शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

वराह पकडण्याच्या वादातून तळोद्यात मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:27 IST

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,तळोदा येथील मरीमाता गल्लीत राहणारे सुभाष अशोक कुराडे व अनिल मंगल कुराडे, रामू नानाजी पाडवी हे ...

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,तळोदा येथील मरीमाता गल्लीत राहणारे सुभाष अशोक कुराडे व अनिल मंगल कुराडे, रामू नानाजी पाडवी हे शनिवार, १७ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास कुंभारवाडा परिसरात वराह पकडण्यासाठी गेले होते. यावेळी तनवीर शेख शरीफ हा त्याच्या घरी होता. सुभाष, अनिल, रामू याना तनवीरने वराह नंतर पकडा, असे सांगितले असता त्यांच्यात वाद निर्माण झाला. वादाचे पर्यावसन शिवीगाळ व नंतर हाणामारीत झाले. या हाणामारीत अनिल कुराडे, सुभाष कुराडे, रामू पाडवी यांना तर दुसऱ्या गटातील शेख तनविर शेख,सरीफ, शेरखान अजीजखान पठाण, हाजी शेख शरिफशेख सरदार,सुलतानाबी शरीफ यांना मुक्का मार लागला आहे. मारहाणीत अनिल कुराडे याला लाकडी दांड्याने मारहाण करून डोक्याला दुखापत केल्याचा आरोप करण्यात आला तर सुलतानाबी शरीफ हिला देखिल ओठांना जखम झाल्याचे सांगितले जात होते.

तनवीर शेख शरीफ याने दिलेल्या फिर्यादीवरून तर दुसऱ्या गटाकडून अनिल कुराडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एकमेकांच्या विरोधात तळोदा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे जमावाला पांगवण्यात यश आले. संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास आ.राजेश पाडवी यांनीदेखील पोलीस स्टेशनला प्रकरण समजून घेत दोन्ही गटांच्या वरिष्ठांना बोलून वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न केले. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांनीदेखिल रात्री दहा वाजेच्या सुमारास तळोदा येथे धाव घेतली व परिस्थितीची पाहणी केली. पोलीस निरिक्षक पंडितराव घुमरे यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.