शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

भवर नदीवरील पुलाला भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 12:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोदा तालुक्यातील धवळीविहीर ते हलालपूर दरम्यान असलेल्या भवर नदीला पूर आल्यामुळे नदीवरील भगदाड पडलेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : तळोदा तालुक्यातील धवळीविहीर ते हलालपूर दरम्यान असलेल्या भवर नदीला पूर आल्यामुळे नदीवरील भगदाड पडलेल्या पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे धवळीविहीर ग्रामस्थांना भगदाड पडलेल्या पुलाच्या कठड्यावरून जीव धोक्यात घालून मार्गक्रमण करावे लागत आहे.गेल्यावर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे तळोदा तालुक्यातील धवळीविहीर ते हलालपूर दरम्यान असणाऱ्या भवर नदीवरील पुलाला भले मोठे भगदाड पडले होते. पुलाची उंची कमी असल्याने व गेल्यावर्षी सातत्याने झालेल्या मुसळधार पावसामुळे सुमारे महिनाभर पुलावरून पाणी वाहत होते. अश्या परिस्थिती या पुलाला पडलेले हे जीवघेणे भगदाड अधिकच धोकेदायक बनले होते. पुलावरील वाहत्या पाण्यात रस्त्याचा अंदाजा घेत व त्या भगदाडला चुकवीत धवळीविहीर ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी महिनाभर प्रवास केला होतो. दरम्यान, यंदादेखील या सर्व प्रकाराची पुनरावृत्ती झाली आहे.यावर्षीदेखील या पुलावरून पाणी वाहत असून, नागरिकांना पुलावरील हे भगदाड चुकवीत पाण्यातून मार्गक्रमण करावे लागत आहे. पुलावरील पाण्याचा तीव्र प्रवाह, कमकुवत झालेला पूल व पुलावरील जीवघेणे भगदाड यामुळे या पुलावरून प्रवास करणे ही मोठी जीवघेणी कसरत ठरत आहे. धवळीविहीर गावाला जोडणारा हा एकमेव पक्का रस्ता असून, नदीला आलेल्या पुरामुळे तो बंद झाला आहे.गेल्या वर्षभरापासून या पुलाची हीच स्थिती असून, वर्षभरात कोणत्याही प्रकारच्या दुरूस्तीचे काम झालेले नाही. याबाबत पावसाळ्यात नदीला पूर आल्यास मागील वर्षाची पुनरावृत्ती होईल, याबाबत ‘लोकमत’ने सचित्र व वस्तुनिष्ठ वृत्त प्रसिध्द करून नागरिकांची ही समस्या मांडली होती. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सीमा वळवी व आमदार राजेश पाडवी यांनी या पुलाला भेट देवून पुलाची पाहणी केली होती. दरम्यान या ठिकाणी नव्या पुलाच्या कामाला मंजुरी मिळाली असून, लॉकडाऊनमुळे निविदा व अन्य तांत्रिक प्रक्रिया न होऊ शकल्याने कामास सुरूवात करता आली नसल्याचे बांधकाम विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे.काही दिवसांपूर्वी या भगदाडमध्ये एक दुचाकीस्वार आपल्या लहान मुलांसह पडला होता. सुदैवाने या अपघात कोणालाही गंभीर दुखापत झाली नव्हती. पुलाचे काम तत्काळ करणे शक्य नसले तरी पुलाला पडलेले हे भगदाड पुलावरून पाणी वाहत नसतानादेखील जीवघेणे ठरत आहे. किमान हे भगदाड बुजवावे, अशी वाहनधारकांची मागणी होती. मात्र तिच्याकडेदेखील पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे.या सर्व प्रकारामुळे धवळीविहीर ग्रामस्थांचा तालुका मुख्यालयाला जोडणारा मुख्य मार्ग बंद झाला आहे. पुलाला पडलेले हे भगदाड वर्ष उलटले असले तरी तसेच असून, नदीला पूर आल्यास यावर्षीदेखील धवळीविहीर ग्रामस्थांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. धवळीविहीर ग्रामस्थांना तळोदा येथे येण्यासाठी गणेश बुधावल फाटा एक दुसरा कच्चा मार्ग आहे. परंतु तो रस्ता मातीचा असल्याने सध्या त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने कोणाच्याही उपयोगाचा ठरत नाही. मोटरसायकल सुद्धा त्या मार्गाने व्यवस्थित जाऊ शकत नाही, अशी या रस्ताची परिस्थिती आहे.यामुळे धवळीविहीर ग्रामस्थ या वाहणाºया पाण्यातून व भगदाड पडलेल्या पुलावरून मार्गक्रमण करण्याचा धोकेदायक पर्याय स्वीकारत आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांच्या या समस्येकडे लक्ष देणे गरजेचे आहे.