लोकमत न्यूज नेटवर्कप्रतापपूर : तळोदा तालुक्यातील मोहिदा येथे वनविभागाने चार ठिकाणी पिंजरे लावून अस्वलाचा माग काढण्याचा प्रयत्न सुरु केला आहे़ दोन दिवसात येथे लावलेल्या कॅमेऱ्यातही प्राणी दिसून आलेला नसल्याची माहिती आहे़तळोदा वनविभागाचे वनक्षेत्रपाल एऩजी़रोडे यांच्या मार्गदर्शनात मोहिदा शिवारात चार ठिकाणी पिंजरे लावण्याची कारवाई पूर्ण करण्यात आली आहे़ याठिकाणी सापळा लावण्यात आला आहे़ बुधवारी दुपारी सहायक वनसंरक्षक ई़बी़चौधरी यांनी मोहिदा शिवारात जावून पिंंजऱ्यांची पाहणी केली़ याठिकाणी पाच ट्रॅप कॅमेरेही लावण्यात आले आहेत़ सोमवारच्या घटनेनंतर या कॅमेºयांची दोन वेळा तपासणी करण्यात आली असून त्यात एकही प्राणी कैद झालेला नाही़ पिंजºयांमध्ये बिबट्या किंवा यापैकी कोणता प्राणी कैद होतो याकडे वनविभागासह मोहिदे परिसरातील ग्रामस्थांचेही लक्ष लागू राहणार आहे़दरम्यान मोहिदा शिवारात मंगळवार आणि बुधवारी शुकशुकाट होता़ सायंकाळीही ग्रामस्थ घराबाहेर पडलेले नसल्याचे सांगण्यात आले आहे़ वनविभागाचे पथक सातत्याने ग्रामस्थांसोबत संवाद साधत आहे़ कळमसरे येथेही भेट देऊन माहिती देण्यात आली आहे़ तळोदा तालुक्यात पाण्याची उपलब्ध असल्याने शेतकरी बारमाही शेतीकडे वळले आहेत़ यात हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यांच्या घटनाही वाढल्या आहेत़ बहुतांश शेतकरी हे सायंकाळी किंवा रात्री उशिरा वीज पुरवठा सुरु झाल्यानंतर शेताकडे जातात़ यावेळी हिंस्त्र प्राणी लपून बसला असल्यास हल्ला होण्याची भिती असते़ या पार्श्वभूमीवर वनविभागाने रात्रीचे भारनियमन बंद करुन दिवसाच्यावेळेत शेतीसाठी वीज पुरवठा करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे़ सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये किमान शेतीसाठी दिवसाच्या वेळेत वीज पुरवठा करण्याची मागणी आहे़ याबाबत गेल्या वर्षीही कंपनीकडे शेतकºयांनी पाठपुरावा केला होता़ परंतू त्यांच्याकडून दुर्लक्ष करण्यात आले होत़े़ मोहिदे येथील घटनेनंतर भारनियमनाची वेळ बदलण्याची मागणी जोर धरत आहे़
मोहिदा शिवारात लावले पिंजरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 12:37 IST