शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

आठवी ते १२ वीचे वर्ग १५ जुलैपासून सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:20 IST

खांडबारा : राज्य शासनाने इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासंबंधीचे सोमवारी काढलेल्या शालेय विभागाच्या परिपत्रकात नव्याने सुधारणा करून ...

खांडबारा : राज्य शासनाने इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासंबंधीचे सोमवारी काढलेल्या शालेय विभागाच्या परिपत्रकात नव्याने सुधारणा करून १५ जुलैपासून राज्यात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे.

मात्र, वर्ग सुरू करण्यापूर्वी गावात एक महिना अगोदर तरी कोरोना रुग्ण आढळलेला नसावा, ग्रामपंचायत स्तरावर समिती गठित करावी, शिक्षकांची कोरोना टेस्ट करावी, शिक्षकांचे लसीकरण करावे, विद्यार्थ्यांनी शाळेत यावे यासाठी ‘चला मुलांनो, शाळेत चला’ ही मोहीम राबवण्याचे शालेय शिक्षण विभागाने कळविले आहे.

राज्यात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासंबंधीचे परिपत्रक सोमवारी शालेय शिक्षण विभागाने जाहीर केले होते; परंतु काही वेळातच ते मागे घेतले गेले. त्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, शालेय शिक्षण विभागाने आधीच या परिपत्रकात बदल करून नवीन परिपत्रक जाहीर केले व १५ जुलैपासून आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता दिली.

ग्रामपंचायत स्तरावर सरपंच यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवक मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांची समिती गठित करून चर्चा करावी. तसेच शाळा सुरू करण्यापूर्वी गावात किमान एक महिना अगोदर तरी कोरोना रुग्ण आढळलेला नसावा, शाळेतील सर्व शिक्षकांचे लसीकरणाचे नियोजन करावे, त्यासाठी शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करावा.

शाळेत कोरोनाबाधित विद्यार्थी आढळल्यास त्वरित शाळा बंद करून निर्जंतुकीकरण करावे, विद्यार्थ्यांना विलगीकरण कक्षात दाखल करावे, वैद्यकीय तपासणी करावी, शाळा तात्पुरती बंद करावी लागल्यास शिक्षण सुरू राहण्यासाठी काय उपाययोजना करावी, याचा कृती आराखडा तयार करण्यासंबंधी सूचना परिपत्रकात देण्यात आल्या आहेत.

शाळा सुरू करण्यापूर्वी ‘चला मुलांनो शाळेत चला’ ही मोहीम राबवावी. तसेच शिक्षक व कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करून त्यांचे रिपोर्ट व्यवस्थापनाने तपासावे व ते दप्तरी ठेवावे. सर्व कर्मचाऱ्यांचे आणि शिक्षकांचे लसीकरण करून घ्यावे. विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यासाठी पालकांचे संमतीपत्र घेण्यात यावे. शाळेत कोरोना संबंधीचे सर्व नियम काटेकोरपणे पाळावेत. सर्वांनी मास्क लावणे, सामाजिक अंतर पाळणे, सातत्याने साबणाने हात धुण्यासाठी शाळेत उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे शिक्षण विभागाच्या परिपत्रकात दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे. शाळा सुरू होणार असल्याने एकंदरीत विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.