शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रीय खताच्या वाहतुकीसाठी आता बसचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 12:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : सातपुडा साखर कारखान्यातर्फे तयार करण्यात येणारे सेंद्रीय खत महाराष्टÑासह गुजरात आणि मध्यप्रदेश राज्यात पाठविले ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : सातपुडा साखर कारखान्यातर्फे तयार करण्यात येणारे सेंद्रीय खत महाराष्टÑासह गुजरात आणि मध्यप्रदेश राज्यात पाठविले जात असून, त्याची वाहतूक ट्रक, ट्रॅक्टरसह आता राज्य परिवहन महामंडळाच्या माल वाहतूक सेवेने सुरू झाली आहे.विविध भागातील शेतकरी हे खत घेण्यासाठी सातपुडा साखर कारखान्यावर येत आहेत. मंगळवारी शिरपूर, जि.धुळे येथील शेतकऱ्यांनी सेंद्रीय खत घेण्यासाठी चक्क एस.टी. महामंडळाच्या माल वाहतूक एस.टी. बस आणल्याने या प्रकल्पातील काम करणारे कामगार तसेच परिसरात राहणारे ग्रामस्थांचे लक्ष वेधले होते. हा विषय परिसरात कुतुहलाचा ठरला.रासायनिक खतांना पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी सातपुडा सहकारी साखर कारखान्याकडून मागील अनेक वर्षापासून सेंद्रीय खत प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पातून पुष्पकमल नामक खताची निर्मिती होऊ लागली आहे. परंतु साध्या सेंद्रीय खतात फॉस्फोरसची मात्रा वाढ करण्याकरीता रॉक फॉस्फेट मिश्रण करून व त्यावर प्रक्रिया करून फॉस्फोरस रिच आॅरगॅनिक मॅन्युअर प्रॉम तयार केले जात आहे. या खतात आॅरगॅनिक स्वरूपात १०.४ टक्के पर्यंत फॉस्फोरस उपलब्ध होईल. सोबत नत्र, पालाश, सिलिकॉन, सल्फर, कॅल्शिअम व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये सेंद्रीय स्वरूपात उपलब्ध होतील आणि जमिनीत पाणी धारण करण्याची क्षमता वाढेल. जमीन भुसभुशीत होईल. त्यामुळे पिकांमध्ये पांढरे मूळ जास्त प्रमाणात निघतील आणि पिकांची वाढदेखील चांगली होत. हे खत सर्व पिकांना उपयुक्त असल्याने त्यास शेतकऱ्यांकडून मागणी वाढली आहे. उसासाठी एकरी पाच बॅग लागवडीच्या वेळेस आणि पाच बॅग मोठी बांधणीच्या वेळेस वापर केला तर चांगले परिणाम जाणवून येतील. तसेच या खताचा वापर केल्यानंतर ५० टक्के रासायनिक खताची मात्रा कमी करता येईल.रासायनिक खतास पर्याय म्हणून सेंद्रीय खत ताकदवर असले पाहिजे ही संकल्पना ठेऊन या सेंद्रीय खताची निर्मिती करण्यात आली असून, त्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान सातपुडा साखर कारखान्यातर्फे शेतकºयांना रासायनिक खतांच्या वापरासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येत आहे.