शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

 सहा पाड्यावरील नागरिकांना देहली ओलांडून जावे लागते 'ओहवा'ला

By रमाकांत.फकीरा.पाटील | Updated: September 21, 2023 19:56 IST

नदीवर फरशीपूल नसल्याने सहा पाड्यातील ग्रामस्थांना ओहवा या गावी येण्यासाठी पुराच्या पाण्यातून वाट काढावी लागत असल्याचे चित्र आहे.  

नंदुरबार : नदीवर फरशीपूल नसल्याने सहा पाड्यातील ग्रामस्थांना ओहवा या गावी येण्यासाठी पुराच्या पाण्यातून वाट काढावी लागत असल्याचे चित्र आहे.  यामुळे विद्यार्थ्यांचेदेखील नुकसान होत असून गावातील शाळेत येण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. सातपुड्यातील दुर्गम भागात असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील ओहवाच्या गोरजाबारीपाडा येथून देहली नदी वाहते. या नदीमुळे गावाच्या अंतर्गत येणाऱ्या सहा पाड्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असते. 

त्यात गोरजाबारीपाडासह कौलवीमाळपाडा, खाईपाडा, आधारबारीपाडा, बेझीलपाडा, जागदापाडा, पाडवीपाडा या पाड्यांचा समावेश आहे. या पाड्यांचा दैनंदिन व्यवहार हा ओहवा गावाशी आहे. दळणाची चक्की, शाळा, किराणा दुकान, ग्रामपंचायतींची कामे ओहवा गावात येऊनच करावी लागतात. परंतु पावसाळ्यात नदी दुथडी भरून वाहत असल्याने या पाड्यावरील शेकडो नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. नदीच्या पाण्यातूनच मार्ग काढावा लागतो. शिवाय विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असते. रुग्ण, गरोदर महिला यांना देखील अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे देहली नदीवर पूल बांधावा, अशी मागणी या भागातील ग्रामस्थांनी केली आहे. पावसाळ्यात नदीला पाणी असल्यास जीव धोक्यात घालून जावे लागते. विद्यार्थी, गर्भवती महिला, रुग्ण यांनाही त्रासाला सामोरे जावे लागते. नदीवर पूल झाल्यास सर्वच नागरिकांना सोयीचे होणार आहे. - सुभाष पाडवी,  ग्रामस्थ, ओहवाचा गोरजाबारीपाडा.

टॅग्स :nandurbar-acनंदुरबार