शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

खबरदार, विनाकारण फिराल तर थेट गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 11:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : संचारबंदी, लॉकडाऊनमध्ये विनाकारण घराबाहेर पडू नका याबाबत वेळोवेळी आवाहन करूनही दुचाकी व चारचाकी वाहनचालक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : संचारबंदी, लॉकडाऊनमध्ये विनाकारण घराबाहेर पडू नका याबाबत वेळोवेळी आवाहन करूनही दुचाकी व चारचाकी वाहनचालक गावात फेरफटका मारतात. परिणामी गर्दी कमी होण्याऐवजी वाढतच चालल्याचे दिसून येत असल्यामुळे पोलिसांनी सक्तीने कारवाईला सुरुवात केली आहे. शहर वाहतुक शाखेने दोन दिवसात १७५ वाहने जमा करण्यात आली आहेत. तर एक लाखाच्या वर दंड वसुल करण्यात आला आहे. शहर, उपनगर व तालुका पोलिसांतर्फे देखील बाहेर फिरणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करीत आहेत.संचारबंदी काळात नागरिक मोठ्या संख्येने बाहेर फिरत आहेत. यामुळे शासनाचा लॉकडाऊनचा उद्देशाला हारताळ फासला जात आहे. प्रशासनाने बाजाराचे अलगीकरण करून देखील नागरिक आपल्या परिसरात खरेदी करण्याऐवजी शहरातच येत आहेत. काही जण विनाकारण फेरफटका मारण्यासाठी शहरात येत आहेत. नागरिकांना आवाहन करून देखील गर्दी कमी होण्याचे नाव घेत नसल्यामुळे आता थेट कायदेशीर कारवाई केली जात आहे.१७५ वाहने जमापोलीस अधीक्षकांनी शहर वाहतूक शाखेला याबाबत कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. विनाकारण शहरात वाहने येत असल्यास त्यांची चौकशी करून त्यांच्यावर थेट कारवाई करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार सकाळी १० वाजेपासून सायंकाळी आठ वाजेपर्यंत शहरातील विविध ठिकाणी नाकाबंदी करून पॉर्इंट लावण्यात आले आहेत. अशा ठिकाणी दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनचालक आढळून आल्यास आधी त्याची चौकशी केली जात आहे. त्यानंतर थेट वाहने जमा केली जात आहेत. दोन दिवसात १७५ वाहने जमा करण्यात आली. जमा केलेली वाहने दंड भरून सोडली जात आहेत. त्यात पीयूसी, नंबर प्लेट, साईड ग्लास, रजिस्ट्रेशन, चालविणाºयाचे लायसन्स यासह इतर बाबी पाहिल्या जात आहेत. त्यानंतर त्यांच्याकडून तो एकत्रीत दंड वसुल केला जात आहे. १७५ पैकी ९५ जणांनी आतापर्यंत या प्रकारचे दंड भरून वाहन सोडविले आहेत.एक लाखापेक्षा अधीक दंडवाहन जमा करण्यासह आॅनलाईन दंडात्मक कारवाई देखील केली जात आहे. आतापर्यंत दोन दिवसात एक लाखापेक्षा अधीक दंड वसुल करण्यात आला आहे. दंड हा आॅनलाईन आहे.एक अधिकारी ४० कर्मचारीकारवाईसाठी एक अधिकारी व ४० कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत. शहरातील चारही चौफुली, मुख्य रस्ते, उड्डाणपूल या ठिकाणी पॉर्इंट लावण्यात आले आहेत. तेथे वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांसह शहर व उपनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी देखील तैणात आहेत.शहरात संचारबंदीच्या काळात विनाकारण फिरणाºया सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे पोलिसांची चांगलची दहशत निर्माण झाली आहे. शहर वाहतुक शाखेतर्फे देखील दंडात्मक कारवाई केली जात आहे. शहर वाहतूक शाखेचे निरिक्षक अधाटे यांच्यासह त्यांच्या ४० कर्मचाºयांचे पथक यासाठी कार्यान्वीत आहेत. शहर वाहतूक शाखेच्या जोडीला शहर पोलीस ठाणे आणि उपनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी देखील तैणात करण्यात आले आहेत. यामुळे दुचाकी चालकांचे शहरात येण्याचे प्रमाण कमालची रोडावले आहे.