शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

समाजाचा विकास व कल्याणासाठी व्यसनमुक्त व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 12:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आदिवासी समाज हा मुळातच धार्मिक प्रवृत्तीचा आहे. समाजात आजही अनिष्ट रूढी, परंपरा असून त्यांना ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आदिवासी समाज हा मुळातच धार्मिक प्रवृत्तीचा आहे. समाजात आजही अनिष्ट रूढी, परंपरा असून त्यांना नष्ट करण्याची गरज आहे. मानवाचे कल्याण व समाजाचा विकास करायचा  असेल तर आधी  व्यसनमुक्त व्हा, असे आवाहन संत महात्म्यांनी केले. सोमवारी पहाटे चार वाजता यज्ञ महोत्सवाचा समारोप करण्यात  आला.नंदुरबार तालुक्यातील कोठली येथे भातिजी संप्रदायाच्या वतीने रविवारी नवकुळ नाग पूजा नाम यज्ञ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला महाराष्ट्रासह गुजरात व मध्य प्रदेशातून आलेल्या विविध संतांनी भाविकांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर खासदार डॉ हीना गावीत, अजबसिंग महाराज, शामसिंग महाराज, दिलीप महाराज, रतिलाल महाराज, जयसिंग महाराज, जंबूभाई महाराज, सेवादास महाराज, खुमानसिंग महाराज, कुवरसिंग महाराज, आत्माराम महाराज, नारसिंग महाराज, सोमाभाई महाराज, रुमशीभाई महाराज, शिवाजी महाराज, अनितामाता, सरपंच वासंतीबाई वळवी आदी उपस्थित होते.या वेळी खासदार डॉ.हीना गावीत म्हणाल्या की, परिसरात एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर धार्मिक कार्यक्रम होत असल्याने येथील भूमी पवित्र झाली आहे. प्रत्येक व्यक्तीला भक्तीच्या माध्यमातून दिशा मिळते. भातिजी महाराज संप्रदाय आदिवासी समाजासाठी व्यसनमुक्तीचे कार्य करीत आहे. व्यसनमुक्त ही काळाची गरज असून व्यसनामुळे आरोग्यासह सामाजिक जीवनही धोक्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रताप वसावे महाराज म्हणाले की, भातिजी महाराज संप्रदाय समाजातील अंधश्रद्धा, जुन्या रुढी-परंपरा व व्यसनमुक्तीचे कार्य करीत आहे. सुसंस्कृत समाजासाठी सर्वानी एकत्र येणे आता गरजेचे झालेले आहे. पशू हत्या, मांसाहार, व्यसनाधीनता यांच्यापासून मानवाने दूर राहायला हवे. शरीर पवित्र होण्यासाठी मन पवित्र होणे गरजेचे आहे. भागवताचार्य जिज्ञासादीदी म्हणाल्या की, युवकांनी भक्तीच्या मार्गाकडे वळावे. भक्तीतच सर्वात मोठी शक्ती सामावल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी आदिवासी, गुजराती, हिंदी व मराठी भाषेत अनेक उदाहरणे देऊन व्यसनमुक्तीचा संदेश दिला.कार्यक्रमात गुजरातमधील डेडीयापाडा येथील भजनी मंडळाच्या पथकाने सुमधूर भक्तीगीतांचे सादरीकरण केले. मध्यरात्री भातिजी महाराजांची सामूहिक आरती करण्यात आली. रात्रभर विविध धार्मिक कार्यक्रम झाले. पहाटे चार वाजता भातिजी महाराजांचा जयघोष करून यज्ञ महोत्सवाची सांगता करण्यात आली.