शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

४०८ ग्रामपंचायतींची जैवविविधता वही तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 12:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : हरीत लवादाच्या आदेशाने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयातर्फे देशातील ग्रामीण स्तरावर प्रत्येक ग्रामपंचायतीचे जैवविविधता रजिस्टर तयार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : हरीत लवादाच्या आदेशाने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयातर्फे देशातील ग्रामीण स्तरावर प्रत्येक ग्रामपंचायतीचे जैवविविधता रजिस्टर तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ यानुसार जिल्ह्यातील ५९५ ग्रामपंचायतींमध्ये कामकाज सुरु होते़ यांतर्गत अंतिम मुदतीला आठ दिवस शिल्लक असताना जिल्ह्यातील ४०८ ग्रामपंचायतींनी बाजी मारत नोंदवह्या तयार केल्या आहेत़नोंदवहीसाठी शासनाने ३१ जानेवारी ही अंतिम मुदत दिली आहे़ जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी वेगाने कामकाज केल्याने केवळ १८७ ग्रामपंचायतींमध्ये नोंदवह्या तयार करणे शिल्लक असल्याची माहिती असून २६ जानेवारीनंतर या ग्रामपंचायतीही रजिस्टर तयार करुन देणार असल्याचे सांगण्यात आले आहे़ राज्यातील सर्वाधिक वेगाने जैवविविधता नोंदवही तयार करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये नंदुरबारचाही समावेश झाला असून यामुळे जिल्हा परिषदेकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे़ जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींनी जैवविविधता रजिस्टर तयार करण्यापूर्वी ग्रामीण स्तरावर जैवविविधता समिती स्थापन केली होती़ समिती स्थापन करण्यात आल्यानंतर संबधित ग्रामसेवकांना तब्बल ३२ प्रकारचे अर्ज भरुन देण्याचे कामकाज करावे लागले होते़ या कामकाजात शेतशिवारातील प्रत्येक बारीक-सारीक बाबीची माहिती देण्यात आली आहे़ जिल्ह्यात अंत्यत वेगाने तयार झालेल्या या कामकाजात सातपुड्याच्या दुर्गम भागातील अनेक दुर्लक्षित वनस्पतींच्या प्रजाती, धान्याचे वाण आणि फुलांचे प्रकार समोर येऊन त्यांचे संवर्धन करणे सोपे होणार असल्याचे सांगण्यात आले आहे़

जिल्ह्यातील एकूण ५९५ पैकी ४०८ ग्रामपंचायतींनी या प्रक्रियेत बाजी मारली असली तरी अद्याप १८७ ग्रामपंचायतींकडून नोंदवही आलेली नाही़ त्यांच्याकडून कामकाज सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे़ शहादा तालुक्यातील १०९, धडगाव ३३, नंदुरबार ११०, नवापुर ११४, तळोदा १० तर अक्कलकुवा तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींनी जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास विभागाकडे जैवविविधता नोंदवही जमा केल्याची माहिती आहे़ या कामकाजात त्या-त्या गावातील ग्रामसेवक आणि नियुक्त करण्यात आलेली समिती यांनी मोलाची भूमिका बजावली आहे़४समितीचे हे कामकाज पूर्ण करण्यात आल्यानंतर पुढील टप्प्यात शासनाकडे वह्यांचा अहवाल जाऊन उपाययोजनांंना सुरुवात होणार आहे़ यासाठी पर्यावरण मंत्रालय वेळोवेळी ग्रामपंचायतींनी निधी देऊन विविध नामशेष होणाऱ्या प्रजातींचे संवर्धन करण्याबाबतही निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे़दरम्यान जिल्ह्यातील धडगाव आणि अक्कलकुवा या दोन तालुक्यात नोंदवह्या तयार करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत़ तेथूनही महिनाअखेरीस वह्या पूर्ण होेणार असल्याचे सांगण्यात आले आहे़

अंतिम मुदतीत वही पूर्ण न झाल्यास केंद्रशासनाकडून ग्रामपंचायतींसह सहाय्य करणाऱ्या वनविभाग, महसूल, पशुसंवर्धन तसेच विविध यंत्रणांना किमान १० लाख रुपयांचा दंड होण्याची शक्यता आहे़ गावशिवारातील पाणी, माती, वनस्पती, हवामान, सूक्ष्मजीव, प्राणी यांची अचूक माहिती यातून समोर येणे अपेक्षित आहे़ जैवविधिता अधिनियम २००२ च्या कलम ४१ अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर ‘लोक जैवविधिता नोंदवही’ तयार करण्याचे आदेश देण्यात आले होते़ जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या मेहनतीने तयार करण्यात आलेल्या रजिस्टरसाठी पशुसंवर्धन विभाग, सामाजिक वनीकरण, वनविभाग, कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांची वेळोवेळी मदत घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़