शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

खुल्या जागेवरील बाेअर धोकादायक ठरू पाहत आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:20 IST

तळोदा : शहरातील प्रतापनगर या नवीन वसाहतीत केलेला बोअर पावसाच्या पाण्यामुळे अक्षरश: खचला असून, तेथे मोठा खड्डा पडला आहे. ...

तळोदा : शहरातील प्रतापनगर या नवीन वसाहतीत केलेला बोअर पावसाच्या पाण्यामुळे अक्षरश: खचला असून, तेथे मोठा खड्डा पडला आहे. विशेषत: हा बोअर खुल्या जागेवर मारण्यात आला आहे. वसाहतीतील लहान मुले जिम करतात. साहजिकच रहिवाशांसाठी तो धोकादायक ठरला आहे. याबाबत पालिकेने चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी वसाहतधारकांनी केली आहे.

शहरातील शहादा रस्त्यावरील पालिका हद्दीत प्रतापनगर ही वसाहत स्थापन झाली आहे. येथे साधारण १०० पेक्षा अधिक कुटुंबे गेल्या १० ते १५ वर्षांपासून राहत आहेत. ही वसाहत सध्या पालिका हद्दीत येते. असे असले तरी वसाहत नागरी सुविधांपासून कोसो दूर आहे. नागरी सुविधासाठी रहिवाशांनी पालिकेच्या पदाधिकाऱ्यांकडे सतत पाठपुरावा केला तेव्हा कुठे तरी पिण्याचा पाण्यासाठी वसाहतीमधील ओपन स्पेस्वर सहा महिन्यांपूर्वी कूपनलिका करून देण्यात आली आहे. तथापि संबंधित ठेकेदाराने बोअर केल्यानंतर त्यामध्ये टोळ न टाकल्याने नुकत्याच पडलेल्या पावसाच्या पाण्यामुळे तोआजूबाजूला खचत आहे. त्यामुळे प्रचंड मोठा खड्डादेखील पडला आहे. बोरच्या क्रेशिंग पाईपमध्ये माती साचत असल्याने रुतलेल्या गाळाने कूपनलिकाच निकामी होण्याची शक्यता आहे. साहजिकच शासनाचा यावर झालेला खर्च वाया जाण्याची भीती रहिवाशांनी व्यक्त केली आहे. याबाबत पालिकेच्या पदाधिकाऱ्यांना रहिवाशांनी अनेकदा सांगितले आहे. तरीही त्याकडे गांभीर्याने लक्ष घातले जात नसल्याचा आरोप आहे. वास्तविक वसाहतीत जेथे हा बोअर केला आहे तेथे ओपन स्पेस आहे. शिवाय पालिकेने रहिवाशांसाठी ओपन जिमदेखील बसवली आहे. व्यायाम करण्यासाठी सकाळ, संध्याकाळी रहिवाशी मोठ्या प्रमाणात जिमला येत असतात. लहान बालकेही येतात. अशावेळी या जिमपासून जवळच असलेल्या बोअरमध्ये पाय घसरण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे वसाहतधारकांना हा बोअर धोकादायक बनला आहे. संबंधित यंत्रणांनी या प्रकरणी चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करावी, अशी रहिवाशांची मागणी आहे.

पालिकेने जलवाहिन्याही टाकल्या

प्रतापनगरवासीयांसाठी सहा महिन्यांपूर्वी केलेल्या या कूपनलिका वरून पालिकेने रहिवाशांच्या घरापर्यंत जलवाहिन्याही टाकल्या आहेत. मात्र कनेक्शनअभावी त्या तशाच पडल्या आहेत. जोडण्यासाठी पालिकेने स्वतः पुढाकार घेण्याची आवश्यकता असताना त्यांनी ही जबाबदारी वसाहतधारकांवर सोपवून मोकळे झाले आहे. त्यामुळे जोडण्यांबाबत रहिवाशीदेखील संभ्रमात आहेत. तशी चर्चादेखील आहे. याशिवाय जोडण्यांसाठी पालिकेने एका ग्राहकांकडून तब्बल दोन हजार रुपये डिपाॅझिट आकारली आहे. सदर रक्कम टप्प्याटप्प्याने आकारली तर रहिवाशी भरण्यास पुढे येतील. मात्र तसे होत नसल्यामुळे कनेक्शनदेखील रखडले आहे. पालिका पदाधिकारी व प्रशासनाने याबाबत ठोस मार्ग काढावा, अशी मागणी आहे.