शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: मतदानाआधीच ३ माजी मुख्यमंत्र्यांनी 'गेम' बदलला; इंडिया आघाडीला धक्का
2
गृहमंत्र्यांचा राजीनामा, २० जणांचा मृत्यू, सोशल मीडियावरील बंदी उठवली; नेपाळमध्ये काय काय घडले?
3
Shantanu Naidu : रतन टाटांचा तरुण सहकारी राहिलेल्या शंतनू नायडूने प्रेमाची कबुली दिली? तिच्यासोबतचे फोटो आले समोर
4
टायगर श्रॉफनं मुंबईमध्ये ₹१५.६० कोटींना विकलं लक्झरी अपार्टमेंट, पाहा डिटेल्स; कितीला खरेदी केलेली प्रॉपर्टी?
5
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
6
Post Office ची ही स्कीम करेल मालामाल; दर महिन्याला मिळेल ₹५,५०० चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
7
Asia Cup 2025, AFG vs HK Head to Head Record : 'चमत्कारी' संघासमोर ते चमत्कार दाखवतील का?
8
"आई शप्पथ गळा कापेन...", अली गोनीचा ट्रोलर्सला इशारा; 'त्या' व्हिडीओवरुन झालेला वाद
9
"तू बाहेर चल, तुझं तोंडच फोडतो…’’, ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत वादावादी, वित्तमंत्री आणि फायनान्स अधिकारी भिडले
10
शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २६१ अंकांनी वधारला; Nifty मध्येही तेजी, 'या' स्टॉक्समध्ये मोठी तेजी
11
लवकर भरा आयकर रिटर्न, अन्यथा...; कर विवरणपत्र दाखल करण्यासाठी फक्त आठवडाच शिल्लक
12
Asia Cup 2025: संजू सॅमसन पहिला सामना खेळणार की नाही? टीम इंडियाच्या सरावात चित्र स्पष्ट
13
मुंबईत दहशत माजवण्याचे षडयंत्र? अग्नीवीर जवानाला फसवून लोडेड 'इन्सास रायफल'ची चोरी!
14
Tariff: अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार
15
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
16
अमेरिकेतील दुकानात चोरी करताना पकडली गेली गुजराती महिला? चौकशीवेळी ढसाढसा रडू लागली, त्यानंतर...
17
चार मुलं जन्माला घाला आणि टॅक्स वाचवा; सरकारकडून १६,५६३ कोटी रुपये पॅकेजची घोषणा!
18
तेजस्वी यादव यांची सरकारवर १२ प्रश्नांची सरबत्ती; बेरोजगारीवर मागितली थेट उत्तरे
19
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
20
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली

समाजाचा विकास व कल्याणासाठी व्यसनमुक्त व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 12:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आदिवासी समाज हा मुळातच धार्मिक प्रवृत्तीचा आहे. समाजात आजही अनिष्ट रूढी, परंपरा असून त्यांना ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आदिवासी समाज हा मुळातच धार्मिक प्रवृत्तीचा आहे. समाजात आजही अनिष्ट रूढी, परंपरा असून त्यांना नष्ट करण्याची गरज आहे. मानवाचे कल्याण व समाजाचा विकास करायचा  असेल तर आधी  व्यसनमुक्त व्हा, असे आवाहन संत महात्म्यांनी केले. सोमवारी पहाटे चार वाजता यज्ञ महोत्सवाचा समारोप करण्यात  आला.नंदुरबार तालुक्यातील कोठली येथे भातिजी संप्रदायाच्या वतीने रविवारी नवकुळ नाग पूजा नाम यज्ञ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला महाराष्ट्रासह गुजरात व मध्य प्रदेशातून आलेल्या विविध संतांनी भाविकांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर खासदार डॉ हीना गावीत, अजबसिंग महाराज, शामसिंग महाराज, दिलीप महाराज, रतिलाल महाराज, जयसिंग महाराज, जंबूभाई महाराज, सेवादास महाराज, खुमानसिंग महाराज, कुवरसिंग महाराज, आत्माराम महाराज, नारसिंग महाराज, सोमाभाई महाराज, रुमशीभाई महाराज, शिवाजी महाराज, अनितामाता, सरपंच वासंतीबाई वळवी आदी उपस्थित होते.या वेळी खासदार डॉ.हीना गावीत म्हणाल्या की, परिसरात एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर धार्मिक कार्यक्रम होत असल्याने येथील भूमी पवित्र झाली आहे. प्रत्येक व्यक्तीला भक्तीच्या माध्यमातून दिशा मिळते. भातिजी महाराज संप्रदाय आदिवासी समाजासाठी व्यसनमुक्तीचे कार्य करीत आहे. व्यसनमुक्त ही काळाची गरज असून व्यसनामुळे आरोग्यासह सामाजिक जीवनही धोक्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रताप वसावे महाराज म्हणाले की, भातिजी महाराज संप्रदाय समाजातील अंधश्रद्धा, जुन्या रुढी-परंपरा व व्यसनमुक्तीचे कार्य करीत आहे. सुसंस्कृत समाजासाठी सर्वानी एकत्र येणे आता गरजेचे झालेले आहे. पशू हत्या, मांसाहार, व्यसनाधीनता यांच्यापासून मानवाने दूर राहायला हवे. शरीर पवित्र होण्यासाठी मन पवित्र होणे गरजेचे आहे. भागवताचार्य जिज्ञासादीदी म्हणाल्या की, युवकांनी भक्तीच्या मार्गाकडे वळावे. भक्तीतच सर्वात मोठी शक्ती सामावल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी आदिवासी, गुजराती, हिंदी व मराठी भाषेत अनेक उदाहरणे देऊन व्यसनमुक्तीचा संदेश दिला.कार्यक्रमात गुजरातमधील डेडीयापाडा येथील भजनी मंडळाच्या पथकाने सुमधूर भक्तीगीतांचे सादरीकरण केले. मध्यरात्री भातिजी महाराजांची सामूहिक आरती करण्यात आली. रात्रभर विविध धार्मिक कार्यक्रम झाले. पहाटे चार वाजता भातिजी महाराजांचा जयघोष करून यज्ञ महोत्सवाची सांगता करण्यात आली.