शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपला गट-तट सांभाळण्याची तर काँग्रेसची अस्तित्वाची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 12:19 IST

हिरालाल रोकडे । लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्याचे विभाजन दोन विधानसभा मतदारसंघात झाले असल्याने तालुक्यावर दोन आमदाराचे वर्चस्व ...

हिरालाल रोकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्याचे विभाजन दोन विधानसभा मतदारसंघात झाले असल्याने तालुक्यावर दोन आमदाराचे वर्चस्व असते यंदा दोन्ही आमदार भारतीय जनता पक्षाचे असल्याने त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात तालुक्यातील दिग्गज नेत्यांनी प्रवेश घेतल्याने भारतीय जनता पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. असे असले तरी सर्व गट-तट संभाळून निवडणुकांना सामोरे जावे लागेल. याउलट काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससमोर आपल्या गतवेळच्या जागा टिकवण्याचे खडतर आव्हान असणार आहे. विशेष म्हणजे या दोन्ही पक्षांसोबत मोठे राजकीय नेतृत्व नसल्याची स्थिती आहे.जिल्हा परिषदेचे सर्वाधिक गट शहादा तालुक्यात आहे. परिणामी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शहादा तालुक्यातून दिला जाण्याचा प्रघात पडला आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यात अनेक राजकीय उलथापालथ घडामोडी मान-अपमान नाट्य रंगल्यानंतर सर्वच पक्ष जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. तालुक्यात आमदार डॉ.विजयकुमार गावित व आमदार राजेश पाडवी हे दोन्ही आमदार भारतीय जनता पक्षाचे आहेत. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावीत व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल या नेत्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने पक्षाची ताकद निश्चितच वाढली आहे. याउलट विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री पद्माकर वळवी उमेदवारी करताना अनेक कार्यकर्त्यांसह एकाकी झुंज दिल्याने काँग्रेससमोर कार्यकर्त्यांची वानवा असल्याचे सिद्ध झाले. अशाही परिस्थितीत ग्रामीण भागातील जनता काँग्रेस पक्षासोबत राहिली. ते टिकवण्यासह गतकाळाच्या आठ जागा टिकविण्याचे खडतर आव्हान काँग्रेससमोर आहे.माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील हे गत निवडणुकीत काँग्रेसतर्फे निवडून आले होते. मात्र त्यानंतर तीन वर्षांपूर्वी झालेल्या शहादा नगरपालिकेच्या निवडणुकीत व तद्नंतर लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केला. आता ते नेमक्या कुठल्या पक्षातर्फे निवडणूक लढविणार, कुठली भूमिका घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. काँग्रेसतर्फे ते विजयी झाले असले तरी तत्कालीन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत रघुवंशी यांच्याशी त्यांचा वाद झाल्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षापासून दूर राहणे पसंत केले व भाजपाशी जवळीक केली. आता कुठल्या पक्षातर्फे लढविणार याबाबत चर्चा सुरू आहे.भारतीय जनता पक्षाने यंदाची निवडणूक स्वबळावर लढण्याचे घोषित केले सर्वाधिक स्पर्धा उमेदवारीसाठी येथे असेल. राज्यात महाविकास आघाडीचा फामूर्ला जिल्ह्यात लागू झाल्यास भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होईल. ओबीसीच्या चार जागांसाठी भारतीय जनता पक्षासह महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक बंडखोरी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महाविकास आघाडी झाल्यास या आघाडीतील तिन्ही पक्षांना उमेदवार देताना तारेवरची कसरत करावी लागेल. संभाव्य बंडखोरांना थोपविण्यात सर्वच पक्षाच्या नेत्यांना आपला राजकीय अनुभव लावावा लागेल. प्रत्यक्ष उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. शिवसेननाही आशावादी आहे.मातब्बरांची चॉईस ठरणार डोकेदुखीपंचायत समिती २८ गण असून येथे स्पर्धा कमी असली तरी अनेक मातब्बरांना चॉईस च्या मतदारसंघासाठी आतापासूनच दावेदारी केल्याने सर्वच पक्षांसोबत डोकेदुखी ठरली आहे.संभाव्य बंडखोरी रोखण्याचे आव्हानतालुक्याच्या ग्रामीण भागातील कारभाराच्या दृष्टीने पंचायत समितीवर सत्ता आवश्यक असते. यासाठी सर्वच पक्षांना उमेदवार जाहीर करताना संभाव्य बंडखोरी संपवावी लागणार आहे.भाजप एका जागेवर झाली विजयीगत निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या तेरा जागांपैकी सर्वाधिक आठ जागा काँग्रेस पक्षाने जिंकल्या होत्या चार जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व एका जागेवर भारतीय जनता पक्षाचा उमेदवार विजय झाला होता.काँग्रेसला जागा टिकविण्याचे आव्हानयंदा गट संख्या एकने वाढून १४ झाली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला हे चित्र बदलण्यासाठी कसरत करावी लागेल तर काँग्रेससमोर आपल्या जागा टिकविण्याचे आव्हान असणार आहे.गत पंचायत समिती निवडणुकीत २६ जागांपैकी सर्वाधिक १३ जागा जिंकून काँग्रेस पक्षाने बाजी मारली. पहिल्या अडीच वर्षात काँग्रेसला भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या एकमेव सदस्यांनी पाठिंबा दिल्याने पहिले अडीच वर्ष काँग्रेसकडे सभापतीपद व भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडे उपसभापती पद होते. मात्र त्यानंतरच्या काळात बºयाच राजकीय घडामोडी घडल्याने पंचायत समितीत सत्तांतर नाट्य घडले व त्यानंतरच्या अडीच वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती व उपसभापती होते.