शहरं
Join us  
Trending Stories
1
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
2
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
3
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
4
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
5
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
6
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
7
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
8
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
9
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
10
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
11
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
12
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
13
‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय
14
अग्रलेख: हिंदीचे ओझे कशाला? राजकारण करण्याच्या सवयीने घात झाला
15
प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी 
16
Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात
17
Operation Sindhu: इराण, इस्रायलमधून आणखी १,१०० भारतीय मायदेशात, विमान कंपन्यांची मध्य-पूर्वेतील उड्डाणे थांबली
18
आरोग्यसेवेचे मोल शून्य; राज्यातील ३२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा २ महिन्यांचा पगार थकला
19
एसीबीच्या अहवालामुळे  सिडको प्रशासन हादरले, कार्मिक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
20
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी

वाट चुकून नागरी वस्तीत आलेल्या ‘चितळ’ला पुन्हा सोडले वनक्षेत्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 21:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील हरीओम नगरात वनक्षेत्रातून चुकून आलेल्या चितळला वनविभागाच्या पथकाने यशस्वीरित्या रेस्क्यू करुन पुन्हा वनक्षेत्रात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील हरीओम नगरात वनक्षेत्रातून चुकून आलेल्या चितळला वनविभागाच्या पथकाने यशस्वीरित्या रेस्क्यू करुन पुन्हा वनक्षेत्रात सोडून दिले आहे़ बुधवारी पहाटेच्या सुमारास चितळ एका घराच्या कंपाउंडमध्ये शिरले होते़नंदुरबार शहरालगत वनक्षेत्रात तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढत आहे़ यातून चितळ, काळबीट आणि नीलगाय हे हरीणवर्गीय प्राणी संचार करु लागले आहेत़ कळपात फिरणारे हे वन्यजीव रात्रीच्यावेळी निर्जन शांतता असल्याने वनक्षेत्राबाहेर अन्नाच्या शोधात येत आहेत़ यातून बऱ्याच वेळ ही जनावरे नागरी वसाहतीत शिरत असल्याचे प्रकार घडत आहेत़ बुधवारी पहाटे वाट चुकलेले चितळ एका घराच्या ओसरीत फिरत असल्याचे नागरिकांना दिसून आले होते़ त्यांनी तातडीने वनविभागाला याची माहिती दिली होती़ सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी तातडीने पथक पाठवून कार्यवाही करण्याची सूचना केली होती़ पथकाने अत्यंत सावधपणे चितळ पकडून त्याला वनविभागाच्या कार्यालयात आणून वैद्यकीय तपासणी करुन घेतली होती़ ताब्यात घेतलेल्या चितळाला सकाळी पथकाने शहरानजीकच्या वनक्षेत्रात सोडून दिले आहे़ यापूर्वी वनविभागाने एक काळवीट आणि एक निलगाय यांचे रेस्क्यू करुन मार्ग दाखवला होता़ ही कारवाई सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांच्या मार्गदर्शनात वनक्षेत्रपाल एमक़े़ रघुवंशी, वनपाल नांदरखे, संजय पाटील, वनपाल युवराज भाबड, विशाल मराठे, हिम्मत चौरे, आवशा सूर्यवंशी यांनी केली़वनविभागाकडून नंदुरबार तालुका आणि परिसरातील वनक्षेत्रात सातत्याने वृक्षलागवडीसह वृक्षतोड आणि कुरण चराईस बंदी करण्यात येत आहे़ यातून वनक्षेत्रात वन्य प्राण्यांचा अधिवास वाढण्यास मदत होत आहे़ स्थानिक वनव्यवस्थापन समित्याही वनविभागासोबत कामकाज करत असल्याची माहिती आहे़