शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

बस सुरु झाली मात्र रस्त्यामुळे हाल सोसवेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 13:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अतीवृष्टीमुळे आठ पुल वाहून गेल्याने मोलगी ते अक्कलकुवा वाहतूक तब्बल दोन महिने बंद होती़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अतीवृष्टीमुळे आठ पुल वाहून गेल्याने मोलगी ते अक्कलकुवा वाहतूक तब्बल दोन महिने बंद होती़ कालांतराने भराव करुन वाहतूक सुरु झाली असली तरी पूर्वीपेक्षा रस्ता अधिक खराब झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत़ सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलांवर भराव करुन तसेच रस्त्यावर मुरुम टाकून आमलीबारी ते डाब असा देवगोई घाटातील रस्ता वाहतूकीसाठी खुला केला होता़ गेल्या आठवडय़ात यामार्गाने अक्कलकुवा ते मोलगी अशी बसवाहतूकही सुरु झाली आह़े परंतू पावसाळ्यापेक्षा आता रस्त्याची अधिक दयनीय स्थिती असल्याने बसमध्ये प्रवास करणा:यांना हाल सोसवत नसल्याचे चित्र आह़े या मार्गासाठी राज्याशासनाने 69 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करुन दिला आह़े यासाठी परराज्यातील ठेकेदारास काम करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आह़े गेल्यावर्षी मंजूर झालेला निधी यंदाच्या वर्षात खर्च करण्याची गरज होती़ परंतू वर्ष उलटूनही 31 किलोमीटर अंतरात एक साधा दगडही जागचा हलवला गेलेला नसल्याचे चित्र आह़े मार्गात जागोजागी खडी उखडून रस्त्याखाली असलेल्या शिळा वर येत असल्याने वाहनांना अपघातांचा धोका आह़े यंदा पावसाळ्यात वाहून गेलेल्या पुलांचे बांधकाम येत्या चार महिन्यात सुरु होण्याची कोणतीही शक्यता नसल्याने 2020 मध्ये येणा:या पावसाळ्यात पुन्हा संपूर्ण चार महिने वाहतूक बंद होण्याची शक्यता असल्याचे बांधकाम विभागाच्या कामकाजावरुन दिसून येत आह़े