शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

रेमडेसिवीरच्या टंचाईला राजकारणाचा आधार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:31 IST

जिल्ह्यात गेल्या वर्षी कोरोनाची सुरुवात झाली, त्यावेळी लॉकडाऊनमुळे लोकांचे प्रचंड हाल झाले. आधीच आजाराबाबतची वेगळी भीती आणि त्यातच गोरगरीब ...

जिल्ह्यात गेल्या वर्षी कोरोनाची सुरुवात झाली, त्यावेळी लॉकडाऊनमुळे लोकांचे प्रचंड हाल झाले. आधीच आजाराबाबतची वेगळी भीती आणि त्यातच गोरगरीब मजूर व स्थलांतरितांचे, झोपडपट्टीतील लोकांचे खूपच हाल झाले. अशा वेळी सर्वच क्षेत्रातील सेवाभावी लोक माणुसकीच्या नात्याने मदतीसाठी पुढे आले होते. त्या माणुसकीच्या वातावरणात कोरोनाच्या पहिल्या टप्प्यातील काळ जिल्हावासीयांसाठी निश्चितच फारसा वेदनादायी ठरला नाही. मात्र, दुसऱ्या टप्प्यात अर्थातच या वर्षी मार्चनंतर परिस्थिती खरोखरच हाताबाहेर जात असल्याचीच स्थिती आहे. आजही अनेकांना मदतीची प्रतीक्षा आहे, पण या मदतीसाठी गेल्या वर्षासारखे हात दिसून येत नाहीत. खास करून रुग्णसंख्या वाढल्याने रुग्णांवर योग्य उपचारासाठी पुरेशी व्यवस्था झाली नाही. जिल्ह्यात मोठे उद्योगपती अथवा मोठ्या संस्था नसल्याने, मेट्रो सिटीत जसे सेवाभावी तात्पुरते कोरोना हॉस्पिटल सुरू झाले, तसे येथे सुरू झाले नाही. आहे त्या व्यवस्थेतच यंत्रणाही अपुरी आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे पैसा अथवा सामाजिक पाठबळ आहे, असे रुग्ण जिल्ह्याबाहेरील मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी जात आहेत, परंतु ८० टक्क्यांहून अधिक रुग्णांना स्थानिक स्तरावरच माफक दरात उपचाराच्या सुविधा शोधाव्या लागत आहेत. त्यात सर्वात महत्त्वाचे ठरत आहे, ते म्हणजे रेमडेसिवीर इंजेक्शन. हे इंजेक्शन खासगी मेडिकलवर मिळणे दुरापास्त झाले आहे. आहे त्या ठिकाणीही दर अव्वाच्या सव्वा असल्याने सर्वसामान्यांची आस तेथेच तुटते. इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. काहींचे या इंजेक्शनअभावी मृत्यू झाल्याच्याही नातेवाइकांच्या तक्रारी आहेत. अशा स्थितीत या इंजेक्शनचे महत्त्व जाणून सर्वप्रथम माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पुढाकार घेऊन गेल्या काही महिन्यांपासून सवलतीच्या दरात या इंजेक्शनची सुविधा सुरू केली होती. या महिन्यात रुग्णांची वाढती संख्या पाहता, हिरा प्रतिष्ठानचे संस्थापक हिरालाल चौधरी यांनी सवलतीच्या दरात या इंजेक्शनची सेवा सुरू केली आहे. हीच प्रेरणा घेऊन शहादा येथेही सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सवलतीच्या दरात इंजेक्शन सेवा सुरू केली आहे. एकूणच या सेवेसाठी पुढे आलेली ही मंडळी निश्चितच राजकारणातील आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी या सेवेला निश्चितच राजकीय झालर दिसून येत असली, तरी वास्तवात मात्र ही सेवा अनेकांची आयुष्यवर्धिनी ठरत आहे. त्यामुळे या सेवेचे निश्चितच कौतुक केले पाहिजे. सध्याची परिस्थिती पाहता, रुग्णांची अवस्था गंभीर होत असल्याने या सेवेची व्यापकता अजून वाढण्याची आवश्यकता आहे.