शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

लोकशाही दिनाकडे नागरिकांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 21:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तक्रारी निकाली निघण्याचे प्रमाण आणि त्याची अंमलबजावणी याचे प्रमाण पहाता जिल्हास्तरीय लोकशाही दिनाकडे नागरिकांकडून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तक्रारी निकाली निघण्याचे प्रमाण आणि त्याची अंमलबजावणी याचे प्रमाण पहाता जिल्हास्तरीय लोकशाही दिनाकडे नागरिकांकडून पाठ फिरविली जात असल्याचे दिसून येत आहे. वर्षभरात ३३ तक्रारी दाखल करण्यात आल्या पैकी अवघ्या नऊ तक्रारी निकाली निघाल्या आहेत. दरम्यान, लोकसभा, विधानसभा आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे चार महिने लोकशाही दिनच झाला नाही.सर्वसामान्य नागरिकांना जलद गतीने न्याय मिळावा व त्यांच्या तक्रारींचे निराकारण व्हावे यासाठी शासनाने लोकशाही दिनाचा उपक्रम सुरू केला आहे. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरावर हा दिन आयोजित केला जात असतो. सुरुवातीला या ठिकाणी येणाऱ्या तक्रारींचे प्रमाण चांगले होते. नंतर मात्र तक्रारींची संख्या एक आकडी संख्येवर येवून ठेपली आहे. याला कारण तक्रारी निकाली निघण्याचे कमी असलेले प्रमाण हे कारण कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे.नंदुरबार जिल्ह्यात गेल्या १२ महिन्यापैकी चार महिने लोकसभा, विधानसभा आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हा दिन आयोजितच केला गेला नसल्याची स्थिती आहे. आठ महिन्यात दाखल झालेल्या ३३ तक्रारींपैकी अवघ्या नऊ तक्रारी निकाली निघाल्या आहेत.तक्रारी दाखल करतांना त्या शासनाच्या विविध विभागांसदर्भात असणे आवश्यक असते. परंतु अनेक नागरिक हे त्यांच्या वैयक्तिक स्वरूपाच्या तक्रारी दाखल करीत असतात. अशा तक्रारी स्थानिक पोलीस ठाणे किंवा संबधीत ठिकाणी निकाली निघू शकतात. परंतु लोकशाही दिनाचे अस्त्र वापरून अशा तक्रारी दाखल करण्याचे प्रमाण सुरुवातीला सर्वाधिक होते. नंतर ते प्रमाण कमी झाले आहे.लोकशाही दिनाच्या तक्रारी ऐकण्यासाठी सर्व संबधित विभागांच्या प्रमुखांना उपस्थित राहणे आवश्यक असते. त्यात स्वत: जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, बांधकाम विभाग, परिवहन विभाग, सहकार विभाग, कृषी, पाणीपुरवठा, नगरपालिका मुख्याधिकारी यांच्यासह इतर सर्व प्रमुख विभागांचे अधिकारी यांची उपस्थित आवश्यक असते.तक्रार दाखल केल्यानंतर त्याची पोचपावती मिळत असते. तक्रारीचा अर्ज संबधित विभागाकडे पाठविला जातो. प्रत्यक्ष लोकशाही दिनाच्या दिवशी त्यावर चर्चा होऊन संबधिताचे समाधान करण्याचा प्रयत्न असतो.तक्रारदाराचे म्हणने ऐकुण घेत संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण द्यावे लागते. त्यानंतर जिल्हाधिकारी ती तक्रार निकाली काढत असतात.

ार्वाधिक तक्रारींचे प्रमाण हे वसाहतींमध्ये अतिक्रमण, घराजवळ अतिक्रमण, पोलीस ठाणे, वाहन, घर विक्री यासह इतर प्रकारच्या तक्रारींच्या लोकशाही दिनात समावेश होत आहे. महिला लोकशाही दिनात देखील अशाच प्रकारच्या तक्रारी येत असतात. तालुकास्तरावरील लोकशाही दिनाची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. अनेक वेळा तर तालुकास्तरीय लोकशाही दिनात एकही तक्रार दाखल राहत नाही.