शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
2
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
3
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
4
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
5
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
6
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
7
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
8
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
9
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
10
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
11
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
12
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
13
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
14
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
15
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
16
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
17
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
18
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
19
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
20
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 

४०८ ग्रामपंचायतींची जैवविविधता वही तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 12:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : हरीत लवादाच्या आदेशाने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयातर्फे देशातील ग्रामीण स्तरावर प्रत्येक ग्रामपंचायतीचे जैवविविधता रजिस्टर तयार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : हरीत लवादाच्या आदेशाने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयातर्फे देशातील ग्रामीण स्तरावर प्रत्येक ग्रामपंचायतीचे जैवविविधता रजिस्टर तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ यानुसार जिल्ह्यातील ५९५ ग्रामपंचायतींमध्ये कामकाज सुरु होते़ यांतर्गत अंतिम मुदतीला आठ दिवस शिल्लक असताना जिल्ह्यातील ४०८ ग्रामपंचायतींनी बाजी मारत नोंदवह्या तयार केल्या आहेत़नोंदवहीसाठी शासनाने ३१ जानेवारी ही अंतिम मुदत दिली आहे़ जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी वेगाने कामकाज केल्याने केवळ १८७ ग्रामपंचायतींमध्ये नोंदवह्या तयार करणे शिल्लक असल्याची माहिती असून २६ जानेवारीनंतर या ग्रामपंचायतीही रजिस्टर तयार करुन देणार असल्याचे सांगण्यात आले आहे़ राज्यातील सर्वाधिक वेगाने जैवविविधता नोंदवही तयार करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये नंदुरबारचाही समावेश झाला असून यामुळे जिल्हा परिषदेकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे़ जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींनी जैवविविधता रजिस्टर तयार करण्यापूर्वी ग्रामीण स्तरावर जैवविविधता समिती स्थापन केली होती़ समिती स्थापन करण्यात आल्यानंतर संबधित ग्रामसेवकांना तब्बल ३२ प्रकारचे अर्ज भरुन देण्याचे कामकाज करावे लागले होते़ या कामकाजात शेतशिवारातील प्रत्येक बारीक-सारीक बाबीची माहिती देण्यात आली आहे़ जिल्ह्यात अंत्यत वेगाने तयार झालेल्या या कामकाजात सातपुड्याच्या दुर्गम भागातील अनेक दुर्लक्षित वनस्पतींच्या प्रजाती, धान्याचे वाण आणि फुलांचे प्रकार समोर येऊन त्यांचे संवर्धन करणे सोपे होणार असल्याचे सांगण्यात आले आहे़

जिल्ह्यातील एकूण ५९५ पैकी ४०८ ग्रामपंचायतींनी या प्रक्रियेत बाजी मारली असली तरी अद्याप १८७ ग्रामपंचायतींकडून नोंदवही आलेली नाही़ त्यांच्याकडून कामकाज सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे़ शहादा तालुक्यातील १०९, धडगाव ३३, नंदुरबार ११०, नवापुर ११४, तळोदा १० तर अक्कलकुवा तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींनी जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास विभागाकडे जैवविविधता नोंदवही जमा केल्याची माहिती आहे़ या कामकाजात त्या-त्या गावातील ग्रामसेवक आणि नियुक्त करण्यात आलेली समिती यांनी मोलाची भूमिका बजावली आहे़४समितीचे हे कामकाज पूर्ण करण्यात आल्यानंतर पुढील टप्प्यात शासनाकडे वह्यांचा अहवाल जाऊन उपाययोजनांंना सुरुवात होणार आहे़ यासाठी पर्यावरण मंत्रालय वेळोवेळी ग्रामपंचायतींनी निधी देऊन विविध नामशेष होणाऱ्या प्रजातींचे संवर्धन करण्याबाबतही निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे़दरम्यान जिल्ह्यातील धडगाव आणि अक्कलकुवा या दोन तालुक्यात नोंदवह्या तयार करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत़ तेथूनही महिनाअखेरीस वह्या पूर्ण होेणार असल्याचे सांगण्यात आले आहे़

अंतिम मुदतीत वही पूर्ण न झाल्यास केंद्रशासनाकडून ग्रामपंचायतींसह सहाय्य करणाऱ्या वनविभाग, महसूल, पशुसंवर्धन तसेच विविध यंत्रणांना किमान १० लाख रुपयांचा दंड होण्याची शक्यता आहे़ गावशिवारातील पाणी, माती, वनस्पती, हवामान, सूक्ष्मजीव, प्राणी यांची अचूक माहिती यातून समोर येणे अपेक्षित आहे़ जैवविधिता अधिनियम २००२ च्या कलम ४१ अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर ‘लोक जैवविधिता नोंदवही’ तयार करण्याचे आदेश देण्यात आले होते़ जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या मेहनतीने तयार करण्यात आलेल्या रजिस्टरसाठी पशुसंवर्धन विभाग, सामाजिक वनीकरण, वनविभाग, कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांची वेळोवेळी मदत घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़