शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

बीपीएल कुटुंब धान्यापासून वंचित : तळोद्यात महिला संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 12:34 IST

ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात तहसीलदारांना घेराव

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 17 : पालिकेकडून दारिद्रय़ रेषेखालील दाखला देऊनही केवळ पुरवठा विभागाच्या उदासिन धोरणामुळे शासनाच्या स्वस्त धान्यापासून वंचित राहावे लागत असल्याने संतप्त महिलांनी येथे जागतिक ग्राहक दिनाच्या कार्यक्रमातच तहसीलदारांना धारेवर धरले. दरम्यान, अशा गरीब - गरजू लाभाथ्र्याची यादी तयार करण्याचे आश्वासन दिल्यानंतर या महिला स्वस्थ झाल्यात. एकीकडे जागतिक ग्राहक दिन साजरा करीत असताना ग्राहकांचाच रोष पत्करावा लागत असल्याची नामुष्की महसूल प्रशासनावर ओढविली.तळोदा येथील प्रशासकीय इमारतीत जागतिक ग्राहक दिन आयोजित करण्यात आला होता. या वेळी जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, उपविभागीय अधिकारी विनय गौडा, ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष डॉ.वसंत काकडे,  पंचायत समितीच्या सभापती शांतीबाई पवार, तहसीलदार योगेश चंद्रे आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी डॉ.कलशेट्टी यांनी मार्गदर्शन केल्यानंतर ते व विनय गौडा निघून गेले. त्यानंतर कार्यक्रम चालू असतांनाच महिलांनी गेल्या अनेक वर्षापासून शासनाच्या स्वस्त धान्यापसून वंचित ठेवत असल्याचा आरोप करत तहसीलदारांना घेराव घातला होता. वास्तविक नगरपालिकेने आम्हास दारिद्रय़रेषेचा दाखला दिलेला आहे. दारिद्रय़रेषेच्या यादीत कुटुंबाचे नाव आहे, असे असतांना केवळ पिवळी शिधापत्रिका नसल्यामुळे संबंधित दुकानदार           स्वस्त धान्य देत  नाही. याशिवाय काही अंत्योदय लाभार्थ्ीनादेखील तेथील दुकानदार पुरेसे धान्य देत नसल्याची व्यथाही काही आदिवासी महिलांनी तहसीलदारांपुढे मांडली. त्याचबरोबर काही स्वस्त धान्य दुकानदार मनमानी कारभार             करीत असल्याची तक्रारही या वेळी महिलांनी केली. संतप्त महिलांनी याप्रसंगी अधिका:यांना चांगलेच धारेवर धरले होते. महिलांच्या           तक्रारी ऐकून घेतल्यानंतर तहसीलदार चंद्रे यांनी आपली नावे पुरवठा शाखेकडे नोंदवा असे आश्वासन दिल्यानंतर या महिला शांत झाल्यात. मात्र जागतिक ग्राहक दिनाच्या दिवशीच महसूल प्रशासनास महिलांच्या रोषक पत्करावा लागल्याने याविषयी शहरात एकच चर्चा सुरू आहे. नवीन शिधापत्रिका अथवा नाव कमी करणे, नाव टाकणे यासाठी संबंधित पुरवठा विभागाकडे सतत हेलपाटे मारावे लागत असल्याची तक्रारही या महिलांनी केली होती. परंतु तरीही कामे होत नसल्याचे सांगितले. कर्मचारी सतत फिरवा फिरव करतात. अजून कार्डवर सही झालेली नाही, उद्या या पर्वा या, अमूक कागद पत्रे जोडा अशा सबबी दाखवून अडवणूक केली जात असल्याची व्यथाही या महिलांनी बोलून दाखविली. वास्तविक आता राईट टू सव्र्हीस हा कायदा शासनाने लागू केलेला असताना येथील पुरवठा शाखेकडून त्याची सर्रास पायमल्ली केली जात असल्याचे वास्तव या महिलांच्या संतप्त भावनावरून दिसून येते.महसूल प्रशासनाने याप्रकरणी गंभीर दखल घेण्याची अपेक्षा आहे.बीपीएल लाभार्थी संख्या - 9837अंत्योदय लाभार्थी - 12277एपीएल 25388