शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
3
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
4
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
5
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
6
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
7
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
8
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
9
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
10
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
11
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
12
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
13
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
14
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
15
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
16
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
17
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
18
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
19
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
20
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

आवक नसल्याने मिरचीची लाली यंदा पडतेय फिकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 12:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अतीपावसामुळे यंदा मिरचीचे उत्पादन कमी झाल्याने बाजारात मिरचीची आवकही जेमतेमच आहे. असे असतांना भाव ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अतीपावसामुळे यंदा मिरचीचे उत्पादन कमी झाल्याने बाजारात मिरचीची आवकही जेमतेमच आहे. असे असतांना भाव मात्र वाढत नसल्यामुळे शेतक:यांमध्ये नाराजी आहे. सध्या बाजार समितीत दिवसाला 1800 ते दोन  हजार क्विंटल आवक सुरू आहे. जवळपास दिवसाला 100 ते 125 वाहने भरून येत आहेत.   मिरचीचे आगार म्हणून नंदुरबार बाजार समिती प्रसिद्ध आहे. या ठिकाणी दरवर्षी साधारणत: सव्वा ते पावणेदोन लाख क्विंटल मिरचीची आवक होत असते. हंगाम चांगला राहिला तर दोन अडीच लाख क्विंटलर्पयत देखील आवक झाली आहे. यंदा मात्र अती पावसामुळे मिरचीचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे मिरची हंगामाच्या सुरुवातीलाच आवक कमी झाली. गेल्या काही दिवसांपासून मात्र      त्यात सुधारणा होऊन आवक ब:यापैकी वाढली असल्याचे चित्र आहे.दैनंदिन दोन हजार क्विंटलयेथील बाजार समितीत     दैनंदिन साधारणत: 1800 ते 2000 क्विंटल आवक होत आहे. 100 ते 125 वाहने भरून मिरची येत आहे. दुपार्पयत सर्वच वाहनांचा लिलाव होत आहे. मिरची हंगाम सुरू झाल्यापासून आवक कमी होती. त्याला कारण पावसाळी वातावरण, वातावरणातील आद्रेत होणारी वाढ यामुळे आवक अपेक्षीतरित्या होत नव्हती. परंतु सध्या वातावरण बदलले असल्याने आणि थंडीही वाढू लागल्याने मिरची आवक 400 ते 500 क्विंटलने वाढली असल्याचे चित्र आहे. सोमवारी बाजारात साधारणत: 19 हजार क्विंटल आवक झाली  होती. 23 पथारींवर प्रक्रियामिरची खरेदीनंतर ती सुकविण्यासाठी 23 पथारींवर प्रक्रिया केली जाते. पथारींवर मिरचीचे देठ काढणे, प्रतवारीनुसार ढिग करणे, सुकविण्यासाठी पसरविणे आणि सुकलेली मिरची गोळा करून ती पोत्यांमध्ये भरणे अशा प्रक्रिया केल्या जातात. त्यासाठी शेकडो मजूर या ठिकाणी कामाला असतात. त्यांना तीन ते चार महिने ब:यापैकी रोजगार देखील उपलब्ध होतो. तीन ते चार प्रकारबाजार समितीत तीन ते चार जातीच्या मिरच्या विक्रीस येतात. यात व्हीएनआर, लाली, तेजा या प्रमुख मिरचीचे प्रकार सर्वाधिक आहेत. सध्या तेजाचे भाव सर्वाधिक आहेत. तर व्हीएनआर व लाली यांनाही ब:यापैकी भाव मिळत आहेत. असे असले तरी आवक कमी असतांना  भाव वाढणे अपेक्षीत असतांना तसे होतांना दिसून येत नसल्याची स्थिती आहे. 

नंदुरबार बाजार समितीत ओली मिरचीला सध्या 1700 ते 3300 रुपये क्विंटल भाव मिळत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत भाव स्थिर आहे. यंदा उत्पादन आणि क्षेत्र कमी असल्यामुळे भाव जास्त राहण्याची अपेक्षा असतांना तसे होत नसल्याची स्थिती आहे. बाजारात सुकलेल्या मिरचीची आवक देखील ब:यापैकी असते. सुकी मिरचीला पाच हजार ते 15 हजार रुपये क्विंटल भाव मिळत आहे. सर्वाधिक मध्य प्रदेशातून सुकलेली मिरची या ठिकाणी येत आहे. आवक मात्र कमी राहत आहे.