शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

रखडलेला पुल विकासाला मृगजळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 13:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सरदार सरोवरमुळे निर्माण झालेल्या समस्यांवर मात करण्यासाठी बिलगाव ते साव:यादिगर्पयत रस्त्याला मंजूरी देण्यात आली. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सरदार सरोवरमुळे निर्माण झालेल्या समस्यांवर मात करण्यासाठी बिलगाव ते साव:यादिगर्पयत रस्त्याला मंजूरी देण्यात आली. या रस्त्याच्या नर्मदा नदीवर पुलाचे कामही सुरू करण्यात आले परंतु हे काम अद्याप अपूर्णच असल्यामुळे साव:यादिगरसह काही गावांच्या विकासासाठी हे अर्धवट काम मृगजळ ठरत आहे. धडगाव तालुक्यातील साव:यादिगर हे गाव सरदार सरोवरच्या फुगवटय़ामुळे बेट बनले आहे, या गावाच्या पुनर्वसानसाठी मागणी करण्यात आली होती. परंतु 2005 मध्ये भिंगारे समिती स्थापन कण्यात आली. या समितीने साव:यादिगर गावासाठी बिलगावपासून रस्ता उपलब्ध करून दिल्यास हे गाव टापू क्षेत्रात येणार नसल्याचा अहवाल सादर केला   होता. दळण-वळणाची सुविधा झाल्यास हे गाव पुनर्वसन करण्याची आवश्यकता भासणार नाही असल्याचेही समितीने अहवालात नमुद केले होते. त्याशिवाय समितिने          रस्ता पूर्ण होईर्पयत नर्मदा विकास विभागाने साव:यादिगरच्या नागरिकांना  बोट व्यवस्था उपलब्ध करुन             द्यावी, असा सल्लाही दिला होता. समितीच्या अहवालानुसार तेथे पुलाचे कामही सुरू करण्यात आले, परंतु हे काम अजुनही अर्धवट राहिले आहे. त्यामुळे तेथील नागरिकांची गैरसोय सुरूच आहे. रस्ता व पुलासाठी शासनामार्फत करोडोचा निधी मंजूर करीत कामही सुरू करण्यात आले, परंतु दोन वर्षापासून पुलाचे थांबले आहे. मागील वर्षी भूषा ता.धडगाव येथे मासेमारी समितीला भेट देण्यासाठी नर्मदा नियंत्रण प्राधिकरणचे सदस्य डॉ. अफरोज अहमद यांनी रस्त्यात लागणा:या या पुलाच्या कामाची देखील पाहणी केली. दरम्यान पुलाच्या कामात अनियमितता दिसून आल्याने अहमद यांनी संबंधित अधिका:यांना धारेवर धरले. त्यावेळी मार्च अखेर्पयत पुलाचे काम पूर्ण कारण्याचे आदेश दिले होते. तरीही कामात मनमानीच दिसून येत आहे. त्यामुळे अहमद यांच्या आदेशालाही संबंधितांकडून केराची टोपली दाखविल्याचे म्हटले जात आहे. 

ाुलाचे काम रखडल्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात साव:यादिगरसह त्यापुढील गावांमधील नागरिकांची देखील मोठी गैरसोय झाली. पावसाळ्यातील सहाही महिने तेथील नागरिकांना ताटकळत राहावे लागले, नदीला पुर आल्यास नागरिकांना थांबून राहावे लागत होते. अशा अडचणीनंतरही प्रशासनाकडून योग्य कार्यवाही करण्यात येत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सुर उमटू लागला  आहे.