शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शहरे लॉकडाऊन, खेड्यातील बाजारपेठा फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 12:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील नंदुरबारसह शहादा, तळोदा व नवापूर हे चारही शहरे ३० जुलैपर्यंत लॉकडाऊन करण्यात आल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील नंदुरबारसह शहादा, तळोदा व नवापूर हे चारही शहरे ३० जुलैपर्यंत लॉकडाऊन करण्यात आल्याने मोठ्या बाजारपेठांचे ठिकाण असलेल्या गावांमध्ये मात्र गर्दी वाढत आहे. विशेषत: म्हसावद, प्रकाशा, सारंगखेडा, बोरद, विसरवाडी येथे मध्यवर्ती बाजारपेठा असल्याने शहरी भागाकडे जाणारे अनेक ग्राहक या बाजारपेठांकडे वळले आहेत.जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी चार प्रमुख शहरे २३ ते ३० जुलैपर्यंत पूर्णपणे लॉकडाऊन केले आहेत. या लॉकडाऊनची प्रभावीपणे अंमलबजावणी होत असल्याने या शहरांमध्ये रोज येणारे ग्राहक आपल्या कामासाठी आता ग्रामीण भागातील मध्यवर्ती बाजारपेठेकडे वळले आहेत. ग्रामीण भागातील बँकाही सुरू असल्याने बँकांच्या महत्त्वाच्या कामांसाठीही लोक खेड्यांवर जात आहेत. त्यामुळे खेड्यांमध्ये सध्या गर्दी वाढू लागली आहे.सारंगखेड्यातीलबाजारपेठ फुललीकोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हा प्रशासनाने नंदुरबार, शहादा, तळोदा व नवापूर या चार शहरांमध्ये आठ दिवसांसाठी कडक संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिल्यानंतर या शहरातील व्यवसाय पूर्णत: बंद झाले आहेत. परिणामी दैनंदिन होणारे व्यवहार सध्या ग्रामीण भागाकडे वळत असल्याचे चित्र दोन दिवसात दिसून आले. सारंगखेडा हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथील बाजारपेठेत कुºहावद, कवठळ, बिलाडी, बामखेडा, ससदे, टेंबा, देऊर, खैरवे, कळंबू, अनरद, पुसनद, वरूळ कानडी आदी गावांचा दैनंदिन व्यवहारासाठी संपर्क येतो. शहादा शहरात आठ दिवसासाठी संपूर्ण संचारबंदी लागू केल्याने वरील सर्व गावातील ग्रामस्थ सारंगखेडा बाजारपेठेकडे वळले आहेत. भाजीपाला, कपडे, कीटकनाशके, खते, बियाणे त्याचबरोबर किराणा साहित्य आदी घेण्यासाठी या परिसरातील गावातील ग्रामस्थ सारंगखेडा बाजारपेठेला पसंती देतात. म्हणूनच गेल्या दोन दिवसापासून सारंगखेडा येथील बाजारपेठा फुलल्याचे चित्र दिसत असून व्यावसायिकांचे व्यवसाय बºयापैकी होत असल्याचे चित्र आहे. आदिवासी समाज बांधवांचे विवाह सुरू असल्याने व शहादा कडकडीत बंद असल्याने शहादा येथे होणारी खरेदी सारंगखेडा येथे होत आहे. लग्नाचा बस्ता, किराणा, भाजीपाला व इतर आवश्यक वस्तूंची खरेदी सारंगखेडा बाजारपेठेतून होत आहे. सारंगखेडा हे मुख्य रस्त्यावर असून येण्याजाण्यासाठीही सोयीचे असल्याने सुमारे २० ते २५ गावांचा सारंगखेड्याशी दररोज संबंध येतो. शहादा येथील बाजारपेठ आठ दिवसांसाठी बंद असल्याने परिणामी येथे होणारी कपड्यांची खरेदी व लग्नाचा बस्ता व इतर ग्राहक आमच्याकडे वळले असून काही प्रमाणात व्यवसाय नक्कीच वाढला असल्याची प्रतिक्रिया कापडाचे व्यापारी जयेश जैन यांनी ‘लोकमत’ला दिली.गर्दी वाढल्यानेप्रकाशेकर धास्तावलेकोरोना विषाणूची साखळी तुटावी यासाठी नंदुरबार, शहादा, तळोदा व नवापूर शहरात संचारबंदी लागू केल्याने परिसरातील गावातील लोकांची प्रकाशा येथे खरेदीसाठी गर्दी होत आहे. प्रकाशा हे गाव नंदुरबार, शहादा व तळोदा तालुक्याच्या सीमेवर आहे. त्यामुळे या तिन्ही तालुक्यातील काही गावातील ग्रामस्थ प्रकाशा येथे दैनंदिन कामासाठी व बाजारहाटसाठी येतात. आता तर कोरोनाची साखळी तुटण्यासाठी नंदुरबार, तळोदा, शहादा व नवापूर येथे आठ दिवस पूर्णपणे संचारबंदी लागू केल्याने प्रकाशा गावाच्या परिसरातील गावातील ग्रामस्थांची बाजारहाटसाठी येथे गर्दी वाढली आहे. भाजीपाला, किराणा, फळे, हार्डवेअर व इतर सर्व कामांसाठी प्रकाशा येथे गर्दी होत आहे. येथे येणाºया बाहेरील काही लोकांच्या तोंडाला मास्क नाही व सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडत असल्याने प्रकाशा ग्रामस्थांमध्ये कोरोनाची भीती वाढली आहे. प्रकाशापासून पाच किलोमीटर अंतरावरील वैजाली येथे १७ वर्षीय तरुण कोरोना पॉझिटीव्ह आल्याने अधिक भीतीचे वातावरण तयार झाले आहे. कोरोनाची साखळी तुटावी यासाठी प्रकाशा येथेही तीन दिवस लॉकडाऊन केले आहे. २७ जुलैनंतरही सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवावी व नंतरचा वेळ पुन्हा लॉकडाऊन करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दोन दिवसापूर्वीच उपविभागीय पोलीस अधिकारी यांची प्रकाशा येथे बैठक झाली. श्रावण महिना, दशामाता मूर्ती विसर्जन पाहता प्रकाशा येथे कडकडीत बंद होणे गरजेचे आहे. म्हणून प्रशासनाने त्याची दखल घेत तीन दिवस लॉकडाऊन झाल्यानंतर ३१ जुलैपर्यंत अर्धा दिवस लॉकडाऊनची मागणी होत आहे.