शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

बकऱ्या चारण्यास गेलेल्या मुलाचा सोबतच्या मित्राने केला गळा आवळून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:24 IST

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश प्रभू पाडवी (११), असे मयताचे नाव आहे. ३० एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास ...

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश प्रभू पाडवी (११), असे मयताचे नाव आहे. ३० एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास गणेश त्याचे मित्र विकास गोविंद ठाकरे व शैलेश ठाकरे यांच्या सोबत बकऱ्या चारण्यासाठी रोझवा प्लॉटच्या जंगलात गेला होता. दुपारी विकास ठाकरेने तलावडी गावातील राज मंगल पाडवी यांच्या मोबाइलवर गणेशचे वडील प्रभू रामसिंग पाडवी यांना सांगितले की, त्यांचा मुलगा गणेश हा कोठार रस्त्याला पिंप्रीच्या झाडाखाली बेशुद्धावस्थेत पडलेला आहे. तेव्हा विकास ठाकरे व कैलास ठाकरे हे बेशुद्ध अवस्थेत असणाऱ्या गणेशला घरी घेऊन आले. त्यावेळी गणेशच्या गळ्यावर काळसर रंगाचे व्रण दिसत होते. त्यास तळोदा उपजिल्हा रुग्णालय येथे घेऊन आले असता गणेश यास तेथील डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. त्याबाबत तळोदा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

परंतु मयत गणेशच्या गळ्यावर दोरीचे व्रण दिसून आल्यामुळे त्याचे वडील प्रभू रामसिंग पाडवी यांना त्याच्या मृत्यूबाबत संशय आला होता. त्याबाबत संपूर्ण खात्री केली. तलावडी गावातील विकास ठाकरे व शैलेश ठाकरे यांच्याबरोबर त्यांचा मुलगा गणेश पाडवी हा बकऱ्या चारण्यासाठी गेला असता उसाच्या शेतात बकऱ्या चरत असताना विकास ठाकरे याने गणेश यास बकऱ्या वळण्यासाठी पाठवले; परंतु गणेशने त्याला नकार दिला. या कारणावरून व मागील भांडणाच्या कारणावरून मनात राग धरून रोझवा प्लॉटकडे उसाच्या शेतात पिंप्रीच्या झाडाखाली गणेश यास एकटा गाठून त्याचा दोरीने गळा आवळून त्याला ठार मारले, अशी फिर्याद मयत गणेशचे वडील प्रभू रामसिंग पाडवी यांनी तळोदा पोलिसांत दिली. त्यांच्या फिर्यादीवरून विकास गोविंद ठाकरेविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पंडितराव सोनवणे करीत आहेत.