शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

खबरदार, लग्नात गर्दी केली तर थेट कारवाई करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 12:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लग्न समारंभात ५० पेक्षा अधीक व्यक्ती आढळून आल्यास वर, वधूंचे आई-वडील व भटजी यांच्यावर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लग्न समारंभात ५० पेक्षा अधीक व्यक्ती आढळून आल्यास वर, वधूंचे आई-वडील व भटजी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे एकतर लग्न समारंभ पुढे ढकलावे किंवा गर्दीवर नियंत्रण ठेवावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी केले आहे.कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात सर्वत्र दक्षता घेतली जात आहे. आवश्यक त्या ठिकाणी गर्दीवर नियंत्रण आणले जात आहे. सर्व सामुहिक व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. परंतु शहरी आणि ग्रामिण भागात अजूनही लग्न समारोह मोठ्या व व्यापक प्रमाणात साजरे केले जात आहेत. अशा ठिकाणी गर्दीवर कुठलेही नियंत्रण ठेवले जात नाही. आवश्यक उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अशा ठिकाणी संसर्गाची शक्यता असते. एकीकडे प्रशासन आवश्यक त्या उपाययोजना करीत आहे तर दुसरीकडे लग्न समारंभ आयोजित करणारी मंडळी कुठलीही काळजी घेत नाहीत. प्रशासनाच्या उपाययोजनांवर पाणी फिरत आहे. ही बाब लक्षात घेता आता लग्न समारंभ आयोजनावरच प्रशासनाने कडक निर्बंध आणले आहेत. याबाबत माहिती देतांना जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी सांगितले, याआधीच मॅरेज लॉन्स, मंगल कार्यालये यांना बंद ठेवण्याच्या सुचना दिल्या आहेत.यापुढे कुणी बुकींग केले असतील तर ते रद्द करून द्यावे. सर्व मंगल कार्यालय व लॉन्स यांना नियमांचे आणि आदेशाचे पालन करण्याच्या सुचना लेखी स्वरूपात दिल्या आहेत. असे असतांनाही कुणी लग्न समारंभ, सार्वजनिक, सामुहिक कार्यक्रम यासठी मंगल कार्यालय, हॉल, लॉन्स उपलब्ध करून दिले तर त्यांच्यावर भादंवी कलमान्वये कारवाई करण्यात येणार आहे.घरगुती स्वरूपात आयोजित सर्व लग्न समारंभांवरही नियंत्रण आणले जात आहे. त्यासाठी ५० पेक्षा जास्त लोकांनी अशा ठिकाणी उपस्थित राहू नये यासाठी सुचना देण्यात येत आहे. त्या त्या तहसीलदारांना, पोलीस निरिक्षकांना तशा सुचना दिल्या जात आहेत.तरीही ५० पेक्षा अधीक लोकं दिसून आल्यास तेथील लग्न समारंभ आयोजित करणारे वधू व वर यांचे आई-वडील व भटजी यांच्यावर थेट कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे घरगुती स्वरूपात व मोजक्याच अर्थात ५० जणांच्या उपस्थितीतच लग्न समारंभ आयोजित करावा असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ.भारूड यांनी केले आहे.अखेर आदेश... आवाहन करूनही जनता ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे लग्न समारंभामधील उपस्थितीवर मर्यादा आणाव्या लागल्या असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.कारवाईचे अधिकार... प्रशासनाला कारवाईचे अधिकार आहे. आपत्ती व्यवस्थापनव पोलीस कायद्यान्वये कारवाई होईल.