परिणामी लॉकडाऊन हा कोरोना महामारीवरील उपाय वाटण्याऐवजी व्यावसायिकांना संपवणारा व उपासमार घडवणारा घोर अन्याय वाटू लागला आहे. म्हणून १५ मेनंतर कोणत्याही कारणास्तव लॉकडाऊन वाढवला जाऊ नये तसेच १५ मेपासून सर्व व्यावसायिकांना सूट देऊन व्यवसाय पूर्ववत सुरू करण्यास परवानगी द्यावी, अथवा त्यांना दिवसातील सकाळपासून सायंकाळपर्यंत व्यवसाय सुरू ठेवण्याची मुभा द्यावी, अशी मागणी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व व्यावसायिकांच्या वतीने नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पार्टी आपणास या निवेदनाद्वारे करीत आहे.
लॉकडाऊन वाढवला जात असेल तर मात्र भारतीय जनता पार्टी जिल्हाभरात असहकार आंदोलन पुकारेल. तत्कालीन स्थिती पाहून आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल, असाही इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदनावर भाजप जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, जिल्हा संघटन सरचिटणीस नीलेश माळी, जिल्हा उपाध्यक्ष सदानंद रघुवंशी, जिल्हा कोषाध्यक्ष कमल ठाकूर, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष पंकज जैन, ट्रान्सपोर्ट सेल जिल्हाध्यक्ष विनम्र शहा आदींच्या स्वाक्षऱ्या आहे.