शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

कोरोनामुळे केळी उत्पादक शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोना या महामारीत शेतकरीदेखील होरपळला असून, या काळात शेतकऱ्यांची आर्थिक घडीच विस्कळीत झाली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोरोना या महामारीत शेतकरीदेखील होरपळला असून, या काळात शेतकऱ्यांची आर्थिक घडीच विस्कळीत झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाने भरीव मदत देण्याची मागणी आहे. विशेषत: केळी उत्पादक शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले असून, हे शेतकरी संकटात साडपले आहेत.भारताची अर्थव्यवस्था शेतकरी व त्याचा येणाºया उत्पन्नावर अवलंबून आहे. एका बाजुला संपूर्ण देश लॉकडाऊन झाला असून, सर्व कंपन्या बंद पडल्या असताना व कोणताही कामगार किंवा अधिकारी कामावर जात नसतांना शेतकरी कामावर जात होता. ज्या नित्यावश्यक बाबी व गरजेचा वस्तु होत्या त्याचा पुरवठा शेतकºयांच्या शेतीमालातुन झाला आहे.शेतकरी अश्या परिस्थितीतदेखील व्यापार व कुठल्याही अन्नपदार्थांचा भाव न वाढवता देशाचा एक सच्चा देशभक्त म्हणून उभा राहिला. शेतकºयांवर कधी अस्मानी तर अवकाळी अशी संकटे येत असतात. परंतु अशा परिस्थितीतही न डगमगता शेतकरी खंबीरपणे उभा राहतो. त्यामुळे शासनाने शेतकºयांसाठी विशेष तरतुदी करणे आवश्यक आहे.होळ मोहिदा, ता.शहादा येथील श्रीकांत अरविंद पाटील या शेतकºयाची संपूर्ण केळी लॉकडाऊनमुळे शेतातच पडूून पडून खराब झाली. श्रीकांत पाटील यांचा पारंपरिक व्यवसाय हा शेती आहे. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे नियोजन शेतीवरच असते. तालुक्यातील होळ मोहिदा शिवारात त्यांची १९ एकर शेती आहे. यंदाच्यावर्षी पाऊस चांगला झाल्याने सहा एकर क्षेत्रात केळी लावली होती.शहादा तालुक्यातील शेतकरी बागायत शेतकरी म्हणून प्रसिध्द आहेत. तालुक्यातील शेतकरी पपई, केळी, ऊस लावण्यास प्राधान्य देतात. येथील केळी दिल्ली, पंजाब, लुधियाना व विदेशातदेखील व्यापाºयाच्या माध्यमातून पाठवतात. परंतु यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमिवर संपूर्ण देश लॉकडाऊन झाल्यामुळे व्यापारी वर्ग इकडे फिरकलाच नाही. त्यातच मजुर मिळणे सहज शक्य नसल्याने शेतकºयाचा माल शेतातच पडून आहे. श्रीकांत पाटील यांच्या म्हणण्यानुसार केळीचे एकरी एक हजार २४४ झाडे लावली जातात व उत्पन्न येईपर्यंत एकरी ५० हजारांच्या जवळपास खर्च येतो.यंदा लागलेल्या केळी पिकापासून एकरी उत्पन्न अंदाजे तीन ते साडे तीन लाख आले असते. पीक तयार आहे पण या केळीच्या घडाचा वजनाने झाड कोलमडून पडून राहिली. कारण केळी नेणारे व्यापारी केळी नेण्यास तयार नाही व तयार झालेला माल एकत्रीत नेवून विकणे शक्य नसल्यामुळे लागलेला खर्च निघणेदेखील शक्य नाही, अशी परिस्थिती तालुक्यातील शेतकºयांची आहे. त्यामुळे शासनाने शेतकरी वर्गाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.माझ्या सहा एकर क्षेत्रातील केळी पूर्णपणे खराब होण्याचा मार्गावर असून, ती काढण्यासाठीदेखील मला घरून खर्च करावा लागणार आहे. झालेले उत्पन्न माझा डोळ्यादेखत केवळ लॉकडाऊनमुळे खराब होत असून, प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.-श्रीकांत पाटील, शेतकरी, होळ मोहिदा, ता.शहादा