शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

कानळदा परिसरातील विहिरींनी गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 20:07 IST

शेतकरी चिंतातूर : पाण्याचे नियोजन होणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कलहान शहादे : नंदुरबार तालुक्यातील कानळदा, कोळदे, पळाशी, समशेरपुर, खोंडामळी, बह्याणे-मांजरे, पातोंडा आदी परिसरातील गाव विहिरींची पाणीपातळी खोल गेल्याने परिसरातील ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़या परिसरातील विहिरींची पातळी खोल गेल्याने पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे़ काही शेतशिवारात शेतकऱ्यांनी विहिरीत मोटारीदेखील सोडल्या होत्या़ परंतु त्यासुध्दा पाणी ओढणे शक्य होत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे़परिसरात आता पपई, कापूस, सोयाबिन आदी पिके घेण्यात येत आहेत़ त्यामुळे त्यांना जगविण्यासाठी पाण्याची सोय आवश्यक आहे़ परंतु गेल्या काही दिवसांपासून परिसरातील पाण्याची पातळी कमालीची खालावली आहे़ पिके कशी जगवावी, असा प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे़पुढील पावसाळा लांबला तर परिस्थिती अधिक गंभीर होणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत़दरम्यान, ठिबकमुळे बागायतदार शेतकरी तरले असले तरी कोरडवाहू शेतकºयांना पाण्याअभावी मोठ्या प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागत आहे़ ठिबक सिंचनावर केळी, पपई आदी पिके घेण्यात आलेली आहेत़ परंतु यंदा पाण्याची कमतरता असल्याने पिकांची लागवड यंदा कमीच राहिल असे जाणकार शेतकºयांकडून सांगण्यात येत आहे़