शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

कोरोनामुळे केळी उत्पादक शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोना या महामारीत शेतकरीदेखील होरपळला असून, या काळात शेतकऱ्यांची आर्थिक घडीच विस्कळीत झाली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोरोना या महामारीत शेतकरीदेखील होरपळला असून, या काळात शेतकऱ्यांची आर्थिक घडीच विस्कळीत झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाने भरीव मदत देण्याची मागणी आहे. विशेषत: केळी उत्पादक शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले असून, हे शेतकरी संकटात साडपले आहेत.भारताची अर्थव्यवस्था शेतकरी व त्याचा येणाºया उत्पन्नावर अवलंबून आहे. एका बाजुला संपूर्ण देश लॉकडाऊन झाला असून, सर्व कंपन्या बंद पडल्या असताना व कोणताही कामगार किंवा अधिकारी कामावर जात नसतांना शेतकरी कामावर जात होता. ज्या नित्यावश्यक बाबी व गरजेचा वस्तु होत्या त्याचा पुरवठा शेतकºयांच्या शेतीमालातुन झाला आहे.शेतकरी अश्या परिस्थितीतदेखील व्यापार व कुठल्याही अन्नपदार्थांचा भाव न वाढवता देशाचा एक सच्चा देशभक्त म्हणून उभा राहिला. शेतकºयांवर कधी अस्मानी तर अवकाळी अशी संकटे येत असतात. परंतु अशा परिस्थितीतही न डगमगता शेतकरी खंबीरपणे उभा राहतो. त्यामुळे शासनाने शेतकºयांसाठी विशेष तरतुदी करणे आवश्यक आहे.होळ मोहिदा, ता.शहादा येथील श्रीकांत अरविंद पाटील या शेतकºयाची संपूर्ण केळी लॉकडाऊनमुळे शेतातच पडूून पडून खराब झाली. श्रीकांत पाटील यांचा पारंपरिक व्यवसाय हा शेती आहे. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे नियोजन शेतीवरच असते. तालुक्यातील होळ मोहिदा शिवारात त्यांची १९ एकर शेती आहे. यंदाच्यावर्षी पाऊस चांगला झाल्याने सहा एकर क्षेत्रात केळी लावली होती.शहादा तालुक्यातील शेतकरी बागायत शेतकरी म्हणून प्रसिध्द आहेत. तालुक्यातील शेतकरी पपई, केळी, ऊस लावण्यास प्राधान्य देतात. येथील केळी दिल्ली, पंजाब, लुधियाना व विदेशातदेखील व्यापाºयाच्या माध्यमातून पाठवतात. परंतु यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमिवर संपूर्ण देश लॉकडाऊन झाल्यामुळे व्यापारी वर्ग इकडे फिरकलाच नाही. त्यातच मजुर मिळणे सहज शक्य नसल्याने शेतकºयाचा माल शेतातच पडून आहे. श्रीकांत पाटील यांच्या म्हणण्यानुसार केळीचे एकरी एक हजार २४४ झाडे लावली जातात व उत्पन्न येईपर्यंत एकरी ५० हजारांच्या जवळपास खर्च येतो.यंदा लागलेल्या केळी पिकापासून एकरी उत्पन्न अंदाजे तीन ते साडे तीन लाख आले असते. पीक तयार आहे पण या केळीच्या घडाचा वजनाने झाड कोलमडून पडून राहिली. कारण केळी नेणारे व्यापारी केळी नेण्यास तयार नाही व तयार झालेला माल एकत्रीत नेवून विकणे शक्य नसल्यामुळे लागलेला खर्च निघणेदेखील शक्य नाही, अशी परिस्थिती तालुक्यातील शेतकºयांची आहे. त्यामुळे शासनाने शेतकरी वर्गाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.माझ्या सहा एकर क्षेत्रातील केळी पूर्णपणे खराब होण्याचा मार्गावर असून, ती काढण्यासाठीदेखील मला घरून खर्च करावा लागणार आहे. झालेले उत्पन्न माझा डोळ्यादेखत केवळ लॉकडाऊनमुळे खराब होत असून, प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.-श्रीकांत पाटील, शेतकरी, होळ मोहिदा, ता.शहादा