शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
2
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
3
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
5
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
6
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
7
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
8
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
9
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
10
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
11
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
12
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
13
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
14
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
15
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
16
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
17
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
18
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
19
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
20
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा

चार वर्गाचा भार एकाच शिक्षकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : शहरातील उर्दू शाळेत वर्षभरापासून एकाच शिक्षकावर शाळा सुरू असल्याने विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : शहरातील उर्दू शाळेत वर्षभरापासून एकाच शिक्षकावर शाळा सुरू असल्याने विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत पंचायत समितीकडे सातत्याने शिषकांच्या नियुक्तीबाबत पाठपुरावा करूनही गांभीर्याने दखल घेतली जात नसल्यामुळे संतप्त पालकांनी गुरूवारी थेट  पंचायत समिती गाठून सहायक गटविकास अधिका:यांना घेराव घातला. या वेळी पालकांनी अधिका:यांना चांगलेच धारेवर धरले होते. तत्काळ शिक्षक नियुक्त केल्याशिवाय कार्यालयातून बाहेर न जाण्याचा पवित्रा पालकांनी घेतल्यानंतर या अधिका:यांनी आठ दिवसाच्या आत दुसरा शिक्षक देण्याचे आश्वासन दिल्यानंतर पालकांनी ठिय्या मागे घेतला.शहरातील जिल्हा परिषदेच्या उर्दू माध्यमाच्या शाळा क्रमांक तीन व चारसाठी एकाच शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या शाळांमधील साधारण 142 विद्यार्थी इयत्ता पहिली ते चौथीर्पयत शिक्षण घेत आहेत. तथापि या ठिकाणी एकच शिक्षक दिल्यामुळे कामाचा अतिरिक्त ताण या एकाच शिक्षकावर पडत आहे. परिणामी ते पूर्णपणे   न्याय देऊ शकत नसल्याने आमच्या अल्पसंख्यांक विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मध्यंतरी या शाळेवर एका मराठी माध्यमाच्या प्राथमिक शिक्षकाची नियुक्ती केली होती. परंतु त्यांचीही इतरत्र बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर नियमानुसार दुस:या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे वर्षभरापासून या शाळा एकाच शिक्षकावर सुरू आहे, अशी वस्तुस्थिती असतांना जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग दखल घ्यायला       तयार नाही. शेवटी संतप्त पालकांनी गुरूवारी थेट पंचायत समितीचे कार्यालय गाठून सहायक गट विकास अधिकारी आर.बी. सोनवणे यांनाच घेरावर घातला. आमच्या विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान होत असतांना अधिकारी दाखल घेत नसल्यामुळे संतप्त पालकांनी अधिका:यांवर प्रश्नांची सरबत्ती करत तत्काळ दुसरा शिक्षक दिल्याशिवाय येथून ठिय्या मागे घेणार नसल्याचा पवित्रा घेतला. या वेळी सोनवणे यांनी पुणे येथे गेलेल्या शिक्षण अधिका:यांशी संवाद साधला. त्यांनी शाळेसाठी शिक्षण विभागाकडे प्रस्ताव दाखल केला असल्याचे सांगितले. शिवाय स्वत: त्यांनी आठ दिवसांच्या आत दुस:या शिक्षकांची नियुक्ती करण्याचे ठोक आश्वासन पालकांना दिल्यानंतर पालक तेथून माघाली आहेत. दरम्यान, एकच शिक्षक असल्यामुळे त्यांनाच अध्यापनाबरोबर इतर शैक्षणिक कामे ही करावे लागत असतात. साहजिकच त्याचा परिणाम विद्याथ्र्याच्या शिक्षणावर  होत असल्याचे पालकांनी सांगितले. आता आठ दिवस पुन्हा प्रतिक्षा करतो, अन्यथा शाळेलाच कायम कुलूप ठोकण्याचा इशाराही पालकांनी दिला आहे. या वेळी भाजपाचे शहराध्यक्ष योगेश चौधरी, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष इम्रान लियाकत, सांगीर राशिद काझी, सादीक सरदार शेख, सादिक सैय्यद, नाजीर खा पठाण, राजू अबू पिंजारी, मोहनीन खान पठाण, मोहसीन खाटीक, अकबर पिंजारी, अक्रम पिंजारी, इम्रान ईस्माईल, सकिना अरीफ शेख, आफरीन मन्यार, मोहनीस खाटीक, आदी पालक उपस्थित होते.