लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोरोना या महामारीत शेतकरीदेखील होरपळला असून, या काळात शेतकऱ्यांची आर्थिक घडीच विस्कळीत झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाने भरीव मदत देण्याची मागणी आहे. विशेषत: केळी उत्पादक शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले असून, हे शेतकरी संकटात साडपले आहेत.भारताची अर्थव्यवस्था शेतकरी व त्याचा येणाºया उत्पन्नावर अवलंबून आहे. एका बाजुला संपूर्ण देश लॉकडाऊन झाला असून, सर्व कंपन्या बंद पडल्या असताना व कोणताही कामगार किंवा अधिकारी कामावर जात नसतांना शेतकरी कामावर जात होता. ज्या नित्यावश्यक बाबी व गरजेचा वस्तु होत्या त्याचा पुरवठा शेतकºयांच्या शेतीमालातुन झाला आहे.शेतकरी अश्या परिस्थितीतदेखील व्यापार व कुठल्याही अन्नपदार्थांचा भाव न वाढवता देशाचा एक सच्चा देशभक्त म्हणून उभा राहिला. शेतकºयांवर कधी अस्मानी तर अवकाळी अशी संकटे येत असतात. परंतु अशा परिस्थितीतही न डगमगता शेतकरी खंबीरपणे उभा राहतो. त्यामुळे शासनाने शेतकºयांसाठी विशेष तरतुदी करणे आवश्यक आहे.होळ मोहिदा, ता.शहादा येथील श्रीकांत अरविंद पाटील या शेतकºयाची संपूर्ण केळी लॉकडाऊनमुळे शेतातच पडूून पडून खराब झाली. श्रीकांत पाटील यांचा पारंपरिक व्यवसाय हा शेती आहे. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे नियोजन शेतीवरच असते. तालुक्यातील होळ मोहिदा शिवारात त्यांची १९ एकर शेती आहे. यंदाच्यावर्षी पाऊस चांगला झाल्याने सहा एकर क्षेत्रात केळी लावली होती.शहादा तालुक्यातील शेतकरी बागायत शेतकरी म्हणून प्रसिध्द आहेत. तालुक्यातील शेतकरी पपई, केळी, ऊस लावण्यास प्राधान्य देतात. येथील केळी दिल्ली, पंजाब, लुधियाना व विदेशातदेखील व्यापाºयाच्या माध्यमातून पाठवतात. परंतु यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमिवर संपूर्ण देश लॉकडाऊन झाल्यामुळे व्यापारी वर्ग इकडे फिरकलाच नाही. त्यातच मजुर मिळणे सहज शक्य नसल्याने शेतकºयाचा माल शेतातच पडून आहे. श्रीकांत पाटील यांच्या म्हणण्यानुसार केळीचे एकरी एक हजार २४४ झाडे लावली जातात व उत्पन्न येईपर्यंत एकरी ५० हजारांच्या जवळपास खर्च येतो.यंदा लागलेल्या केळी पिकापासून एकरी उत्पन्न अंदाजे तीन ते साडे तीन लाख आले असते. पीक तयार आहे पण या केळीच्या घडाचा वजनाने झाड कोलमडून पडून राहिली. कारण केळी नेणारे व्यापारी केळी नेण्यास तयार नाही व तयार झालेला माल एकत्रीत नेवून विकणे शक्य नसल्यामुळे लागलेला खर्च निघणेदेखील शक्य नाही, अशी परिस्थिती तालुक्यातील शेतकºयांची आहे. त्यामुळे शासनाने शेतकरी वर्गाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.माझ्या सहा एकर क्षेत्रातील केळी पूर्णपणे खराब होण्याचा मार्गावर असून, ती काढण्यासाठीदेखील मला घरून खर्च करावा लागणार आहे. झालेले उत्पन्न माझा डोळ्यादेखत केवळ लॉकडाऊनमुळे खराब होत असून, प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.-श्रीकांत पाटील, शेतकरी, होळ मोहिदा, ता.शहादा
कोरोनामुळे केळी उत्पादक शेतकरी संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 12:40 IST