शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

राज्यात तीन ठिकाणी मध्यवर्ती स्वयंपाक गृह सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 12:42 IST

नंदुरबार आदिवासी प्रकल्पाचा समावेश : शासकीय आश्रम शाळांसाठी आदिवासी विकास विभागाची योजना

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शासकीय आश्रमशाळेतील विद्याथ्र्याच्या पोषणाची स्थिती सुधारून त्यांना उच्च दर्जाचा परिपुर्ण आहार पुरवठा करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने नंदुरबार आदिवासी प्रकल्पासाठी घोडेगाव व जव्हार प्रकल्पासाठी मध्यवर्ती स्वयंपाक गृह सुरू करण्याला मान्यता दिली आहे. या कामासाठी 12 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.शासकीय आश्रम शाळेतील भोजन व्यवस्था ही नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. निकृष्ट जेवनाचा आणि नाश्ता मिळत नसल्याचा अनेक ठिकाणच्या तक्रारी कायम आहेत. या पाश्र्वभुमीवर आश्रम शाळेतील विद्याथ्र्याना सर्वाना एकसारखा चांगल्या दर्जाचा आहार देण्यासाठी मध्यवर्ती स्वयंपाक गृहाचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षापासून विचाराधीन होता. या पाश्र्वभुमीवर प्रायोगिक तत्वावर कांबळगाव व मुंडेगाव या दोन ठिकाणी टाटा ट्रस्टमार्फत तो सुरू करण्यात आला होता. तो प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता आदिवासी विकास विभागाने पुन्हा नंदुरबार प्रकल्पासह जव्हार व घोडेगाव या तीन ठिकाणी ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत प्रकल्प कार्यालयाच्या मुख्यालयी सुमारे दहा हजार विद्याथ्र्याचे जेवन एकाचवेळी शिजवता येईल अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी किचनशेड बांधणे, धान्य साठवण्यासाठी गोडावून, तेथील कर्मचा:यांसाठी स्टाफ रूम, शौचालये, सिलिंडर रूम, सुरक्षा रक्षक रूम, जनरेटरची व्यवस्था, स्वयंपाकासाठी लागणारे तांदूळ धुण्याचे मशीन, रवा मशीन, इडली सिस्टिम ग्राईंडर, यासह विविध सुविधा आदिवासी विकास विभागातर्फे पुरविण्यात येणार आहे. त्यासाठी तिन्ही योजनांकरीता 12 कोटी रुपयांचा निधीला मंज़ुरी देण्यात आली आहे. त्यात नंदुरबार आणि घोडेगाव प्रकल्पासाठी प्रत्येकी तीन कोटी 84 लाख 60 हजार रुपये तर जव्हार प्रकल्पासाठी चार कोटी 30 लाख 80 हजार रुपये मंजुर करण्यात आले आहे.हे मध्यवर्ती स्वयंपाक गृह स्त्री शक्ती संस्था व आदिवासी विकास विभागातर्फे चालविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत शासनातर्फे आश्रमशाळेतील व वसतीगृहातील एका विद्याथ्र्याच्या दोन वेळच्या जेवनासाठी व दोन वेळच्या नाश्तासाठी प्रतीमाह दोन हजार 498 रुपये देण्यात येणार आहे. ही योजना राबविण्यासाठी मध्यवर्ती स्वयंपाक गृहाची उभारणी   व त्याचे काम सुरळीत चालू ठेवण्यासाठी आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली   सुकाणू समिती स्थापन करण्यात येणार आहे तर योजनेचे सनिंयंत्रण व मुल्यमापानासाठी आदिवासी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.या योजनेअंतर्गत विद्याथ्र्याना सकाळी साडेसात वाजता नाश्ता, सकाळी साडेदहाला मध्यान्ह जेवन, दुपारी साडेतीन वाजता अल्पोपहार व सायंकाळी साडेसहा वाजता रात्रीचे जेवन देण्यात येईल. मध्यवर्ती स्वयंपाक गृहाच्या ठिकाणी आदिवासी विकास विभागातर्फे दहा हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यात येणार आहे. संबधीत संस्थेतर्फे जेवन तयार करून ते प्रत्येक शासकीय आश्रम शाळेला वेळेवर पुरविण्यात येईल. त्याठिकाणी विद्याथ्र्याना वाटप करण्याचे काम संबधीत आश्रमशाळा व वसतीगृह कर्मचा:यांमार्फत करण्यात येणार आहे.