शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

राज्यात तीन ठिकाणी मध्यवर्ती स्वयंपाक गृह सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 12:42 IST

नंदुरबार आदिवासी प्रकल्पाचा समावेश : शासकीय आश्रम शाळांसाठी आदिवासी विकास विभागाची योजना

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शासकीय आश्रमशाळेतील विद्याथ्र्याच्या पोषणाची स्थिती सुधारून त्यांना उच्च दर्जाचा परिपुर्ण आहार पुरवठा करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने नंदुरबार आदिवासी प्रकल्पासाठी घोडेगाव व जव्हार प्रकल्पासाठी मध्यवर्ती स्वयंपाक गृह सुरू करण्याला मान्यता दिली आहे. या कामासाठी 12 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.शासकीय आश्रम शाळेतील भोजन व्यवस्था ही नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. निकृष्ट जेवनाचा आणि नाश्ता मिळत नसल्याचा अनेक ठिकाणच्या तक्रारी कायम आहेत. या पाश्र्वभुमीवर आश्रम शाळेतील विद्याथ्र्याना सर्वाना एकसारखा चांगल्या दर्जाचा आहार देण्यासाठी मध्यवर्ती स्वयंपाक गृहाचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षापासून विचाराधीन होता. या पाश्र्वभुमीवर प्रायोगिक तत्वावर कांबळगाव व मुंडेगाव या दोन ठिकाणी टाटा ट्रस्टमार्फत तो सुरू करण्यात आला होता. तो प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता आदिवासी विकास विभागाने पुन्हा नंदुरबार प्रकल्पासह जव्हार व घोडेगाव या तीन ठिकाणी ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत प्रकल्प कार्यालयाच्या मुख्यालयी सुमारे दहा हजार विद्याथ्र्याचे जेवन एकाचवेळी शिजवता येईल अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी किचनशेड बांधणे, धान्य साठवण्यासाठी गोडावून, तेथील कर्मचा:यांसाठी स्टाफ रूम, शौचालये, सिलिंडर रूम, सुरक्षा रक्षक रूम, जनरेटरची व्यवस्था, स्वयंपाकासाठी लागणारे तांदूळ धुण्याचे मशीन, रवा मशीन, इडली सिस्टिम ग्राईंडर, यासह विविध सुविधा आदिवासी विकास विभागातर्फे पुरविण्यात येणार आहे. त्यासाठी तिन्ही योजनांकरीता 12 कोटी रुपयांचा निधीला मंज़ुरी देण्यात आली आहे. त्यात नंदुरबार आणि घोडेगाव प्रकल्पासाठी प्रत्येकी तीन कोटी 84 लाख 60 हजार रुपये तर जव्हार प्रकल्पासाठी चार कोटी 30 लाख 80 हजार रुपये मंजुर करण्यात आले आहे.हे मध्यवर्ती स्वयंपाक गृह स्त्री शक्ती संस्था व आदिवासी विकास विभागातर्फे चालविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत शासनातर्फे आश्रमशाळेतील व वसतीगृहातील एका विद्याथ्र्याच्या दोन वेळच्या जेवनासाठी व दोन वेळच्या नाश्तासाठी प्रतीमाह दोन हजार 498 रुपये देण्यात येणार आहे. ही योजना राबविण्यासाठी मध्यवर्ती स्वयंपाक गृहाची उभारणी   व त्याचे काम सुरळीत चालू ठेवण्यासाठी आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली   सुकाणू समिती स्थापन करण्यात येणार आहे तर योजनेचे सनिंयंत्रण व मुल्यमापानासाठी आदिवासी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.या योजनेअंतर्गत विद्याथ्र्याना सकाळी साडेसात वाजता नाश्ता, सकाळी साडेदहाला मध्यान्ह जेवन, दुपारी साडेतीन वाजता अल्पोपहार व सायंकाळी साडेसहा वाजता रात्रीचे जेवन देण्यात येईल. मध्यवर्ती स्वयंपाक गृहाच्या ठिकाणी आदिवासी विकास विभागातर्फे दहा हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यात येणार आहे. संबधीत संस्थेतर्फे जेवन तयार करून ते प्रत्येक शासकीय आश्रम शाळेला वेळेवर पुरविण्यात येईल. त्याठिकाणी विद्याथ्र्याना वाटप करण्याचे काम संबधीत आश्रमशाळा व वसतीगृह कर्मचा:यांमार्फत करण्यात येणार आहे.