शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
2
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट
3
पाकिस्तानच्या अडचणी वाढणार! कर्ज दिल्यानंतर IMFने दिला इशारा; ११ अटींचे पालनही बंधनकारक
4
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आता केवळ या दोन नावांची चर्चा, तर्कवितर्कांना उधाण, कधी होणार घोषणा  
5
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
6
“‘नरकातला स्वर्ग’चे श्रेय स्वप्ना पाटकरांना, संजय राऊत देशसेवेसाठी तुरुंगात गेले नव्हते”
7
ऑटो जगतात खळबळ! निस्सान भारतासह जगभरातील प्रकल्प बंद करण्याच्या तयारीत; पैकी जपानमधील दोन... 
8
भारतीय सैन्याच्या शौर्याला, धाडसाला कांदिवलीच्या नागरिकांचा सलाम; काढली 'तिरंगा पदयात्रा'
9
PM मोदींचा एअरबेस दौरा, डेलीगेशन अन् चॅनेल बॅन...शहबाज शरीफ करताहेत भारताची नक्कल
10
Ayodhya Temple : राम मंदिराच्या सुरक्षेत मोठा बदल, २५० सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केले! करण काय?
11
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
12
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
13
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...
14
पीएमपीएमएलच्या ईलेक्ट्रीक बसची रेंज किती; कालच पाहिली, १,२४,००० किमी एवढे प्रचंड रनिंग झालेली बस...
15
अमेरिकेने ४ कोटी रुपये किमतीचे भारतीय आंबे का नष्ट केले? एक चूक सर्वांना महागात पडली
16
मिथुन चक्रवर्ती अडचणीत, BMC कडून सात दिवसांची 'डेडलाइन', काय आहे संपूर्ण प्रकरण?
17
बारावी शिकलेली रिसेप्शनिस्ट ज्योती पाकिस्तानपर्यंत पोहोचली कशी? 'या' देशांचीही केलीय वारी
18
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
19
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
20
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?

कानळदा परिसरातील विहिरींनी गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 20:07 IST

शेतकरी चिंतातूर : पाण्याचे नियोजन होणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कलहान शहादे : नंदुरबार तालुक्यातील कानळदा, कोळदे, पळाशी, समशेरपुर, खोंडामळी, बह्याणे-मांजरे, पातोंडा आदी परिसरातील गाव विहिरींची पाणीपातळी खोल गेल्याने परिसरातील ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़या परिसरातील विहिरींची पातळी खोल गेल्याने पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे़ काही शेतशिवारात शेतकऱ्यांनी विहिरीत मोटारीदेखील सोडल्या होत्या़ परंतु त्यासुध्दा पाणी ओढणे शक्य होत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे़परिसरात आता पपई, कापूस, सोयाबिन आदी पिके घेण्यात येत आहेत़ त्यामुळे त्यांना जगविण्यासाठी पाण्याची सोय आवश्यक आहे़ परंतु गेल्या काही दिवसांपासून परिसरातील पाण्याची पातळी कमालीची खालावली आहे़ पिके कशी जगवावी, असा प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे़पुढील पावसाळा लांबला तर परिस्थिती अधिक गंभीर होणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत़दरम्यान, ठिबकमुळे बागायतदार शेतकरी तरले असले तरी कोरडवाहू शेतकºयांना पाण्याअभावी मोठ्या प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागत आहे़ ठिबक सिंचनावर केळी, पपई आदी पिके घेण्यात आलेली आहेत़ परंतु यंदा पाण्याची कमतरता असल्याने पिकांची लागवड यंदा कमीच राहिल असे जाणकार शेतकºयांकडून सांगण्यात येत आहे़