शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

खबरदार, विनाकारण फिराल तर थेट गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 11:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : संचारबंदी, लॉकडाऊनमध्ये विनाकारण घराबाहेर पडू नका याबाबत वेळोवेळी आवाहन करूनही दुचाकी व चारचाकी वाहनचालक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : संचारबंदी, लॉकडाऊनमध्ये विनाकारण घराबाहेर पडू नका याबाबत वेळोवेळी आवाहन करूनही दुचाकी व चारचाकी वाहनचालक गावात फेरफटका मारतात. परिणामी गर्दी कमी होण्याऐवजी वाढतच चालल्याचे दिसून येत असल्यामुळे पोलिसांनी सक्तीने कारवाईला सुरुवात केली आहे. शहर वाहतुक शाखेने दोन दिवसात १७५ वाहने जमा करण्यात आली आहेत. तर एक लाखाच्या वर दंड वसुल करण्यात आला आहे. शहर, उपनगर व तालुका पोलिसांतर्फे देखील बाहेर फिरणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करीत आहेत.संचारबंदी काळात नागरिक मोठ्या संख्येने बाहेर फिरत आहेत. यामुळे शासनाचा लॉकडाऊनचा उद्देशाला हारताळ फासला जात आहे. प्रशासनाने बाजाराचे अलगीकरण करून देखील नागरिक आपल्या परिसरात खरेदी करण्याऐवजी शहरातच येत आहेत. काही जण विनाकारण फेरफटका मारण्यासाठी शहरात येत आहेत. नागरिकांना आवाहन करून देखील गर्दी कमी होण्याचे नाव घेत नसल्यामुळे आता थेट कायदेशीर कारवाई केली जात आहे.१७५ वाहने जमापोलीस अधीक्षकांनी शहर वाहतूक शाखेला याबाबत कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. विनाकारण शहरात वाहने येत असल्यास त्यांची चौकशी करून त्यांच्यावर थेट कारवाई करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार सकाळी १० वाजेपासून सायंकाळी आठ वाजेपर्यंत शहरातील विविध ठिकाणी नाकाबंदी करून पॉर्इंट लावण्यात आले आहेत. अशा ठिकाणी दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनचालक आढळून आल्यास आधी त्याची चौकशी केली जात आहे. त्यानंतर थेट वाहने जमा केली जात आहेत. दोन दिवसात १७५ वाहने जमा करण्यात आली. जमा केलेली वाहने दंड भरून सोडली जात आहेत. त्यात पीयूसी, नंबर प्लेट, साईड ग्लास, रजिस्ट्रेशन, चालविणाºयाचे लायसन्स यासह इतर बाबी पाहिल्या जात आहेत. त्यानंतर त्यांच्याकडून तो एकत्रीत दंड वसुल केला जात आहे. १७५ पैकी ९५ जणांनी आतापर्यंत या प्रकारचे दंड भरून वाहन सोडविले आहेत.एक लाखापेक्षा अधीक दंडवाहन जमा करण्यासह आॅनलाईन दंडात्मक कारवाई देखील केली जात आहे. आतापर्यंत दोन दिवसात एक लाखापेक्षा अधीक दंड वसुल करण्यात आला आहे. दंड हा आॅनलाईन आहे.एक अधिकारी ४० कर्मचारीकारवाईसाठी एक अधिकारी व ४० कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत. शहरातील चारही चौफुली, मुख्य रस्ते, उड्डाणपूल या ठिकाणी पॉर्इंट लावण्यात आले आहेत. तेथे वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांसह शहर व उपनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी देखील तैणात आहेत.शहरात संचारबंदीच्या काळात विनाकारण फिरणाºया सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे पोलिसांची चांगलची दहशत निर्माण झाली आहे. शहर वाहतुक शाखेतर्फे देखील दंडात्मक कारवाई केली जात आहे. शहर वाहतूक शाखेचे निरिक्षक अधाटे यांच्यासह त्यांच्या ४० कर्मचाºयांचे पथक यासाठी कार्यान्वीत आहेत. शहर वाहतूक शाखेच्या जोडीला शहर पोलीस ठाणे आणि उपनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी देखील तैणात करण्यात आले आहेत. यामुळे दुचाकी चालकांचे शहरात येण्याचे प्रमाण कमालची रोडावले आहे.