शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
2
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश
3
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
4
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
5
'या' मॉडेलला आता आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागणार; ग्लॅमरस ते खुनी 'असा' होता प्रवास
6
पाकला पाठिंबा देणाऱ्या चीनला भारताने शिकवला धडा; ड्रॅगनला ५ वर्षे सहन करावा लागणार तोटा
7
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३२,०४४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
9
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
10
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
11
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
12
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
13
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
14
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
15
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
16
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
17
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
18
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
19
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
20
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...

माळ खुर्दला प्रतिक्षा मूलभूत सुविधांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 12:57 IST

कल्पेश नुक्ते।  लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : तळोदा तालुक्यातील माळखुर्द ह्या अतिदुर्गम भागातील ग्रामस्थ यंदाही दुष्काळझळा सोसत आहेत़ अनेक ...

कल्पेश नुक्ते। लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : तळोदा तालुक्यातील माळखुर्द ह्या अतिदुर्गम भागातील ग्रामस्थ यंदाही दुष्काळझळा सोसत आहेत़ अनेक वर्षापासून विकासाच्या प्रतिक्षेत असलेल्या या गावात नुकतेच जिल्हाधिकारी डॉ़ कलशेट्टी आणि पोलीस अधिक्षक संजय पाटील यांच्या भेटीनंतर हे गाव प्रकाशझोतात आले आह़े अधिका:यांच्या भेटीनंतर तरी येथे विकास होणार अशी अपेक्षा आता व्यक्त होत आह़े तळोद्यापासून पासून साधारण 12 किलोमीटर अंतरावर उत्तरेला असलेले माळ खुर्द हे दिवाळीच्या दिवसांमध्ये माणसांच्या वर्दळीने फुलून जात़े अस्तंबा यात्रेकरुंसाठी विसाव्याचे ठिकाण म्हणून ते परिचित असल्याने पायी जाणारे यात्रेकरु येथे थांबून विश्राम करतात़ ऐरवी मात्र 102 कुटूंबातील  538 नागरिकांचे वास्तव्य असत़े विकास या संकल्पेपासून काहीशा आडेवाटेला असलेल्या या गावात जाण्यासाठी चौगाव ता़ तळोदा येथून सात किलोमीटर कठीण अशी डोंगराची पायवाट धरुन चालत जावे लागत़े 1968 सालापासून महसूल दर्जा प्राप्त असूनही गावात पाहिजे त्या सोयी नसल्याने येथून अनेक कुटूंबांनी स्थलांतर केले आह़े  चौगाव ग्रुप ग्रामपंचायतीत समावेश असलेल्या या गावातून 2015 साली सरपंच निवडून देण्यात आला होता़  गावातील काही लोकांकडे 1927 साला पूर्वीचे सातबारे असूनही सुविधा मिळल्या नसल्याचे त्यांचे म्हणणे आह़े रस्ताच नसल्याने गावात ऐनवेळी गंभीर आजारी पडलेल्या व्यक्तीला ‘झोळी’  करुन गावातील माणसे चौगाव र्पयत आणतात़ गेल्या अनेक वर्षापासून हे नित्याचे असल्याचे ग्रामस्थांनी सांगितल़े यातून काही गर्भवती माता, सर्पदंश झालेले आणि वन्यप्राण्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना योग्यवेळी उपचार न मिळाल्याने प्राणही गमवाने लागले हेत़े गावातील रस्त्याची समस्या लक्षात घेत  2004 मध्ये ग्रामस्थांनी रोहयोच्या माध्यमातून चौगावर्पयत रस्ता तयार करत सोय करुन घेतली होती़ तयार केलेला हा रस्ता पावसाळ्यात वाहून गेल्याने पुन्हा पायवाटांनीच प्रवास सुरु आह़े शासन ग्रामस्थांसाठी घरकुल, गोठे आणि शौचालयांना मंजूरी देत असले तरी बांधकाम करण्यासाठी लागणारे साहित्य वर्पयत घेऊन जाणे शक्य नसल्याने ही कामेही अधांतरी आहेत़ डोंगरद:यांमध्ये वसलेल्या माळखुर्दला पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने ग्रामस्थांचे प्रचंड हाल होतात़  जलस्त्रोत दोन किलोमीटर लांबवर असल्याने पायपीट करुन पाणी आणावे लागत़े यंदा मात्र दुष्काळामुळे हे स्त्रोत कोरडे झाल्याने समस्या अधिक वाढल्या आहेत़ यातच मका, ज्वारी आणि बाजरी यांचे उत्पादन कमी झाल्याने संकटात भर पडली आह़े शेतजमिनींमधून जादा काही पिकत नसल्याने अनेकांनी गुजरात राज्यात स्थलांतर केले आह़े