शहरं
Join us  
Trending Stories
1
'एपस्टाईन फाइल'मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव; मस्क यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर टाकला मोठा बॉम्ब
2
“आता आमच्यातील मैत्री पुढे टिकेल का, ते माहिती नाही”; मस्क यांच्या विधानावर ट्रम्प थेट बोलले
3
१९५७पासून कुटुंब काँग्रेससोबत, पण आता २ बंधू शिवसेनेत; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
4
लेख: आज दोस्ती आहे; पण उद्या कुस्ती होऊ शकते! महाराष्ट्राचं राजकारणात रंजक वळणावर
5
Raja Raghuvanshi : "बेटा, मला तुझी आठवण आली, तू काही खाल्लंस का?"; राजा रघुवंशीचा आईसोबतचा शेवटचा संवाद
6
"चीन १०० वर्षांच्या योजना आखतो, भारत भूतकाळात अडकलाय," दिग्गजानं फरक समजावून केलं मोठं वक्तव्य
7
१२ वर्षांनी बुध-गुरु युती: १६ दिवस ७ राशींना दुप्पट लाभ, व्यापार-नोकरीत यश; शुभ-कल्याण होईल!
8
आजचे राशीभविष्य: ०६ जून २०२५; आर्थिक लाभ होईल, खूप विचार व संताप मानसिक स्वास्थ्य बिघडवेल
9
मोदी पाकिस्तानशी जहाल भाषेत का बोलतात? ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरच्या भाषणात दिसली झलक
10
उद्धव-राज यांनीच एकमेकांशी बोलायला हवे, आम्ही बोलून फरक पडणार नाही- अमित ठाकरे
11
समृद्धी महामार्ग राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कॉरिडॉर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
प्लास्टिकला नो, पर्यावरणाला हो म्हणा; पंकजा मुंडे यांचे आवाहन; प्लास्टिकविरोधी मोहीम सुरू
13
धारावी पुनर्वसन: भाजपाचे आशिष शेलार अन् काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यात ‘तू तू मै मै’
14
अकरावी प्रवेश: येत्या रविवारी गुणवत्ता प्रवेश फेरी; १२.७ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; मुदत संपुष्टात
15
रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांची सुरक्षितता अजूनही वाऱ्यावरच; आगीच्या घटनेने जनतेत राग
16
शिक्षकांसाठीच्या परीक्षेत झाला गोंधळ; अनेक विवाहित महिला परीक्षेपासून वंचित
17
विधि सीईटीत १०० पर्सेंटाईलचे चार विद्यार्थी चौकशीच्या फेऱ्यात; गैरप्रकाराचा संशय
18
राज्यातील २९५ शिक्षण संस्थांची मान्यता रद्द; कामगिरी मूल्यांकन अहवाल न दिल्याने कारवाई
19
‘आरटीई’साठी १७६ कोटी मंजूर; पहिली ते आठवीपर्यंतच्या ४.७ लाख विद्यार्थ्यांना लाभ
20
९०३ जलसंधारण योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द; रखडलेल्या प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांचा दणका

लोकशाही दिनाकडे नागरिकांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 21:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तक्रारी निकाली निघण्याचे प्रमाण आणि त्याची अंमलबजावणी याचे प्रमाण पहाता जिल्हास्तरीय लोकशाही दिनाकडे नागरिकांकडून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तक्रारी निकाली निघण्याचे प्रमाण आणि त्याची अंमलबजावणी याचे प्रमाण पहाता जिल्हास्तरीय लोकशाही दिनाकडे नागरिकांकडून पाठ फिरविली जात असल्याचे दिसून येत आहे. वर्षभरात ३३ तक्रारी दाखल करण्यात आल्या पैकी अवघ्या नऊ तक्रारी निकाली निघाल्या आहेत. दरम्यान, लोकसभा, विधानसभा आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे चार महिने लोकशाही दिनच झाला नाही.सर्वसामान्य नागरिकांना जलद गतीने न्याय मिळावा व त्यांच्या तक्रारींचे निराकारण व्हावे यासाठी शासनाने लोकशाही दिनाचा उपक्रम सुरू केला आहे. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरावर हा दिन आयोजित केला जात असतो. सुरुवातीला या ठिकाणी येणाऱ्या तक्रारींचे प्रमाण चांगले होते. नंतर मात्र तक्रारींची संख्या एक आकडी संख्येवर येवून ठेपली आहे. याला कारण तक्रारी निकाली निघण्याचे कमी असलेले प्रमाण हे कारण कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे.नंदुरबार जिल्ह्यात गेल्या १२ महिन्यापैकी चार महिने लोकसभा, विधानसभा आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हा दिन आयोजितच केला गेला नसल्याची स्थिती आहे. आठ महिन्यात दाखल झालेल्या ३३ तक्रारींपैकी अवघ्या नऊ तक्रारी निकाली निघाल्या आहेत.तक्रारी दाखल करतांना त्या शासनाच्या विविध विभागांसदर्भात असणे आवश्यक असते. परंतु अनेक नागरिक हे त्यांच्या वैयक्तिक स्वरूपाच्या तक्रारी दाखल करीत असतात. अशा तक्रारी स्थानिक पोलीस ठाणे किंवा संबधीत ठिकाणी निकाली निघू शकतात. परंतु लोकशाही दिनाचे अस्त्र वापरून अशा तक्रारी दाखल करण्याचे प्रमाण सुरुवातीला सर्वाधिक होते. नंतर ते प्रमाण कमी झाले आहे.लोकशाही दिनाच्या तक्रारी ऐकण्यासाठी सर्व संबधित विभागांच्या प्रमुखांना उपस्थित राहणे आवश्यक असते. त्यात स्वत: जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, बांधकाम विभाग, परिवहन विभाग, सहकार विभाग, कृषी, पाणीपुरवठा, नगरपालिका मुख्याधिकारी यांच्यासह इतर सर्व प्रमुख विभागांचे अधिकारी यांची उपस्थित आवश्यक असते.तक्रार दाखल केल्यानंतर त्याची पोचपावती मिळत असते. तक्रारीचा अर्ज संबधित विभागाकडे पाठविला जातो. प्रत्यक्ष लोकशाही दिनाच्या दिवशी त्यावर चर्चा होऊन संबधिताचे समाधान करण्याचा प्रयत्न असतो.तक्रारदाराचे म्हणने ऐकुण घेत संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण द्यावे लागते. त्यानंतर जिल्हाधिकारी ती तक्रार निकाली काढत असतात.

ार्वाधिक तक्रारींचे प्रमाण हे वसाहतींमध्ये अतिक्रमण, घराजवळ अतिक्रमण, पोलीस ठाणे, वाहन, घर विक्री यासह इतर प्रकारच्या तक्रारींच्या लोकशाही दिनात समावेश होत आहे. महिला लोकशाही दिनात देखील अशाच प्रकारच्या तक्रारी येत असतात. तालुकास्तरावरील लोकशाही दिनाची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. अनेक वेळा तर तालुकास्तरीय लोकशाही दिनात एकही तक्रार दाखल राहत नाही.