शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त : खेडदिगर येथील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 12:19 IST

आंतरराज्य मार्ग गावातून गेल्याने समस्या, उपाययोजनेची गरज

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 19 : शहादा तालुक्यातील खेडदिगर येथे आठवडे बाजार व इतर दिवशी वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. खेडदिगर गावाच्या बसथांब्याजवळ वाहने व नागरिकांची नेहमी गर्दी असते. गावातून आंतरराज्य मार्ग गेल्याने अवजड वाहनांची नेहमी वर्दळ असते. आठवडे बाजाराच्या दिवशी बसथांबा परिसरात दिवसभर वाहतुकीची कोंडी होते. याठिकाणची वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.खेडदिगर येथे शनिवारी आठवडे बाजार भरतो. यादिवशी इतर दिवसापेक्षा जास्त प्रमाणात गर्दी  होते. परिसरातील गावातील नागरिक बाजारहाट करण्यासाठी शनिवारी मोठय़ा प्रमाणात येथे  येतात. तसेच खेडदिगर गावातूनच आंतरराज्य महामार्ग गेल्याने  अवजड वाहनांची नेहमी ये-जा सुरू असते.  या वाहनांमुळे वाहतूक ठप्प होऊन इतर वाहनधारकांना नाहक त्रास  सहन करावा लागतो. आठवडे बाजाराच्या दिवशी ही समस्य दिवसभर जाणवते. वाहतूक ठप्प झाल्यानंतर वाहन पुढे काढण्याच्या वादातून वारंवार  वादही निर्माण होतात. अवजड वाहनांसह ऊस वाहतूक करणारे ट्रक व ट्रॅक्टरची संख्या मोठी  आहे. त्यातच हातगाडीवर वस्तू  विक्री करणा:यांची गर्दी असते. रस्त्यावर आपल्या हातगाडय़ा लावून उभे राहत असल्याने वाहतुकीची समस्येत भर पडते. याठिकाणी  पोलीस कर्मचारी नियुक्त केल्याचे सांगण्यात येते. मात्र याठिकाणी पोलीस कर्मचारी दिसून येत नाहीत. वाहतूक ठप्प झाल्यानंतर इतर लोकांना पुढाकार घेऊन वाहतूक सुरळीत करावी लागते. जर  याठिकाणी पोलीस विभागाने कर्मचारी नियुक्त केले असतील तर त्यांनी दिवसभर थांबून वाहतूक सुरळीत राहण्यासाठी मदत करणे आवश्यक आहे. याठिकाणी कायमस्वरुपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी व्यावसायिक व त्रस्त वाहनधारकांकडून होत आहे.