुग्ण आढळलेला नसावा, ग्रामपंचायत स्तरावर समिती गठित करावी, शिक्षकांची कोरोना टेस्ट करावी, शिक्षकांचे लसीकरण करावे, विद्यार्थ्यांनी शाळेत यावे यासाठी ‘चला मुलांनो, शाळेत चला’ ही मोहीम राबवण्याचे शालेय शिक्षण विभागाने कळविले आहे.

राज्यात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासंबंधीचे परिपत्रक सोमवारी शालेय शिक्षण विभागाने जाहीर केले होते; परंतु काही वेळातच ते मागे घेतले गेले. त्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, शालेय शिक्षण विभागाने आधीच या परिपत्रकात बदल करून नवीन परिपत्रक जाहीर केले व १५ जुलैपासून आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता दिली.

ग्रामपंचायत स्तरावर सरपंच यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवक मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांची समिती गठित करून चर्चा करावी. तसेच शाळा सुरू करण्यापूर्वी गावात किमान एक महिना अगोदर तरी कोरोना रुग्ण आढळलेला नसावा, शाळेतील सर्व शिक्षकांचे लसीकरणाचे नियोजन करावे, त्यासाठी शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करावा.

शाळेत कोरोनाबाधित विद्यार्थी आढळल्यास त्वरित शाळा बंद करून निर्जंतुकीकरण करावे, विद्यार्थ्यांना विलगीकरण कक्षात दाखल करावे, वैद्यकीय तपासणी करावी, शाळा तात्पुरती बंद करावी लागल्यास शिक्षण सुरू राहण्यासाठी काय उपाययोजना करावी, याचा कृती आराखडा तयार करण्यासंबंधी सूचना परिपत्रकात देण्यात आल्या आहेत.

शाळा सुरू करण्यापूर्वी ‘चला मुलांनो शाळेत चला’ ही मोहीम राबवावी. तसेच शिक्षक व कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करून त्यांचे रिपोर्ट व्यवस्थापनाने तपासावे व ते दप्तरी ठेवावे. सर्व कर्मचाऱ्यांचे आणि शिक्षकांचे लसीकरण करून घ्यावे. विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यासाठी पालकांचे संमतीपत्र घेण्यात यावे. शाळेत कोरोना संबंधीचे सर्व नियम काटेकोरपणे पाळावेत. सर्वांनी मास्क लावणे, सामाजिक अंतर पाळणे, सातत्याने साबणाने हात धुण्यासाठी शाळेत उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे शिक्षण विभागाच्या परिपत्रकात दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे. शाळा सुरू होणार असल्याने एकंदरीत विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.