शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

देवगोई घाटात आजपासून धावणार बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 13:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तब्बल चार महिन्यांपासून बंद असलेली बससेवा सुरु करण्यासाठी बांधकाम विभागाच्या सांगण्यानुसार देवगोई घाटाची परिवहन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तब्बल चार महिन्यांपासून बंद असलेली बससेवा सुरु करण्यासाठी बांधकाम विभागाच्या सांगण्यानुसार देवगोई घाटाची परिवहन महामंडळाकडून पाहणी करण्यात आली. पाहणीत बस सेवेसाठी रस्ता अनुकुल असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे 13 नोव्हेंबरपासून मोलगी व धडगाव भागातील बससेवा सुरू करण्यात येणार आहे.चार महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत अक्कलकुवा ते मोलगी रस्त्यावरील देवगोई घाटात तब्बल 13 ठिकाणी दरडी कोसळल्या व रस्ताही वाहून गेला. शिवाय दुर्गम भागातील काही रस्त्यांचीही दुरावस्था झाली. त्यामुळे अक्कलकुवापासून मोलगी व धडगावर्पयतची बससेवा परिवहन महामंडळामार्फत बंद करण्यात आली होती. घाटातील रस्त्याची दुरुस्ती झाली असतानाही मोठी वाहतुक बससेवेसाठी रस्ता प्रतिकुलच ठरत होता. परिणामी बससेवाही बंदच ठेण्यात आली होती. त्यात अक्कलकुवा आगारामार्फत 40 तर याच मार्गावरुन धडगावर्पयत जाणारी नंदुरबार आगाराच्या दोन बसफे:या अशा एकुण 42 बसफे:या बंद होत्या. त्यात अक्कलकुवा ते मोलगी, कोठली, भगदरी, धडगाव, जमानामार्गे धडगाव, डाब, जमाना, बिजरीगव्हाण व नंदुरबार ते धडगाव आदी बसेसचा समावेश होता. अक्कलकुवा आगाराला 40 बंद बसफे:यांमधून एक लाख 60 हजाराचे दैनंदिन तर चार महिन्याच्या कालावधीत दोन कोटी पेक्षा अधिक  नुकसान सहन करावे लागल्याचे अक्कलकुवा आगारामार्फत सांगण्यात आले. बांधकाम विभागामार्फत हिरवी ङोंडी दाखविल्याशिवाय बससेवा सुरू करता येत नव्हती. सद्यस्थितीत पाऊस नसल्याने महामंडळाला बांधकाम विभागामार्फत बससेवा सुरु करण्यासाठी रस्त्याची पाहणी करण्याचे पत्र देण्यात आले. त्यानुसार महामंडळाच्या पदाधिका:यांनी अक्कलकुवा ते मोलगी व धडगावर्पयतच्या रस्त्याची पाहणी केली. त्यात रस्ता बससेवेसाठी अनुकुल असल्याचे आढळून आले. त्यामुळे महामंडळाच्या बसेस 13 नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती  आगारामार्फत  सांगण्यात आले. पाहणी करताना आगारप्रमुख आर.आर.फुलपगारे, वाहतुक नियंत्रक के.एस.पराडके, वाहतुक निरीक्षक आर.बी.वळवी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यामुळे दुर्गम भागातील प्रवाशांना पुन्हा सुखरुप प्रवासाचे साधन उपलब्ध होणार असून जमाना मार्गावरही बस सुरू होण्याच्या शक्यता आहे.बांधकाम विभागामार्फत दवगोई घाटातील रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले, परंतु त्यात मोठी कामेच झाली आहे. दुर्वरित मालीआंबा ते देवगोईर्पयतची किरकोळ कामांकडे दुर्लक्ष झाल्याचे म्हणत परिवहन महामंडळाच्या पदाधिका:यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशा किरकोळ कामांमुळेही वाहतुक अडचणीत येऊ शकते, त्यासाठी स्थानिक राजकीय पदाधिका:यांना पाठपुरावा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.दिवाळीनिमित्त धडगाव तालुक्यातील अस्तंबा येथे एकमेव यात्रा भरली. एकमेव यात्रेमुळे अस्तंबाकडे जाणा:या भाविकांची संख्या मोठी होती. ही यात्रा परिसरातील प्रवास सेवा ही बाब अक्कलकुवा आगारासाठी हक्काचीच ठरत असते. या यात्रेसाठी अक्कलकुवा आगारामार्फत प्रवाशांची गर्दी पाहून ज्यादा बसेसही सोडल्या जातात, त्यातून आगाराच्या उत्पन्नात मोठी वाढ होते, शिवाय भाविकांची देखील सोय होत असते. परंतु यंदा रस्ताच खराब झाल्यामुळे अस्तंबा भागातील बसफे:या बंद करण्यात आल्या. त्यामुळे त्या भागातील दिवाळी हंगामातील मोठय़ा उत्पन्नावर आगाराला पाणी सोडावे लागले.