शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

लाखानी पार्कमधील नागरिकांची पाण्यासाठी वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 11:54 IST

नवापूर पालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन : मुलभूत सुविधांचीही वाणवा, अनियमित स्वच्छतेमुळे दुर्गंधी

नवापूर : शहरातील लाखानी पार्क परिसरात पिण्याच्या पाण्याची वाणवा झाल्याने नागरिकांनी थेट पालिका कार्यालय गाठत गाºहाणे मांडले. हा भाग उपेक्षित राहत असल्याची तक्रार करताना नागरिकांनी घंटागाडी आणि अन्य सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली.पालिका मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांची भेट घेत लाखाणी पार्क परिसरातील महिलांसह पुरुष मंडळीने निवेदन सादर करून विविध समस्यांकडे त्यांचे लक्ष वेधले. याआधी नागरिकांनी गेल्या तीन महिन्यात तीन निवेदन सादर केली असतानाही समस्या ‘जैसे थे’च आहेत. मार्च महिना संपला असताना उन्हाची दाहकता वाढत आहे तर लाखाणी पार्क परिसरात पिण्याच्या पाण्याची वाणवा सुरु झाली आहे. पालिका कार्यालयात वारंवार संपर्क करुनही नागरी सुविधा देण्याकामी पालिकेचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. पालिकेच्या दृष्टीकोनातून लाखाणी पार्क परिसरात रहिवास करणारे नागरीक हे नवापूर शहराचे नागरीक नाहीत की काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. प्राथमिक सुविधा उपलब्ध करुन देण्याची वारंवार मागणी करुनही आमच्या मागण्यांना केराची टोपली दाखविली जात आहे. लाखाणी पार्क परिसरात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई झाली असून गेल्या १५ दिवसांपासून पाणी नाही हे लक्षात घेता याबाबत नियोजन करुन टँकरद्वारे अथवा आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून नियोजन करुन नियमित व सुरळीतपणे पिण्याचे पाणी उपलब्ध करुन द्यावे ही मागणी करताना काही महिलांचे अश्रू अनावर झाले. लाखाणी पार्क परिसरात मागील दोन महिन्यांपासून घंटागाडी येणे बंद झाले आहे. पर्यायाने घरातील केरकचरा उघड्यावर टाकण्याची वेळ परिसरातील नागरीकांवर आलेली आहे. यामुळे दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे. असे झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी पालिका प्रशासनाची राहील, असा इशारा देण्यात आला आहे.यापूर्वी परिसरातील जोडरस्ता व ड्रेनेज लाईन तयार करणेकामी पालिकेत ठराव झालेला आहे. मात्र झालेल्या ठरावाच्या अनुषंगाने अंदाजपत्रक तयार करणे, तांत्रिक व प्रशासकीय मान्यता घेणे या बाबी पूर्णपणे दुर्लक्षीत करण्यात आलेल्या आहेत. या प्रकरणाची चौकशी करुन सर्व संबंधितांवर जबाबदाऱ्या निश्चित करण्याची कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. लाखाणी पार्क परिसरात पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ तयार असून त्याच्या वापराचे नियोजन यापूर्वीच झाले असते तर परिसरातील नागरीकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागले नसते. मुलभूत नागरी समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन बांधण्यात आलेल्या जलकुंभातून पाण्याचा पुरवठा तात्काळ सुरु करण्यात यावा अशी मागणी करतांना येत्या चार दिवसात मागण्या मान्य होण्याच्या दृष्टीकोनातून कार्यवाही न झाल्यास पालिका कार्यालयासमोर उपोषण करणे, मोर्चा काढणे, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार करणे, मुख्यमत्री पोर्टलवर तक्रार करणे, लोकशाही दिनात तक्रार करणे यासारख्या सनदशीर मार्गाने लढा उभारण्याचा इशारा परवेज लाखाणी, नासीर खान, रज्जाक सैयद, इंद्रजित गावीत, प्रकाश खरमोळ, हॉबेल गावीत, दिलीप गावीत, गोविंद चौधरी, जुबेर सैयद, जाकीर शेख, रशीदा खाटीक, रुबीना खाटीक, शाहीन आसीफ खाटीक, अजीम खाटीक, रशमीन शेख, फराज खाटीक, सायमा खाटीक, सोफीन खाटीक, ईशफान खान, इमरान खान यांच्यासह लाखानी पार्कमधील ८६ कुटुंब प्रमुख रहिवाशांनी दिला आहे.लाखानी पार्क भागात सांडपाणी वाहण्यासाठी पालिकेने जागा उपलब्ध करुन दिलेली नाही. रहिवाशांनी रस्त्याच्या पलीकडे शोषखड्डा करुन हे सांडपाणीचे व्यवस्थापन केले आहे. कालांतराने हा शोषखड्डा भरल्यास हे सर्व पाणी रंगावली नदीच्या केटीवेअर बंधाºयात जाऊ शकते ही अडचण नागरिकांनी बोलून दाखविली. पालिकेचे गटनेते गिरीश गावीत यांची भेट घेऊन लाखानी पार्कमधील रहिवाशांनी त्यांनाही निवेदन देऊन चर्चा केली.