शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

खुल्या जागेवरील बाेअर धोकादायक ठरू पाहत आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:20 IST

तळोदा : शहरातील प्रतापनगर या नवीन वसाहतीत केलेला बोअर पावसाच्या पाण्यामुळे अक्षरश: खचला असून, तेथे मोठा खड्डा पडला आहे. ...

तळोदा : शहरातील प्रतापनगर या नवीन वसाहतीत केलेला बोअर पावसाच्या पाण्यामुळे अक्षरश: खचला असून, तेथे मोठा खड्डा पडला आहे. विशेषत: हा बोअर खुल्या जागेवर मारण्यात आला आहे. वसाहतीतील लहान मुले जिम करतात. साहजिकच रहिवाशांसाठी तो धोकादायक ठरला आहे. याबाबत पालिकेने चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी वसाहतधारकांनी केली आहे.

शहरातील शहादा रस्त्यावरील पालिका हद्दीत प्रतापनगर ही वसाहत स्थापन झाली आहे. येथे साधारण १०० पेक्षा अधिक कुटुंबे गेल्या १० ते १५ वर्षांपासून राहत आहेत. ही वसाहत सध्या पालिका हद्दीत येते. असे असले तरी वसाहत नागरी सुविधांपासून कोसो दूर आहे. नागरी सुविधासाठी रहिवाशांनी पालिकेच्या पदाधिकाऱ्यांकडे सतत पाठपुरावा केला तेव्हा कुठे तरी पिण्याचा पाण्यासाठी वसाहतीमधील ओपन स्पेस्वर सहा महिन्यांपूर्वी कूपनलिका करून देण्यात आली आहे. तथापि संबंधित ठेकेदाराने बोअर केल्यानंतर त्यामध्ये टोळ न टाकल्याने नुकत्याच पडलेल्या पावसाच्या पाण्यामुळे तोआजूबाजूला खचत आहे. त्यामुळे प्रचंड मोठा खड्डादेखील पडला आहे. बोरच्या क्रेशिंग पाईपमध्ये माती साचत असल्याने रुतलेल्या गाळाने कूपनलिकाच निकामी होण्याची शक्यता आहे. साहजिकच शासनाचा यावर झालेला खर्च वाया जाण्याची भीती रहिवाशांनी व्यक्त केली आहे. याबाबत पालिकेच्या पदाधिकाऱ्यांना रहिवाशांनी अनेकदा सांगितले आहे. तरीही त्याकडे गांभीर्याने लक्ष घातले जात नसल्याचा आरोप आहे. वास्तविक वसाहतीत जेथे हा बोअर केला आहे तेथे ओपन स्पेस आहे. शिवाय पालिकेने रहिवाशांसाठी ओपन जिमदेखील बसवली आहे. व्यायाम करण्यासाठी सकाळ, संध्याकाळी रहिवाशी मोठ्या प्रमाणात जिमला येत असतात. लहान बालकेही येतात. अशावेळी या जिमपासून जवळच असलेल्या बोअरमध्ये पाय घसरण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे वसाहतधारकांना हा बोअर धोकादायक बनला आहे. संबंधित यंत्रणांनी या प्रकरणी चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करावी, अशी रहिवाशांची मागणी आहे.

पालिकेने जलवाहिन्याही टाकल्या

प्रतापनगरवासीयांसाठी सहा महिन्यांपूर्वी केलेल्या या कूपनलिका वरून पालिकेने रहिवाशांच्या घरापर्यंत जलवाहिन्याही टाकल्या आहेत. मात्र कनेक्शनअभावी त्या तशाच पडल्या आहेत. जोडण्यासाठी पालिकेने स्वतः पुढाकार घेण्याची आवश्यकता असताना त्यांनी ही जबाबदारी वसाहतधारकांवर सोपवून मोकळे झाले आहे. त्यामुळे जोडण्यांबाबत रहिवाशीदेखील संभ्रमात आहेत. तशी चर्चादेखील आहे. याशिवाय जोडण्यांसाठी पालिकेने एका ग्राहकांकडून तब्बल दोन हजार रुपये डिपाॅझिट आकारली आहे. सदर रक्कम टप्प्याटप्प्याने आकारली तर रहिवाशी भरण्यास पुढे येतील. मात्र तसे होत नसल्यामुळे कनेक्शनदेखील रखडले आहे. पालिका पदाधिकारी व प्रशासनाने याबाबत ठोस मार्ग काढावा, अशी मागणी आहे.