शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
2
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
3
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
4
एक देश एक निवडणूक : ४.५० लाख कोटींची बचत; मतदानही होईल ९० टक्के! संसदीय समितीचा अंदाज 
5
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
6
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
7
इंद्रायणी पूररेषेतील ३६ बंगले जमीनदोस्त
8
राज्यामध्ये तब्बल सात हजारावर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत; १,९१९ रुग्णांना यकृत, तर १४१ जणांना गरज आहे हृदयाची
9
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
10
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
11
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
12
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
13
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
14
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
15
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
16
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
17
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
18
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
19
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  

रखडलेला पुल विकासाला मृगजळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 13:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सरदार सरोवरमुळे निर्माण झालेल्या समस्यांवर मात करण्यासाठी बिलगाव ते साव:यादिगर्पयत रस्त्याला मंजूरी देण्यात आली. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सरदार सरोवरमुळे निर्माण झालेल्या समस्यांवर मात करण्यासाठी बिलगाव ते साव:यादिगर्पयत रस्त्याला मंजूरी देण्यात आली. या रस्त्याच्या नर्मदा नदीवर पुलाचे कामही सुरू करण्यात आले परंतु हे काम अद्याप अपूर्णच असल्यामुळे साव:यादिगरसह काही गावांच्या विकासासाठी हे अर्धवट काम मृगजळ ठरत आहे. धडगाव तालुक्यातील साव:यादिगर हे गाव सरदार सरोवरच्या फुगवटय़ामुळे बेट बनले आहे, या गावाच्या पुनर्वसानसाठी मागणी करण्यात आली होती. परंतु 2005 मध्ये भिंगारे समिती स्थापन कण्यात आली. या समितीने साव:यादिगर गावासाठी बिलगावपासून रस्ता उपलब्ध करून दिल्यास हे गाव टापू क्षेत्रात येणार नसल्याचा अहवाल सादर केला   होता. दळण-वळणाची सुविधा झाल्यास हे गाव पुनर्वसन करण्याची आवश्यकता भासणार नाही असल्याचेही समितीने अहवालात नमुद केले होते. त्याशिवाय समितिने          रस्ता पूर्ण होईर्पयत नर्मदा विकास विभागाने साव:यादिगरच्या नागरिकांना  बोट व्यवस्था उपलब्ध करुन             द्यावी, असा सल्लाही दिला होता. समितीच्या अहवालानुसार तेथे पुलाचे कामही सुरू करण्यात आले, परंतु हे काम अजुनही अर्धवट राहिले आहे. त्यामुळे तेथील नागरिकांची गैरसोय सुरूच आहे. रस्ता व पुलासाठी शासनामार्फत करोडोचा निधी मंजूर करीत कामही सुरू करण्यात आले, परंतु दोन वर्षापासून पुलाचे थांबले आहे. मागील वर्षी भूषा ता.धडगाव येथे मासेमारी समितीला भेट देण्यासाठी नर्मदा नियंत्रण प्राधिकरणचे सदस्य डॉ. अफरोज अहमद यांनी रस्त्यात लागणा:या या पुलाच्या कामाची देखील पाहणी केली. दरम्यान पुलाच्या कामात अनियमितता दिसून आल्याने अहमद यांनी संबंधित अधिका:यांना धारेवर धरले. त्यावेळी मार्च अखेर्पयत पुलाचे काम पूर्ण कारण्याचे आदेश दिले होते. तरीही कामात मनमानीच दिसून येत आहे. त्यामुळे अहमद यांच्या आदेशालाही संबंधितांकडून केराची टोपली दाखविल्याचे म्हटले जात आहे. 

ाुलाचे काम रखडल्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात साव:यादिगरसह त्यापुढील गावांमधील नागरिकांची देखील मोठी गैरसोय झाली. पावसाळ्यातील सहाही महिने तेथील नागरिकांना ताटकळत राहावे लागले, नदीला पुर आल्यास नागरिकांना थांबून राहावे लागत होते. अशा अडचणीनंतरही प्रशासनाकडून योग्य कार्यवाही करण्यात येत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सुर उमटू लागला  आहे.