शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

साखरेचे दर वाढल्याने बजेट कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:36 IST

देशात सरासरी ऑक्टोबर ते मार्च या महिन्यात साखरेचे उत्पादन घेतले जाते. खासगी व सहकारी साखर कारखाने, खांडसरी यांच्या माध्यमातून ...

देशात सरासरी ऑक्टोबर ते मार्च या महिन्यात साखरेचे उत्पादन घेतले जाते. खासगी व सहकारी साखर कारखाने, खांडसरी यांच्या माध्यमातून साखर उत्पादित केली जाते. साखरेचा वापर फक्त खाद्यपदार्थातच नाही तर इतर उद्योगांतही केला जातो. साखरेवर रासायनिक प्रक्रिया करून हजारो पदार्थ तयार करतात. प्लॅस्टिक, औषध निर्मिती, शीतपेये, सिमेंट, विद्युत विलेपन, गोंद, चर्मोद्योग, स्फोटक पदार्थ, शवसंलेपन, खते अशा अनेक उद्योगांत साखरेचा उपयोग होतो.

जिल्ह्याला दररोज साडेतीन ते चार हजार क्विंटल साखर लागते. श्रावण महिन्यात साखरेची मागणी वाढल्याने दररोज नियमित मागणीपेक्षा २०० क्विंटलची वाढ अपेक्षित असून साधारणत चार हजार २०० क्विंटल दररोज साखरेचा खप आहे.

का वाढले दर

जुलै महिन्यापर्यंत साखरेच्या दरात किरकोळ भाववाढ होती. मात्र श्रावण महिन्यात मागणी वाढल्याने व पुरवठा कमी झाल्याने साखरेचे भाव वाढत आहेत. अनियमित पर्जन्यमानामुळे साखरेच्या उत्पादनावर फरक पडला असून, याचा फटका भाववाढीच्या स्वरूपात सर्वसामान्यांना सोसावा लागत आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच साखरेच्या दरात वाढ सुरू झाली आहे.

-भरत ओस्तवाल, व्यापारी, शहादा

मोठ्या व्यापाऱ्यांकडून ज्या प्रमाणात पुरवठा केला जातो त्यावर साखरेचे दर अवलंबून असतात. गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत साखरेच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. श्रावण महिन्यापासून हिंदू धर्मातील पवित्र सणांना सुरुवात होते. परिणामी साखरेला सर्वसामान्य जनतेकडून मोठ्या प्रमाणात मागणी असते. नाशिक, नगर व इतर राज्यातून आपल्या भागात साखरेचा पुरवठा होतो.

-राजेंद्र अग्रवाल, व्यापारी, शहादा

साखरेचे दर प्रति क्विंटल

जानेवारी ३००० रुपये

फेब्रुवारी ३००० रुपये

मार्च ३००० रुपये

एप्रिल ३१०० रुपये

मे ३२०० रुपये

जून ३३०० रुपये

जुलै ३३५० रुपये

ऑगस्ट ३६०० रुपये

महिन्याचे बजेट वाढले

दररोज साखर लागते. श्रावणात साखरेचा वापर अधिक प्रमाणात होतो. मात्र दर वाढल्याने नियमित आर्थिक बजेटमध्ये फरक पडला आहे. नेमके सण उत्सव सुरू होतानाच भाव वाढ कशी होते हा प्रश्न नेहमी सतावतो. महागाई वाढली तरी परंपरेनुसार सण उत्सव साजरे करावेच लागतात.

-मनीषा संदानशीव, शहादा

अचानक साखरेच्या दरात वाढ झाल्याने आर्थिक बजेट थोडेसे बिघडले. बाजारात सहज साखर उपलब्ध होत असल्याने ती मोठ्या प्रमाणात साठवणूक करणे शक्य होत नाही. परिणामी साखरेचे दर वाढले तरी ती खरेदी करावी लागते. नियमित साखरेचा वापर होत असल्याने दरवाढ ही सहन करावी लागते.

-सेजल पाटील, शहादा