शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

जमावबंदी आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबधीत अधिकारी करतील गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 11:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जमावबंदी कालावधीत प्रतिबंधीत करण्यात आलेल्या बाबींचे उल्लंघन झाल्यास फिर्याद दाखल करण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जमावबंदी कालावधीत प्रतिबंधीत करण्यात आलेल्या बाबींचे उल्लंघन झाल्यास फिर्याद दाखल करण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी संबंधित विभाग आणि अधिकारी यांना प्राधिकृत केले आहे.जमावबंदी कालावधीत ५ पेक्षा अधिक व्यक्ती किंवा समूह जमा झाल्यास. रात्री ९ ते सकाळी ५ दरम्यान फिरण्यास असलेल्या बंदीचे उल्लंघन झाल्यास. आंतरजिल्हा विना परवाना प्रवास केल्यास, प्रतिबंधीत क्षेत्रातील व्यक्ती इतर क्षेत्रात फिरल्यास आणि जिल्ह्यात सभा, मेळावे, सामाजिक कार्यक्रम, राजकीय कार्यक्रम, जत्रा, यात्रा, ऊरूस, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनाचे कार्यक्रम, शैक्षणिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा व आठवडे बाजार भरविल्यास पोलीस विभागाचे सक्षम अधिकारी फिर्याद दाखल करतील.सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल न वापरल्यास, सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखू सेवन करणे व थुंकणे, दुकानात प्रत्येक व्यक्तीमध्ये ६ फुटाचे अंतर न ठेवणे व एकाचवेळी ५ पेक्षा अधिक ग्राहक असल्यास कारवाई होईल. तसेच बाजार किंवा दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेव्यतिरिक्त सुरू ठेवल्यास नगरपालिका किंवा नगर पंचायत क्षेत्र मुख्याधिकारी व ग्रामीण क्षेत्रासाठी विस्तार अधिकारी फिर्याद दाखल करतील.सार्वजनिक ठिकाणी दारुचे सेवन केल्यास राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाचे सक्षम अधिकारी, सार्वजनिक आणि खाजगी वाहतुकीसाठीच्या निदेर्शाचा भंग केल्यास मोटार वाहन विभागाचे व पोलीस विभागाचे सक्षम अधिकारी, विवाह समारंभात ५० पेक्षा अधिक व्यक्ती तसेच प्रेतयात्रेत २० पेक्षा अधिक व्यक्ती सहभागी असल्यास व सोशल डिस्टन्सिंगचे पालन न झाल्यास संबंधीत क्षेत्रातील इन्सिडंट कमांडर यांच्या निदेर्शान्वये महसूल किंवा पोलीस विभागाचे सक्षम अधिकारी फिर्याद दाखल करतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. करण्यात येत असलेली कारवाई जिल्हा नियंत्रण कक्षास तात्काळ अवगत करावी, असेही आदेशीत करण्यात आले आहे.