शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

भाजपला गट-तट सांभाळण्याची तर काँग्रेसची अस्तित्वाची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 12:19 IST

हिरालाल रोकडे । लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्याचे विभाजन दोन विधानसभा मतदारसंघात झाले असल्याने तालुक्यावर दोन आमदाराचे वर्चस्व ...

हिरालाल रोकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्याचे विभाजन दोन विधानसभा मतदारसंघात झाले असल्याने तालुक्यावर दोन आमदाराचे वर्चस्व असते यंदा दोन्ही आमदार भारतीय जनता पक्षाचे असल्याने त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात तालुक्यातील दिग्गज नेत्यांनी प्रवेश घेतल्याने भारतीय जनता पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. असे असले तरी सर्व गट-तट संभाळून निवडणुकांना सामोरे जावे लागेल. याउलट काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससमोर आपल्या गतवेळच्या जागा टिकवण्याचे खडतर आव्हान असणार आहे. विशेष म्हणजे या दोन्ही पक्षांसोबत मोठे राजकीय नेतृत्व नसल्याची स्थिती आहे.जिल्हा परिषदेचे सर्वाधिक गट शहादा तालुक्यात आहे. परिणामी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शहादा तालुक्यातून दिला जाण्याचा प्रघात पडला आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यात अनेक राजकीय उलथापालथ घडामोडी मान-अपमान नाट्य रंगल्यानंतर सर्वच पक्ष जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. तालुक्यात आमदार डॉ.विजयकुमार गावित व आमदार राजेश पाडवी हे दोन्ही आमदार भारतीय जनता पक्षाचे आहेत. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावीत व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल या नेत्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने पक्षाची ताकद निश्चितच वाढली आहे. याउलट विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री पद्माकर वळवी उमेदवारी करताना अनेक कार्यकर्त्यांसह एकाकी झुंज दिल्याने काँग्रेससमोर कार्यकर्त्यांची वानवा असल्याचे सिद्ध झाले. अशाही परिस्थितीत ग्रामीण भागातील जनता काँग्रेस पक्षासोबत राहिली. ते टिकवण्यासह गतकाळाच्या आठ जागा टिकविण्याचे खडतर आव्हान काँग्रेससमोर आहे.माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील हे गत निवडणुकीत काँग्रेसतर्फे निवडून आले होते. मात्र त्यानंतर तीन वर्षांपूर्वी झालेल्या शहादा नगरपालिकेच्या निवडणुकीत व तद्नंतर लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केला. आता ते नेमक्या कुठल्या पक्षातर्फे निवडणूक लढविणार, कुठली भूमिका घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. काँग्रेसतर्फे ते विजयी झाले असले तरी तत्कालीन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत रघुवंशी यांच्याशी त्यांचा वाद झाल्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षापासून दूर राहणे पसंत केले व भाजपाशी जवळीक केली. आता कुठल्या पक्षातर्फे लढविणार याबाबत चर्चा सुरू आहे.भारतीय जनता पक्षाने यंदाची निवडणूक स्वबळावर लढण्याचे घोषित केले सर्वाधिक स्पर्धा उमेदवारीसाठी येथे असेल. राज्यात महाविकास आघाडीचा फामूर्ला जिल्ह्यात लागू झाल्यास भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होईल. ओबीसीच्या चार जागांसाठी भारतीय जनता पक्षासह महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक बंडखोरी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महाविकास आघाडी झाल्यास या आघाडीतील तिन्ही पक्षांना उमेदवार देताना तारेवरची कसरत करावी लागेल. संभाव्य बंडखोरांना थोपविण्यात सर्वच पक्षाच्या नेत्यांना आपला राजकीय अनुभव लावावा लागेल. प्रत्यक्ष उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. शिवसेननाही आशावादी आहे.मातब्बरांची चॉईस ठरणार डोकेदुखीपंचायत समिती २८ गण असून येथे स्पर्धा कमी असली तरी अनेक मातब्बरांना चॉईस च्या मतदारसंघासाठी आतापासूनच दावेदारी केल्याने सर्वच पक्षांसोबत डोकेदुखी ठरली आहे.संभाव्य बंडखोरी रोखण्याचे आव्हानतालुक्याच्या ग्रामीण भागातील कारभाराच्या दृष्टीने पंचायत समितीवर सत्ता आवश्यक असते. यासाठी सर्वच पक्षांना उमेदवार जाहीर करताना संभाव्य बंडखोरी संपवावी लागणार आहे.भाजप एका जागेवर झाली विजयीगत निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या तेरा जागांपैकी सर्वाधिक आठ जागा काँग्रेस पक्षाने जिंकल्या होत्या चार जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व एका जागेवर भारतीय जनता पक्षाचा उमेदवार विजय झाला होता.काँग्रेसला जागा टिकविण्याचे आव्हानयंदा गट संख्या एकने वाढून १४ झाली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला हे चित्र बदलण्यासाठी कसरत करावी लागेल तर काँग्रेससमोर आपल्या जागा टिकविण्याचे आव्हान असणार आहे.गत पंचायत समिती निवडणुकीत २६ जागांपैकी सर्वाधिक १३ जागा जिंकून काँग्रेस पक्षाने बाजी मारली. पहिल्या अडीच वर्षात काँग्रेसला भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या एकमेव सदस्यांनी पाठिंबा दिल्याने पहिले अडीच वर्ष काँग्रेसकडे सभापतीपद व भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडे उपसभापती पद होते. मात्र त्यानंतरच्या काळात बºयाच राजकीय घडामोडी घडल्याने पंचायत समितीत सत्तांतर नाट्य घडले व त्यानंतरच्या अडीच वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसचे सभापती व उपसभापती होते.