शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात भाजपचे निवडणूक आयोगाला निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:20 IST

नंदुरबार : समतेच्या तत्वानुसार ओबीसींना राजकीय प्रतिनिधित्व मिळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण देण्यात आले होते. परंतु, आता न्यायालयाने आरक्षण ...

नंदुरबार : समतेच्या तत्वानुसार ओबीसींना राजकीय प्रतिनिधित्व मिळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण देण्यात आले होते. परंतु, आता न्यायालयाने आरक्षण रद्द केले आहे. ओबीसींच्या जागा सर्वसाधारण प्रवर्गातून लढविण्यात येणार असल्याने ओबीसींवर अन्याय होणार आहे. राज्यातील पाच जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम रद्द करावा अशी, मागणी भारतीय जनता पार्टीने केली आहे. याबाबतचे निवेदन राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यू. पी. एस मदान यांना दिले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्यामार्फत राज्य निवडणूक आयोगाला भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सोमवारी निवेदन दिले. त्यात म्हटले, राज्य निवडणूक आयोगाने धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम व नागपूर या पाच जिल्हा परिषदांमधील ८५ जागा तसेच पंचायत समित्यांच्या १४४ जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या जागा आधी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी राखीव होता. आरक्षण रद्द झाल्याने आता या जागा सर्वसाधारण समजून निवडणूक होत आहे. ओबीसींसाठी निवडणुकीचा कार्यक्रम अत्यंत अन्यायकारक व धोकेदायक आहे.

समतेच्या तत्त्वानुसार ओबीसींना राजकीय प्रतिनिधित्व मिळण्यासाठी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय झाला होता. महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात योग्यरीतीने बाजू मांडली नाही म्हणून न्यायालयाने राजकीय आरक्षण सध्या रद्द केले आहे. तथापि, न्यायालयाने ओबीसींच्या आरक्षणाची संकल्पना नाकारली तर केवळ त्याचे प्रमाण किती असावे हे ठरविण्यासाठी समर्पित मागास आयोग तयार करून ओबीसींच्या एम्पिरिकल डेटा मागितला होता. राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेली प्रक्रिया पूर्ण करून पुन्हा ओबीसी आरक्षण लागू होईपर्यंत निवडणुका घेणे म्हणजे अन्यायकारक ठरणार आहे.

निवेदनावर जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, आमदार राजेश पाडवी, जिल्हा संघटन सरचिटणीस नीलेश माळी, प्रदेश सदस्य राजेंद्रकुमार गावित, तळोद्याचे नगराध्यक्ष अजय परदेशी, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप शेंडे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, जिल्हा कोषाध्यक्ष कमल ठाकूर, उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुदाम चौधरी, योगिता बडगुजर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत

कोरोनाची दुसरी लाट कमी होत असली तरी ती पूर्णपणे संपलेली नाही. तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व इतर उच्चपदस्थांनी सांगितलेले आहे. अशा स्थितीत वरील पाच जिल्हा परिषदा व त्यांच्या अंतर्गत पंचायत समित्यांच्या काही जागांसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया राबविणे अत्यंत धोकादायक आहे. निवडणूक प्रक्रियेच्या काळात प्रचारामुळे लोकांचा एकमेकांशी संपर्क येणे स्वाभाविक आहे. फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे अशक्यच आहे. निवडणुकीमुळे कोरोनाची साथ या ठिकाणी पुन्हा बळावण्याचा व ती पुन्हा राज्यभर पसरण्याचा धोका आहे. यामुळे लोकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो.

- विजय चौधरी, जिल्हाध्यक्ष भाजप, नंदुरबार