शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

चायना मेड यंदा ४० टक्केच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 12:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : चायना मेड वस्तूंविरोधात जनजागृती होऊन, आंदोलने होऊन देखील शोभेच्या वस्तू, विद्यूत माळा यासह इतर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : चायना मेड वस्तूंविरोधात जनजागृती होऊन, आंदोलने होऊन देखील शोभेच्या वस्तू, विद्यूत माळा यासह इतर वस्तू या चायनामेडच विकल्या जात असल्याची स्थिती आहे. नंदुरबारात गणेशोत्सवानिमित्त आणि येणाºय विविध सण, उत्सवानिमित्त लावण्यात आलेल्या दुकानांमध्ये चायनामेडच्या वस्तूंनाच सर्वाधिक मागणी असल्याचे चित्र आहे. दरम्यान, काही विक्रेत्यांनी नवीन माल न आणता गेल्या वर्षाचा चायना मेड जुनाच माल विक्रीसाठी ठेवल्याचे सांगण्यात आले.गेल्या तीन, चार महिन्यात चिनशी झालेल्या तणावपुर्ण संबधामुळे चायनामेडच्या वस्तूंविरोधात वातावरण निर्मिती करण्यात आली होती. अनेक दुकानदार, विक्रेते यांनी देखील चायना मेड माल न ठेवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु ग्राहकांना स्वस्त:त चांगली व आकर्षक वस्तू पाहिजे असल्यामुळे दुकानदारांचा नाईलाज होत असल्याचे चित्र आहे. सध्या बाजारात विविध शोभेच्या वस्तू विक्रीसाठी लावण्यात आलेल्या दुकानांमध्ये हे चित्र प्रकर्षाने दिसून येत आहे.गणेशोत्सवासाठी मागणीगणेशोत्सवासाठी विद्युत माळांना मागणी वाढली आहे. चायना मेड ऐवजी दुसरी विद्यूत माळ मागितल्यावर त्याची किंमत जास्त राहत असल्यामुळे नाइलाजाने ग्रहकाला चायना मेड विद्यूत माळ घ्यावी लागत असल्याचे चित्र आहे. अगदी ६० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत आकर्षक विद्यूतमाळा उपलब्ध आहेत. अनेक विके्रेत्यांनी जुनाच स्टॉक विक्रीस काढला आहे.नवीन स्टॉकच उपलब्ध नसल्याचे त्यांचे म्हणने आहे. चिनशी असलेल्या तणावपुर्ण संबधांमुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा ४० टक्केच चायनामेड माल उपलब्ध होत असल्याचे त्यांचे म्हणने आहे.भारतीय बनावटीच्या किंमती जास्तभारतीय बनावटीच्या अर्थात दिल्ली, इंदोरमेड साहित्यही बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. परंतु त्यांच्या किंमती जास्त असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. परंतु या वस्तू टिकाऊ आणि अनेक दिवस चालणाऱ्या आहेत. त्यामुळे चोखंदळ ग्राहकांकडूनच अशा वस्तूंना मागणी असते. याउलट चायना वस्तू या वापरा आणि फेका स्वरूपाच्या असतात. आता ग्राहकांची मानसिकता बदलत आहे. त्यामुळे यापुढील काळात चायना मेड वस्तूंची मागणी घटेल अशी अपेक्षा विक्रेत्यांकडून व्यक्त होत आहे.गेल्या दोन महिन्यांपासून चायना मेड खेळणी, शोभेच्या वस्तू यांची आयात कमी झाल्याने किरकोळ स्वरूपात दुकानदारांना या वस्तू मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे जुना स्टॉक विक्रीकडे कल आहे.