शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

अंगणवाडी तार्इंना भाऊबिजचा उशिरा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 12:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गरोदर माता व बालकांसाठी जीवनदायिनींची भूमिका निभावणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी दोन हजाराची भाऊबिज भेट ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गरोदर माता व बालकांसाठी जीवनदायिनींची भूमिका निभावणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी दोन हजाराची भाऊबिज भेट देण्याचा निर्णय दिवाळीपूर्वी घेण्यात आला होता. परंतु दिवाळी उलटून दोन महिन्यांना कालावधी झाल्यानंतर या भेटीची रक्कम वाटप करण्यात आली. त्यामुळे दिवाळीच्या दोन महिन्यांनी भाऊबिज कसा साजरी करावा, असा प्रश्न उपस्थित रकरण्यात येत आहे.जिल्ह्यातील स्तनदा व गरोदर मातांसह बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी अंगणवाडी केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. या केंद्रांमध्ये चार हजार ५९३ अंगणवाडी सेविका व कार्यकर्तींची नियुक्ती करण्यात आली आहे. हे दोन्ही वर्गातील कर्मचारी सामाजात कुपोषण निर्माण न होता सुदृढ बालक, त्या बालकांची चांगली वाढ व्हावी यासाठी प्रयत्न करीत आहे. एवढेच नव्हे तर स्तनदा व गरोदर मातांना वेळेवर व योग्य आहार पुरवठा करीत जन्मणाºया नवजात बालक सुदृढ राहावे शिवाय त्या बालकांसाठी मातांचे आरोग्यही चांगले राहावे, म्हणून प्रयत्न करीत आहे. त्यामुळे हे कर्मचारी माता - बालकांसाठी जीवनदायिनीच ठरत आहे.या कामांसाठी त्यांना मानधन दिले जात असले तरी ते त्यांच्या जबाबदारीच्या तुलनेत अगदी तटपुंजे ठरत आहे. देशाच्या जळण-घळणीत तथा देशाचे भावी व जबादार नागरिक घडविण्याच्या साखळीतील पाया हेच कर्मचारी भक्कम करीत आहे. असे असतांनाही त्यांनी अत्यल्प मानधन दिले जाते. ही सेवा बजावतांना या कर्मचाºयांना समाधानकारक दिवाळी साजरी करता येत नाही. शिवाय दिवाळीतील अवघ्या महिलांचा भाऊबिज हा उत्सवही त्यांना आनंदविनाच साजरा करावा लागतो. त्यांना हा उत्सव आनंदाने साजरा करता यावा, यासाठी दरवर्षी भाऊबिज भेट जाहिर करण्यात येते.शासनाच्या निर्णयानुसार यंदाच्या भाऊबिजसाठीही भेट देण्याचा निर्णय शासनामार्फत दिवाळीपूर्वी घेण्यात आला. अंगणवाडी कर्मचाºयांसाठी हिताचा निर्णय घेतल्याने दवाळी व भाऊबिज आनंदात साजरा करता येईल, असे अपेक्षा या कर्मचाºयांमार्फत दिवाळीपूर्वीच करण्यात आली होती. परंतु प्रत्यक्ष दिवाळीशिवाय दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही या कर्मचाºयांना भाऊबिजच भेटीची रक्कम देण्यात आली नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत असतानाच ही रक्कम वाटप करण्यात आली आहे. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाºयांमध्ये आनंद असला तरी भाऊबिजेचा खरा आनंद हिरावला गेल्याची खंत देखील व्यक्त करण्यात येत आहे.कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्याही तातडीने पूर्ण करण्याची मागणी संघटनेचे राज्याध्यक्ष मायाबाई परमेश्वर, युवराज बैसाणे, रामकृष्ण पाटील, अ‍ॅड.गजानन थळे, रवींद्र जाधव, सुधिर परमेश्वर, रवींद्र ब्राह्मणे, राजू पाटील यांनी केली आहे.शासनामार्फत भाऊबिज जाहिर करुनही प्रत्यक्ष लाभ दिला गेला नाही. त्यामुळे राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेमार्फत काही दिवसांपूर्वी शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. त्यानुसार दि.९ डिसेंबर रोजी राज्य शासनाने निर्णय घेत अंगणवाडी कर्मचाºयांसाठी भाऊबिजची स्वतंत्र तरतुदीला मंजरी दिली. तरतुदीतील ग्रामीण व आदिवासी भागासाठी ३३ कोटी ५१ लाख ६४ हजाराचा निधी उलपलब्ध करुन देण्यात आला. त्यापैकी नंदुरबार जिल्ह्यातील चार हजार ५९३ कर्मचाºयांना प्रत्येकी दोन हजार प्रमाणे वाटप करण्यासाठी ९१ लाख ८६ हजाराचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला.संघटनेने केलेल्या पाठपुराव्यानुसार अंगणवाडी कर्मचाºयांना भाऊबिज भेटीची रक्कम मिळाली परंतु, नोव्हेंबर महिन्याचे मानधनच दिले गेले नाही. त्यामुळे केवळ भाऊबिजच्या दोन हजाराच्या आनंदाला विरजण लागल्याचे म्हटले जात आहे. मानधनासाठी शासनाकडून निधीच उपलब्ध झाल्या नसल्याचे शासनामार्फत सांगण्यात येत आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशन होईपर्यंत कदाचित निधी दिला जाणार नसल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे कर्मचाºयांना अजुन काही दिवस मानधनाशिवाय राहावे लागण्याची शक्यता आहे.