शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वनक्षेत्रातील दीड हजार हेक्टर वन अतिक्रमणावर फिरवले बुलडोझर

By भूषण.विजय.रामराजे | Updated: April 26, 2023 14:27 IST

जिल्ह्यातील ही आजवरची सर्वात मोठी कारवाई

भूषण रामराजे, लोकमत न्यूज नेटवर्क, नंदुरबार: वनविभागाच्या नंदुरबार वनक्षेत्रातील सोनपाडा आणि भांगडा वनक्षेत्रात दीड हजार हेक्टरवर करण्यात आलेले अतिक्रमण वनविभागाच्या पथकाने नष्ट केल्याची कारवाई करण्यात आली आहे. ३ मार्चपासून सुरु असलेली ही कारवाई मंगळवारी रात्री उशिरा संपुष्टात आली. पावणेदोन महिने सुरु असलेली ही कारवाई आजवरची जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात आले.

नंदुरबार रोहयो वनक्षेत्रांतर्गत सोनपाडा आणि भांगडा कक्षातील राखीव क्षेत्रात गुजरात राज्यासह स्थानिक रहिवाशांकडून अतिक्रमण करण्यात आल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. एकूण १ हजार ६०० हेक्टरवर अतिक्रमण करुन पीक पेरा करण्यात आल्याचे वनविभागाच्या निदर्शनास आल्यानंतर मोहीम हाती घेण्यात आली होती. अतिक्रमितांना समज देत वनविभागाने ३ मार्च रोजी अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेला प्रारंभ केला होता. वनविभागाने एकूण १ हजार ५२५ हेक्टर क्षेत्रातील वन अतिक्रमण नष्ट करुन वनजमिनीवर ताबा मिळवला आहे. अतिक्रमण नष्ट केल्यानंतर पुन्हा वनजमिनीवर अतिक्रमण होऊ नये यासाठी यंत्रांच्या साहाय्याने खोल सलग समतल चर खोदकाम करुन वन जमीन संरक्षित करण्यात आली आहे.

ही कारवाई धुळे वनविभागाचे वनसंरक्षक डी.व्ही.पगार, विभागीय वनाधिकारी संजय पाटील यांच्या मार्गदर्शनात उपवनसंरक्षक कृष्णा भवर, सहायक वनसंरक्षक धनंजय पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी स्नेहल अवसरमल, वनपाल प्रियंका निकुंभे, अरविंद निकम, किसन वसावे, नयना हाडस, दीपक विभांडिक, रवी गिरासे, दिनेश वळवी, रुपेश वसावे यांनी केली.

टॅग्स :nandurbar-acनंदुरबारEnchroachmentअतिक्रमण