लोकमत न्यूज नेटवर्कमंदाणे : शहादा ते मंदाणे राज्य मार्गाचे रूंदीकरणाचे काम वेगाने सुरू झाले आहे. या मार्गावरील पिंपर्डे गावाजवळील ३०० वर्षापासून अनेक पिढ्यांचे साक्षीदार ठरलेल्या व हजारो वाटसुरूंना सावलीच्या रूपाने मायेची उब देवून सर्वांचे आश्रयस्थान बनलेला वडाचा महाकाय वृक्ष रस्ता कामामुळे लवकरच नामशेष होणार असल्याने पिंपर्डे ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांनी हे वृक्षमंदिर वाचविण्याची धडपड चालवली आहे.यासाठी बाजूच्या शेतकऱ्यांनी बाजुकडील जागाही देण्याची तयारी दर्शविली आहे. याबाबत बांधकाम विभाग काय भूमिका घेते याकडे परिसराचे लक्ष लागले आहे. याबाबत असे की, शहादा तालुक्यातील पिंपर्डे गाव शिवारात असलेले हे अजस्त्र वडाचे झाड सुमारे ३०० वर्षापासून पुरातन काळापासून दिमाखात उभे आहे.या महाकाय वृक्षाजवळच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या काळातील विहीरदेखील आहे. या दोन्ही वास्तु पुरातन काळाची साक्ष देणाºया आहेत. गावापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असणाºया या वृक्षाच्या छायेत तिन-चार पिढ्या खेळल्या, बागडल्या आहेत. या महाकाय वटवृक्षावर पोपट, वटवाघुळे, बगळे, कावळे, मधमाशांचे पोळे असे असंख्य पक्षी विसावलेले असतात. हा वटवृक्ष मोठ्या प्रमाणात प्राणवायूचीही निर्मिती करतो.पौराणिक व धार्मिक दृष्ट्यादेखील महत्त्व या वृक्षाला आहे. वटपौर्णिमेनिमित्त पंचक्रोशितील कित्येक महिला मोठ्या श्रद्धेने या वृक्षाची पुजा मोठ्या श्रद्धेने करतात. यामुळे आठवणींचा ठेवा व पुरातन काळाची साक्ष देणारा हा महाकाय वृक्ष आता रस्ता कामात अडथळा ठरला अहे.शहादा ते मंदाणे, वडगाव ते शहाणे-मालकातर या राज्यमार्गाच्या रूंदीकरणाचे काम गेल्या काही महिन्यांपासून वेगाने सुरू झाले आहे. या रस्ता कामात अनेक झाडे येत असल्याने त्याची कटाई करण्यासाठी वनविभागाकडे परवानगीही घेण्यात आली होती. आता वनविभागानेही वृक्ष तोडीस परवानगी दिल्याने गेल्या १० ते १५ दिवसापासून रस्ता कामात अडथळा ठरणाºया झाडांची कटाई करण्यास सुरुवात झाली आहे.याच महामार्गावरील कर्जोत ते पिंपर्डे दरम्यान रस्त्याला लागूनच हे सर्वात मोठे वडाचे झाड आहे. उन्हाळा असो की, पावसाळा अशावेळी ये-जा करणºया वाटसुरुंना या वटवृक्षाखाली क्षणभर का असेना थांबण्याचा मोह होणार नाह, असे कधी होणार नाही. हजारो भाविकांना आश्रय देणारे व भाविकांचे श्रद्धास्थान बनलेले हे वृक्षमंदिर तोडले जावू नये, अशी काही पर्यावरण प्रेमींनी भूमिका घेतली असून, ते वाचविण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू आहे.हे झाड तोडले जावू नये यासाठी निवेदनही काही जागरूक नागरिकांनी संबंधितांकडे दिले आहे. त्याचप्रमाणे झाड वाचविण्यासाठी बाजूच्या शेतकºयानी रस्त्यासाठी जागाही देण्याची तयारी दर्शविली आहे.
३०० वर्षापासूनचा वटवृक्ष वाचविण्यासाठी नागरिकांची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 11:51 IST