शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

Vidhan Sabha 2019 : नर्मदेचे दहा तर उकईचे पाच टीएमसी पाणी जिल्ह्यात आणणार-मुख्यमंत्री फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 12:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  गेल्या 15 वर्षात शेतक:यांच्या शेतात पाणी गेले नाही. सिंचन योजनेत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भ्रष्टाचार करत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  गेल्या 15 वर्षात शेतक:यांच्या शेतात पाणी गेले नाही. सिंचन योजनेत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भ्रष्टाचार करत स्वत:चे सिंचन करून घेतले असा आरोप करीत नर्मदा-तापी नदीजोड प्रकल्प करून त्यातील 10 टीएमसी पाणी जिल्ह्यात आणले जाईल. उकईच्या बॅक वॉटर मधून पाच टीएमसी पाणी आणण्याचे नियोजन सुरू असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहादा येथील सभेत बोलतांना केले.शहादा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात शहादा-तळोदा मतदार संघाचे भाजपाचे उमेदवार राजेश पाडवी, नंदुरबार  मतदार संघाचे उमेदवार डॉ.विजयकुमार गावीत यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा झाली त्यात ते बोलत होते. या वेळी पर्यटनमंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ.हिना गावीत, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, उमेदवार राजेश पाडवी, डॉ.विजयकुमार गावीत उपस्थित होते.देवेंद्र फडणवीस म्हणाले, विरोधक आदिवासींचे आरक्षण काढणार अशा खोटय़ा अफवा पसरवत आहेत. परंतु जगाच्या पाठीवर कोणीही आदिवासीचे आरक्षण काढू शकत नाही. संविधानाने त्यांना तसे अधिकार दिले आहे. आदिवासी बांधवांना कधी नव्हे एवढय़ा योजना पाच वर्षात राज्य शासनाने दिल्या. वन पट्टे, वनजमिनीचे राहिलेले दावे एक वर्षात निकाली काढू असे आश्वासनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. यावेळी सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, जयपालसिंह रावल, अभिजीत पाटील, आरपीआयचे अरविंद कुवर, शिवसेनेचे अरुण चौधरी, तळोदाचे नगराध्यक्ष अजय परदेशी, शहाद्याच्या उपनगराध्यक्ष रेखाबाई चौधरी, राजेंद्र गावीत, अभिजित पाटील, अतुल जायस्वाल, डॉ.शशिकांत वाणी, जितेंद्र जमदाळे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजाराम पाटील, के.डी.पाटील, बाजार समितीचे सभापती सुनील पाटील ,रवींद्र राऊळ, बाजार समितीचे संचालक राजाराम पाटील, महेंद्र पाटील, रामभाई पाटील, अशोक टीला पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.