शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

तळोद्यात वाळूच्या साठ्यांनी नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 12:37 IST

कारवाईची मागणी : वसाहतींसह मुख्य रस्त्यांवरील चित्र, रहदारीस अडथळा

तळोदा : तालुक्यात वाळू माफिया पुन्हा सक्रीय झाले असून, आता थेट वसाहतींमध्येच मोठ्या प्रमाणात वाळूंचे साठे केले जात असल्याचे चित्र आहे. प्रशासनाकडून कारवाई थांबल्यामुळे साठे बहादरांचेही फावले असल्याचा आरोप आहे. याबाबत प्रशासनानेदेखील ठोस भूमिका घेण्याची मागणी होत आहे.अवैध गौण खनिज प्रकरणी वरिष्ठ आणि तालुका महसूल प्रशासनाने ठोस कार्यवाही केली होती. साहजिकच गेल्या वर्ष-दीड वर्षापासून विशेषत: हातोडा येथील तापी नदी जवळील अवैध वाळू वाहतुकीवर अक्षरश: चाप बसला होता. या कालावधीत प्रशासनाने मोठ्या प्रमाणात वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करून वाहनमालकांवर दंडात्मक कारवाईही केली होती. परिणामी या दंडात्मक कारवाईतून शासनाच्या गंगाजळीत सुद्धा प्रचंड महसूल जमा झाला होता.दरम्यान सध्या निवडणुकीच्या कामात प्रशासन व्यस्त झाल्याची संधी साधत वाळू माफिया पुन्हा सक्रीय झाल्याचे चित्र आहे. रात्री, पहाटे, चोरी, छुपी तर सोडा दिवसा बिनबोभाटपणे चोरटी वाळू वाहतूक केली जात आहे. शहरातील नवीन वसाहतींमधील बांधकामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळूचे साठे केले जात असल्याचे चित्र आहे. वास्तविक नियमानुसार दोन ब्रास पेक्षा अधिक वाळूचा साठा करता येत नाही. मात्र प्रशासनाने कारवाई थांबविल्यामुळे बांधकाम मालकांचाही वाळूचा लोभ सुटला नाही. या वाळूच्या साठ्यांमुळे वसाहतधारक वैतागले आहेत. कारण हवेमुळे वाळूचे धुलीकण घरात शिरते. तसेच वाळूचे कणदेखील उडत असल्यामुळे रहिवाशांच्या डोळ्यात जातात. त्यामुळे साठे बहादरांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.