शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

रखडलेला पुल विकासाला मृगजळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 13:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सरदार सरोवरमुळे निर्माण झालेल्या समस्यांवर मात करण्यासाठी बिलगाव ते साव:यादिगर्पयत रस्त्याला मंजूरी देण्यात आली. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सरदार सरोवरमुळे निर्माण झालेल्या समस्यांवर मात करण्यासाठी बिलगाव ते साव:यादिगर्पयत रस्त्याला मंजूरी देण्यात आली. या रस्त्याच्या नर्मदा नदीवर पुलाचे कामही सुरू करण्यात आले परंतु हे काम अद्याप अपूर्णच असल्यामुळे साव:यादिगरसह काही गावांच्या विकासासाठी हे अर्धवट काम मृगजळ ठरत आहे. धडगाव तालुक्यातील साव:यादिगर हे गाव सरदार सरोवरच्या फुगवटय़ामुळे बेट बनले आहे, या गावाच्या पुनर्वसानसाठी मागणी करण्यात आली होती. परंतु 2005 मध्ये भिंगारे समिती स्थापन कण्यात आली. या समितीने साव:यादिगर गावासाठी बिलगावपासून रस्ता उपलब्ध करून दिल्यास हे गाव टापू क्षेत्रात येणार नसल्याचा अहवाल सादर केला   होता. दळण-वळणाची सुविधा झाल्यास हे गाव पुनर्वसन करण्याची आवश्यकता भासणार नाही असल्याचेही समितीने अहवालात नमुद केले होते. त्याशिवाय समितिने          रस्ता पूर्ण होईर्पयत नर्मदा विकास विभागाने साव:यादिगरच्या नागरिकांना  बोट व्यवस्था उपलब्ध करुन             द्यावी, असा सल्लाही दिला होता. समितीच्या अहवालानुसार तेथे पुलाचे कामही सुरू करण्यात आले, परंतु हे काम अजुनही अर्धवट राहिले आहे. त्यामुळे तेथील नागरिकांची गैरसोय सुरूच आहे. रस्ता व पुलासाठी शासनामार्फत करोडोचा निधी मंजूर करीत कामही सुरू करण्यात आले, परंतु दोन वर्षापासून पुलाचे थांबले आहे. मागील वर्षी भूषा ता.धडगाव येथे मासेमारी समितीला भेट देण्यासाठी नर्मदा नियंत्रण प्राधिकरणचे सदस्य डॉ. अफरोज अहमद यांनी रस्त्यात लागणा:या या पुलाच्या कामाची देखील पाहणी केली. दरम्यान पुलाच्या कामात अनियमितता दिसून आल्याने अहमद यांनी संबंधित अधिका:यांना धारेवर धरले. त्यावेळी मार्च अखेर्पयत पुलाचे काम पूर्ण कारण्याचे आदेश दिले होते. तरीही कामात मनमानीच दिसून येत आहे. त्यामुळे अहमद यांच्या आदेशालाही संबंधितांकडून केराची टोपली दाखविल्याचे म्हटले जात आहे. 

ाुलाचे काम रखडल्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात साव:यादिगरसह त्यापुढील गावांमधील नागरिकांची देखील मोठी गैरसोय झाली. पावसाळ्यातील सहाही महिने तेथील नागरिकांना ताटकळत राहावे लागले, नदीला पुर आल्यास नागरिकांना थांबून राहावे लागत होते. अशा अडचणीनंतरही प्रशासनाकडून योग्य कार्यवाही करण्यात येत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सुर उमटू लागला  आहे.