शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरित मजुरांना रोजगार हमीचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:32 IST

नंदुरबार जिल्ह्यात स्थानिक स्तरावर रोजगार नसल्याने दरवर्षी एक लाखापेक्षा अधिक मजूर परराज्यात हंगामी स्थलांतरित होतात. दरवर्षी साधारणत: दिवाळीनंतर मजुरांचे ...

नंदुरबार जिल्ह्यात स्थानिक स्तरावर रोजगार नसल्याने दरवर्षी एक लाखापेक्षा अधिक मजूर परराज्यात हंगामी स्थलांतरित होतात. दरवर्षी साधारणत: दिवाळीनंतर मजुरांचे स्थलांतर सुरू होते आणि एप्रिल-मेमध्ये हे मजूर आपल्या मूळगावी परततात. लॉकडाऊनमुळे देशभरातील व्यापार, व्यवसाय, उद्योग ठप्प झाल्याने जिल्ह्यातून स्थलांतरित झालेले मजूरही गेल्यावर्षी महिना दोन महिने अगोदरच मूळगावी परतले. त्यासाठी त्यांना अनेक कष्ट सोसावे लागले. सुरुवातीला प्रशासनाने परवानगी नाकारली, नंतर प्रशासन मेहरबान झाले आणि रोजगार हमीची कामे सुरू केली. सुरुवातीच्या काळात मागेल त्याला काम उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला. त्यामुळे गावी परतलेल्या मजुरांचा उदरनिर्वाहाची चिंता दूर झाली होती. रोहयोच्या कामांवर रोज २५ हजारांपासून ते ६५ हजारांपर्यंत मजुरांची संख्या गेली होती. गेल्या २० वर्षांत एकाच दिवशी सर्वाधिक मजूर रोहयोच्या कामांवर उपस्थित राहण्याचा विक्रम गेल्यावर्षीच झाला. त्यामुळे रोजगार हमी योजना स्थलांतरित मजुरांसाठी फायदेशीर ठरली.

गेल्या वर्षभरात रोहयोमुळे एक लाख दोन हजार ९४१ कुटुंबांना रोजगार मिळाला, तर त्यांना ८३ कोटी रुपयांपेक्षा अधिक मजुरी मिळाली. रोहयोअंतर्गत सीसीटी, एलबीएस, कंपार्टमेंट बंड, गट लागवड, गाळ काढणे, गोठा, घरकूल, नाडेप, फळबाग, मजगी, माती नाला बांध, रस्ता दुतर्फा वृक्षलागवड, रस्ता काम, राजीव गांधी भवन, अंगणवाडी इमारत बांधणे, रोपवाटिका, वर्मी कंपोस्ट, विहीर पुनर्भरण, वृक्षलागवड, विहीर खोदणे, शेततळे, शौचालय, शोषखड्डे आदी विविध स्वरूपाची कामे उपलब्ध करून देण्यात आली.

तालुकानिहाय चित्र पाहिल्यास अक्कलकुवा तालुक्यात १० हजार ३७१ कामे, अक्राणी तालुक्यात आठ हजार २५०, नंदुरबार तालुक्यात चार हजार ६५, नवापूर तालुक्यात सात हजार २५, शहादा तालुक्यात सहा हजार ९३२ आणि तळोदा तालुक्यात तीन हजार ८२४ अशी एकूण ४० हजार ३३७ कामे मजुरांसाठी उपलब्ध करून देण्यात आली. या कामांवर जवळपास ८३ कोटींपेक्षा अधिक खर्च झाला आहे.

अर्थात ऑक्टोबरनंतर मात्र रोहयोच्या कामांवरील मजूर संख्या कमी होऊ लागली. लॉकडाऊनचे नियम शिथील झाल्याने बहुतांश मजूर पुन्हा रोजगारासाठी स्थलांतरित झाले. त्यामुळे सद्य:स्थितीत रोहयोच्या कामांवरील मजुरांची संख्या दहा हजारांवर आली आहे.