शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
4
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
5
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
6
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
7
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
8
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
9
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
10
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
11
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
12
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
13
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
14
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
15
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
16
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
17
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
18
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
19
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
20
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी

Vidhan Sabha 2019 : नर्मदेचे दहा तर उकईचे पाच टीएमसी पाणी जिल्ह्यात आणणार-मुख्यमंत्री फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 12:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  गेल्या 15 वर्षात शेतक:यांच्या शेतात पाणी गेले नाही. सिंचन योजनेत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भ्रष्टाचार करत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  गेल्या 15 वर्षात शेतक:यांच्या शेतात पाणी गेले नाही. सिंचन योजनेत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भ्रष्टाचार करत स्वत:चे सिंचन करून घेतले असा आरोप करीत नर्मदा-तापी नदीजोड प्रकल्प करून त्यातील 10 टीएमसी पाणी जिल्ह्यात आणले जाईल. उकईच्या बॅक वॉटर मधून पाच टीएमसी पाणी आणण्याचे नियोजन सुरू असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहादा येथील सभेत बोलतांना केले.शहादा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात शहादा-तळोदा मतदार संघाचे भाजपाचे उमेदवार राजेश पाडवी, नंदुरबार  मतदार संघाचे उमेदवार डॉ.विजयकुमार गावीत यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा झाली त्यात ते बोलत होते. या वेळी पर्यटनमंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ.हिना गावीत, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, उमेदवार राजेश पाडवी, डॉ.विजयकुमार गावीत उपस्थित होते.देवेंद्र फडणवीस म्हणाले, विरोधक आदिवासींचे आरक्षण काढणार अशा खोटय़ा अफवा पसरवत आहेत. परंतु जगाच्या पाठीवर कोणीही आदिवासीचे आरक्षण काढू शकत नाही. संविधानाने त्यांना तसे अधिकार दिले आहे. आदिवासी बांधवांना कधी नव्हे एवढय़ा योजना पाच वर्षात राज्य शासनाने दिल्या. वन पट्टे, वनजमिनीचे राहिलेले दावे एक वर्षात निकाली काढू असे आश्वासनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. यावेळी सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, जयपालसिंह रावल, अभिजीत पाटील, आरपीआयचे अरविंद कुवर, शिवसेनेचे अरुण चौधरी, तळोदाचे नगराध्यक्ष अजय परदेशी, शहाद्याच्या उपनगराध्यक्ष रेखाबाई चौधरी, राजेंद्र गावीत, अभिजित पाटील, अतुल जायस्वाल, डॉ.शशिकांत वाणी, जितेंद्र जमदाळे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजाराम पाटील, के.डी.पाटील, बाजार समितीचे सभापती सुनील पाटील ,रवींद्र राऊळ, बाजार समितीचे संचालक राजाराम पाटील, महेंद्र पाटील, रामभाई पाटील, अशोक टीला पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.