शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्ती योजनेमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर बँका झाल्या मेहेरबान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:29 IST

नंदुरबार : जिल्ह्यात २०२०-२१ या वर्षाच्या खरीप हंगामात ३९ टक्के पीक कर्जवाटप राष्ट्रीयीकृत बँका व जिल्हा बँकेकडून करण्यात आले ...

नंदुरबार : जिल्ह्यात २०२०-२१ या वर्षाच्या खरीप हंगामात ३९ टक्के पीक कर्जवाटप राष्ट्रीयीकृत बँका व जिल्हा बँकेकडून करण्यात आले होते. शासनाने गेल्या वर्षात २५ हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळून पीक कर्जही मिळाले होते.

महात्मा फुले कृषी कर्जमुक्ती अभियानांतर्गत जिल्ह्यात एकूण २५ हजार २२ शेतकऱ्यांना कर्जमुक्ती गेल्या वर्षात मिळून त्यांचे १८ कोटी ९२ लाख रुपयांचे कर्ज शासनाने फेडून टाकले होते. यातून या शेतकऱ्यांना खरीप हंगामात पीक कर्ज मिळणे सुलभ झाले होते. परिणामी यंदाही कर्जवाटपात वाढ हाेण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पीक कर्ज वाटपाबाबतची बैठक अद्याप व्हायची आहे. या बैठकीत बँकांचे २०२१-२२ या वर्षातील पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठरवले जाणार आहे.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत बैठक होऊन कर्जाचे उद्दिष्ट ठरणार आहे. यानंतर कर्जवाटपाला सुरुवात होणार आहे. ज्या शेतकरी बांधवांनी गेल्या वर्षाच्या कर्जाची परतफेड केली असेल त्यांना तातडीने कर्ज मिळेल.

- जयंत देशपांडे, व्यवस्थापक, लीड बँक, नंदुरबार

शासनाकडून कर्जमुक्तीचा लाभ मिळाल्याने पीक कर्ज वेळेवर मिळाले होते. यंदाही बँकांनी कर्ज वितरण एप्रिलपासून सुुरू करण्याची गरज आहे. यंदाचा खरीप हंगाम लवकर सुरू होणार आहे.

- वकील पाटील, शेतकरी, शनिमांडळ

कर्जमुक्ती मिळाल्याने कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. गेल्या वर्षात पीक कर्जही वेळेवर मिळाले होते. त्याचा भरणा करून यंदा नव्याने कर्ज घेण्याचा मानस आहे.

- ज्ञानेश्वर पाटील, शेतकरी, शनिमांडळ

२०१६ ते २०२० या पाच वर्षांतील सर्वाधिक कर्जवाटप हे २०२० मध्ये झाले आहे. दरवर्षी उद्दिष्टाच्या ११ ते १२ टक्के पीक कर्जवाटप करणाऱ्या राष्ट्रीयीकृत बँकांनी गेल्या वर्षात २७३ कोटी रुपयांचे पीक कर्ज २५ हजार शेतकऱ्यांना केले होते.