नंदुरबार : तालुक्यातील ईसाईनगर येथील के.डी. गावीत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. यावेळी एस.व्ही. विसपुते यांनी विद्यार्थ्यांना मतदानाची महत्त्व सांगून शपथ दिली. प्रसंगी मुख्याध्यापक बी.डी. पाटील उपस्थित होते. कार्यक्रमात प्रत्येकाने मतदान नोंदणी करावी व प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजवावा. तरुणांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रचार व जनजागृती करावी, यामुळे लोकशाही मजबूत होईल, असे आवाहन व्ही.एस. पाटील, बी.जे. जावरे, एम. व्ही. वसावे यांनी केले. मुख्याध्यापक बी.डी. पाटील यांनी मतदार हा लोकशाहीचा कणा असून, यासाठी मतदान करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे सांगितले. यशस्वीतेसाठी एम.आर. वसावे, आर.पी. शाह, आर.एन. पाटील, ए.डी. खेडकर, ए.टी. नाईक, प्रा.जयाप्रती वसावे, सी.डी. जाधव, एम.डी. पेटकर, आर.एस. पाडवी उपस्थित होते.
तळोदा
तळोदा शहरातील कला, वाणिज्य आणि विज्ञान, महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून राष्ट्रीय मतदार दिन तहसीलदार गिरीश वखारे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रभारी प्राचार्य डॉ.एस.आर. मगरे, नायब तहसीलदार बबनराव अहिरराव, नायब तहसीलदार रामजी राठोड प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रा. जे.एन. शिंदे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना राष्ट्रीय मतदार दिवसाचे महत्त्व पटवून सांगितले. तहसीलदार गिरीश वखारे यांनी लोकशाहीत निवडणुकांचे महत्त्व व मतदारांचेे योगदान यासंदर्भात मार्गदर्शन केले. रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.पंकज सोनवणे यांनी सूत्रसंचालन तर प्रा. हेमंत चौधरी यांनी आभार मानले.