शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी तार्इंना भाऊबिजचा उशिरा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 12:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गरोदर माता व बालकांसाठी जीवनदायिनींची भूमिका निभावणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी दोन हजाराची भाऊबिज भेट ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गरोदर माता व बालकांसाठी जीवनदायिनींची भूमिका निभावणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी दोन हजाराची भाऊबिज भेट देण्याचा निर्णय दिवाळीपूर्वी घेण्यात आला होता. परंतु दिवाळी उलटून दोन महिन्यांना कालावधी झाल्यानंतर या भेटीची रक्कम वाटप करण्यात आली. त्यामुळे दिवाळीच्या दोन महिन्यांनी भाऊबिज कसा साजरी करावा, असा प्रश्न उपस्थित रकरण्यात येत आहे.जिल्ह्यातील स्तनदा व गरोदर मातांसह बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी अंगणवाडी केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. या केंद्रांमध्ये चार हजार ५९३ अंगणवाडी सेविका व कार्यकर्तींची नियुक्ती करण्यात आली आहे. हे दोन्ही वर्गातील कर्मचारी सामाजात कुपोषण निर्माण न होता सुदृढ बालक, त्या बालकांची चांगली वाढ व्हावी यासाठी प्रयत्न करीत आहे. एवढेच नव्हे तर स्तनदा व गरोदर मातांना वेळेवर व योग्य आहार पुरवठा करीत जन्मणाºया नवजात बालक सुदृढ राहावे शिवाय त्या बालकांसाठी मातांचे आरोग्यही चांगले राहावे, म्हणून प्रयत्न करीत आहे. त्यामुळे हे कर्मचारी माता - बालकांसाठी जीवनदायिनीच ठरत आहे.या कामांसाठी त्यांना मानधन दिले जात असले तरी ते त्यांच्या जबाबदारीच्या तुलनेत अगदी तटपुंजे ठरत आहे. देशाच्या जळण-घळणीत तथा देशाचे भावी व जबादार नागरिक घडविण्याच्या साखळीतील पाया हेच कर्मचारी भक्कम करीत आहे. असे असतांनाही त्यांनी अत्यल्प मानधन दिले जाते. ही सेवा बजावतांना या कर्मचाºयांना समाधानकारक दिवाळी साजरी करता येत नाही. शिवाय दिवाळीतील अवघ्या महिलांचा भाऊबिज हा उत्सवही त्यांना आनंदविनाच साजरा करावा लागतो. त्यांना हा उत्सव आनंदाने साजरा करता यावा, यासाठी दरवर्षी भाऊबिज भेट जाहिर करण्यात येते.शासनाच्या निर्णयानुसार यंदाच्या भाऊबिजसाठीही भेट देण्याचा निर्णय शासनामार्फत दिवाळीपूर्वी घेण्यात आला. अंगणवाडी कर्मचाºयांसाठी हिताचा निर्णय घेतल्याने दवाळी व भाऊबिज आनंदात साजरा करता येईल, असे अपेक्षा या कर्मचाºयांमार्फत दिवाळीपूर्वीच करण्यात आली होती. परंतु प्रत्यक्ष दिवाळीशिवाय दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही या कर्मचाºयांना भाऊबिजच भेटीची रक्कम देण्यात आली नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत असतानाच ही रक्कम वाटप करण्यात आली आहे. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाºयांमध्ये आनंद असला तरी भाऊबिजेचा खरा आनंद हिरावला गेल्याची खंत देखील व्यक्त करण्यात येत आहे.कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्याही तातडीने पूर्ण करण्याची मागणी संघटनेचे राज्याध्यक्ष मायाबाई परमेश्वर, युवराज बैसाणे, रामकृष्ण पाटील, अ‍ॅड.गजानन थळे, रवींद्र जाधव, सुधिर परमेश्वर, रवींद्र ब्राह्मणे, राजू पाटील यांनी केली आहे.शासनामार्फत भाऊबिज जाहिर करुनही प्रत्यक्ष लाभ दिला गेला नाही. त्यामुळे राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेमार्फत काही दिवसांपूर्वी शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. त्यानुसार दि.९ डिसेंबर रोजी राज्य शासनाने निर्णय घेत अंगणवाडी कर्मचाºयांसाठी भाऊबिजची स्वतंत्र तरतुदीला मंजरी दिली. तरतुदीतील ग्रामीण व आदिवासी भागासाठी ३३ कोटी ५१ लाख ६४ हजाराचा निधी उलपलब्ध करुन देण्यात आला. त्यापैकी नंदुरबार जिल्ह्यातील चार हजार ५९३ कर्मचाºयांना प्रत्येकी दोन हजार प्रमाणे वाटप करण्यासाठी ९१ लाख ८६ हजाराचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला.संघटनेने केलेल्या पाठपुराव्यानुसार अंगणवाडी कर्मचाºयांना भाऊबिज भेटीची रक्कम मिळाली परंतु, नोव्हेंबर महिन्याचे मानधनच दिले गेले नाही. त्यामुळे केवळ भाऊबिजच्या दोन हजाराच्या आनंदाला विरजण लागल्याचे म्हटले जात आहे. मानधनासाठी शासनाकडून निधीच उपलब्ध झाल्या नसल्याचे शासनामार्फत सांगण्यात येत आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशन होईपर्यंत कदाचित निधी दिला जाणार नसल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे कर्मचाºयांना अजुन काही दिवस मानधनाशिवाय राहावे लागण्याची शक्यता आहे.