निवेदनात, साकलीउमर ते वेली या रस्त्याचे काम प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सुरू आहे. परंतु, अत्यंत सुमार दर्जाचे हे काम आहे. रस्त्यावर खडी न टाकता नदीपात्रातील दगड व गोटे, मुरूम टाकून देत काम आटोपण्याचे सुरू आहे. रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आलेले नाही. दरम्यान, सातपुड्यात अनेक गावांत खाजगी कंपनीचे मोबाइल टाॅवर सुरू करण्यात आले आहे. परंतु, हे टाॅवर अद्यापपर्यंत सुरू करण्यात आलेले नाही. यामुळे आदिवासी युवकांचे नुकसान होत आहे. हे टाॅवर सुरू झाल्यास त्यांना शैक्षणिक उपक्रमांमध्ये ऑनलाइन पद्धतीने सहभागी होता येणार आहे. तालुक्यातील वेली, बेडाकुंड, भगदरी येथे हे टाॅवर असून ते सुरू करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. हे निवेदन नायब तहसीलदार राजेश अमृतकर यांना देण्यात आले. यावेळी बिरसा ब्रिगेड तालुकाध्यक्ष संदीप वळवी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष ॲड. रूपसिंग वसावे, बिरसा ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष जयसिंग पाडवी, सचिन तडवी, धीरसिंग वळवी, विनोद पाडवी, मगन वळवी, दीपक वळवी, सागर वळवी, ॲड. सरदारसिंग वसावे, क्रांतिवीर बिरसा मुंडा संघटनेचे अध्यक्ष रवींद्र पाडवी, साया वसावे आदी उपस्थित होते.
अक्कलकुवा तालुक्यातील रस्ताकामांची चाैकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:21 IST